शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, पुराचे कारण; सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:04 IST

संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती पाहता, विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विभागातील पात्र सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असून सप्टेंबरनंतरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली आहेत. हे जरी खरे असले तरी, संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२० पासून लांबणीवर टाकण्यात आल्या. जवळपास दीड वर्ष कोरोनात गेल्याने ऑक्टोबर २०२१ नंतर संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. दूध, विकास, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. याच कालावधीत जिल्हा बँक, ‘गोकुळ’ यासारख्या शिखर संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विभागातील सात कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.अजून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास १३ साखर कारखाने निवडणुकीस पात्र होते. त्यातील ‘कुंभी’, ‘आप्पासाहेब नलवडे’, ‘राजारामबापू’, ‘निनाईदेवी’ या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया प्रारूप यादी, हरकती येथेपर्यंत सुरू आहे. अद्याप पाऊस नसला तरी, जुलै, ऑगस्टमध्ये कोल्हापूर जिल्हा व सांगलीतील काही तालुक्यांत धुवाधार पाऊस असतो. पाऊस व पूरस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे अवघड आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्या, अशी मागणी काही कारखान्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कार्यक्षेत्रातील पर्जन्यवृष्टीची माहिती प्राधिकरणाकडे

साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील जुलै, ऑगस्टमधील पर्जन्यवृष्टी व पुराची स्थिती काय, याबाबतची माहिती प्राधिकरणाला देण्याची तयारी काही साखर कारखान्यांनी केली आहे.

पावसाळ्यानंतर ‘बिद्री’चे रणांगणकोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखाने निवडणुकीस पात्र आहेत. त्यांची निवडणूक लांबणीवर गेली, तर पावसाळ्यानंतर ‘बिद्री’ साखर कारखान्याचे रणांगण सुरू होणार आहे. या सगळ्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित आहे.

हे कारखाने आहेत निवडणुकीस पात्र  कारखाना                   मुदत संपल्याचा दिनांकराजाराम, कसबा बावडा      २० एप्रिल २०२०माणगंगा, आटपाडी           २८ मे २०२०राजारामबापू, वाळवा         २९ मे २०२०निनाईदेवी, शिराळा           ५ ऑगस्ट २०२०कुंभी, कुडित्रे                  २८ डिसेंबर २०२०नलवडे, गडहिंग्लज           २९ मार्च २०२१शेतकरी, मिरज                १७ एप्रिल २०२१सह्याद्री, धामोड               १९ एप्रिल २०२१क्रांती, कुंडल                  ६ मे २०२१इंदिरा, तांबाळे                 १६ मे २०२१वसंतदादा, मिरज              २२ मे २०२१आजरा, गवसे                 २३ मे २०२१हुतात्मा, वाळवा               १६ एप्रिल २०२२भोगावती, परिते               २४ एप्रिल २०२२गायकवाड, बांबवडे           १ मे २०२२सर्वाेदय, कारंदवाडी           २१ जून २०२२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक