शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पाऊस, पुराचे कारण; सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:04 IST

संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती पाहता, विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विभागातील पात्र सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असून सप्टेंबरनंतरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली आहेत. हे जरी खरे असले तरी, संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२० पासून लांबणीवर टाकण्यात आल्या. जवळपास दीड वर्ष कोरोनात गेल्याने ऑक्टोबर २०२१ नंतर संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. दूध, विकास, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. याच कालावधीत जिल्हा बँक, ‘गोकुळ’ यासारख्या शिखर संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विभागातील सात कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.अजून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास १३ साखर कारखाने निवडणुकीस पात्र होते. त्यातील ‘कुंभी’, ‘आप्पासाहेब नलवडे’, ‘राजारामबापू’, ‘निनाईदेवी’ या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया प्रारूप यादी, हरकती येथेपर्यंत सुरू आहे. अद्याप पाऊस नसला तरी, जुलै, ऑगस्टमध्ये कोल्हापूर जिल्हा व सांगलीतील काही तालुक्यांत धुवाधार पाऊस असतो. पाऊस व पूरस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे अवघड आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्या, अशी मागणी काही कारखान्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कार्यक्षेत्रातील पर्जन्यवृष्टीची माहिती प्राधिकरणाकडे

साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील जुलै, ऑगस्टमधील पर्जन्यवृष्टी व पुराची स्थिती काय, याबाबतची माहिती प्राधिकरणाला देण्याची तयारी काही साखर कारखान्यांनी केली आहे.

पावसाळ्यानंतर ‘बिद्री’चे रणांगणकोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखाने निवडणुकीस पात्र आहेत. त्यांची निवडणूक लांबणीवर गेली, तर पावसाळ्यानंतर ‘बिद्री’ साखर कारखान्याचे रणांगण सुरू होणार आहे. या सगळ्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित आहे.

हे कारखाने आहेत निवडणुकीस पात्र  कारखाना                   मुदत संपल्याचा दिनांकराजाराम, कसबा बावडा      २० एप्रिल २०२०माणगंगा, आटपाडी           २८ मे २०२०राजारामबापू, वाळवा         २९ मे २०२०निनाईदेवी, शिराळा           ५ ऑगस्ट २०२०कुंभी, कुडित्रे                  २८ डिसेंबर २०२०नलवडे, गडहिंग्लज           २९ मार्च २०२१शेतकरी, मिरज                १७ एप्रिल २०२१सह्याद्री, धामोड               १९ एप्रिल २०२१क्रांती, कुंडल                  ६ मे २०२१इंदिरा, तांबाळे                 १६ मे २०२१वसंतदादा, मिरज              २२ मे २०२१आजरा, गवसे                 २३ मे २०२१हुतात्मा, वाळवा               १६ एप्रिल २०२२भोगावती, परिते               २४ एप्रिल २०२२गायकवाड, बांबवडे           १ मे २०२२सर्वाेदय, कारंदवाडी           २१ जून २०२२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक