शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उसाची बिले अडकल्याने आर्थिक कोंडी

By admin | Updated: April 30, 2015 00:33 IST

शेतकऱ्यांची कोंडी : ऊसबिलाच्या माध्यमातून येणारा पैसाच थांबल्याने ग्रामीण भागातील उलाढाल मंदावली

संजय पारकर-राधानगरी -गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी उचल केलेल्या उसांची शेवटच्या दोन महिन्यांतील बिलेच शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाहीत. मार्च अखेर बहुतेक कारखाने बंद झाले;पण काही कारखान्यांनी जानेवारीपासून तर काहींनी फे्रबुवारीपासून पैसे दिलेले नाहीत. परिणामी ग्रामीण भागात मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आहे.अनेक अडचणी असल्या तरी जिल्ह्याच्या बहुतेक भागात ऊस हेच नगदी पिक आहे. काही भागात तर नव्वद टक्के क्षेत्रावर उसाचेच पिक दिसते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यात जागृती झाली. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांत उसाचा दर दोन हजार ते अडीच हजार दरम्यान स्थिरावला. मात्र, आंदोलनातून एफ.आर.पी. कायदा अस्तित्वात आल्याने यावेळी मोठ्या आंदोलनाशिवाय कारखान्यांना याप्रमाणे दर जाहीर करावा लागला. यावर्षी कारखान्यांनी दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे या दरम्यान पहिला हप्ता दिला आहे. आॅक्टोबरपासून कारखाने सरू झाले. मात्र, पैसे उपलब्ध करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे कारखान्यांनी डिसेंबरमध्ये पहिल्या पंधरावड्याची बिले अदा केली. त्यानंतरही पुढील उचल झालेल्या उसाची बिले अनियमितपणे मिळाली आहेत. कायद्यानुसार पंधरा दिवसांत उसाचे बिल देणे बंधकारक असूनही एकाही कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही. साखरेचे वाढलेले उत्पादन, घसरलेले दर, कमी मागणी, कर्ज देणाऱ्या बॅँकांनी घेतलेला आखडता हात ही त्याची प्रमुख कारणे आहेत. शेतकऱ्यांनीही ती समजून घेऊन फारशी खळखळ केलेली नाही. आज ना उद्या बिले मिळणारच, अशा आशेवर शेतकरी राहिले आहेत.या परिसरातील ऊस नेणाऱ्या भोगावती साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत रोखीची बिले अदा केली आहेत. तर ३१ जानेवारीपर्यंत फक्त सेवा संस्थाच्या वसुलीची रक्कम वर्ग केली आहे. छत्रपती राजाराम व बिद्रीच्या दूधगंगा-वेदगंगा या कारखान्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंतची बिले अदा केली आहेत. यावर्षी नव्याने सुरू झालेल्या फराळे येथील खासगी कारखान्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत उचललेल्या उसाचीच रक्कम अदा केली आहे. हमीदवाडा, डी. वाय. पाटील, संताजी घोरपडे या कारखान्यांनीही जेमतेम ३१ जानेवारी २०१५ पर्यंतचीच बिले दिली आहेत.ऊस उत्पादकांबरोबरच ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अशा अन्य घटकांनाही कारखान्यांनी त्यांच्या रकमा दिलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील या घटकांकडे येणारा पैसाच थांबल्याने होणारी मोठी उलाढाल मंदावलेली आहे. याचा सर्वच संबधित घटकांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. दीड वर्षे होऊनही पैसे नाहीतऊसाचे बिल आले की पहिले कर्जाला राहिले तर हातात व त्यानंतर पुन्हा कर्ज घेऊन पिकांची देखभाल, उदरनिर्वाह, इतर गरजा पूर्ण करण्याचे अनेकांचे नित्यचक्र आहे. त्यात व्यत्यय आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उसाच्या लागणीपासूनचा कालावधी पाहिला, तर दीड वर्षे होऊनही अजून हातात पैसे आलेले नाहीत. उदार उसणवार कन चालढकल सुरू असली तरी त्यातही मर्यादा येत आहेत. बिलाबाबत कारखाने व बॅँकांकडे विचारणा करून शेतकरी थकले आहेत. साखर उद्योगाची सद्य:स्थिती पाहता शेवटी तुटलेल्या उसाची बिले शेतकऱ्याला मिळणार काय ? याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.