शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण, वाघनख्याबाबत खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

By भारत चव्हाण | Updated: July 9, 2024 18:59 IST

तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? 

कोल्हापूर : एखाद्या प्रश्नातून काही गडबड होऊ नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. विषय जास्त ताणला जाईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, असेही ते म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमण आणि पशुहत्या याबाबत माजी खासदार संभाजीराजे दि. १३ जुलै रोजी विशाळगडावर जाऊन शिवभक्तांच्या उपस्थितीत आंदोलन करणार आहेत, तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार शाहू छत्रपती यांना त्यांची भूमिका विचारली.त्यावेळी त्यांनी सांगितले की, विशाळगड येथे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न आहे. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही सर्वांना लागू आहे. अतिक्रमण असेल तर त्यावर प्रशासन योग्य कारवाई करेल. सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटविण्याची गोष्ट आहे. न्याय प्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? संभाजीराजे आणि आमदार बचू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत छेडले असता शाहू छत्रपती म्हणाले की, ते दोघे एकत्र येण्याचा विचार करत आहेत, असे तुमच्याकडून समजले; पण त्यांचा उद्देश काय आहे हे कळाल्याशिवाय त्यावर बोलणे उचित नाही; पण ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तेव्हाचा विषय तेव्हा हाताळू.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीणलंडनहून आणल्या जाणार असलेल्या वाघनख्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काही पुराव्यानिशी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला आहे. ते बरोबर आहे की नाही हे शोधले पाहिजे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. वाघनखं दुर्मीळ आहेत, असे नाही; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीण आहे.जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाखासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विशाळगडचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांची बैठक घेऊन यातून मार्ग काढा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती