शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण, वाघनख्याबाबत खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

By भारत चव्हाण | Updated: July 9, 2024 18:59 IST

तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? 

कोल्हापूर : एखाद्या प्रश्नातून काही गडबड होऊ नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. विषय जास्त ताणला जाईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, असेही ते म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमण आणि पशुहत्या याबाबत माजी खासदार संभाजीराजे दि. १३ जुलै रोजी विशाळगडावर जाऊन शिवभक्तांच्या उपस्थितीत आंदोलन करणार आहेत, तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार शाहू छत्रपती यांना त्यांची भूमिका विचारली.त्यावेळी त्यांनी सांगितले की, विशाळगड येथे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न आहे. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही सर्वांना लागू आहे. अतिक्रमण असेल तर त्यावर प्रशासन योग्य कारवाई करेल. सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटविण्याची गोष्ट आहे. न्याय प्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? संभाजीराजे आणि आमदार बचू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत छेडले असता शाहू छत्रपती म्हणाले की, ते दोघे एकत्र येण्याचा विचार करत आहेत, असे तुमच्याकडून समजले; पण त्यांचा उद्देश काय आहे हे कळाल्याशिवाय त्यावर बोलणे उचित नाही; पण ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तेव्हाचा विषय तेव्हा हाताळू.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीणलंडनहून आणल्या जाणार असलेल्या वाघनख्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काही पुराव्यानिशी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला आहे. ते बरोबर आहे की नाही हे शोधले पाहिजे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. वाघनखं दुर्मीळ आहेत, असे नाही; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीण आहे.जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाखासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विशाळगडचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांची बैठक घेऊन यातून मार्ग काढा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती