शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

उसाची बिले अडकल्याने आर्थिक कोंडी

By admin | Updated: April 30, 2015 00:33 IST

शेतकऱ्यांची कोंडी : ऊसबिलाच्या माध्यमातून येणारा पैसाच थांबल्याने ग्रामीण भागातील उलाढाल मंदावली

संजय पारकर-राधानगरी -गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी उचल केलेल्या उसांची शेवटच्या दोन महिन्यांतील बिलेच शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाहीत. मार्च अखेर बहुतेक कारखाने बंद झाले;पण काही कारखान्यांनी जानेवारीपासून तर काहींनी फे्रबुवारीपासून पैसे दिलेले नाहीत. परिणामी ग्रामीण भागात मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आहे.अनेक अडचणी असल्या तरी जिल्ह्याच्या बहुतेक भागात ऊस हेच नगदी पिक आहे. काही भागात तर नव्वद टक्के क्षेत्रावर उसाचेच पिक दिसते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यात जागृती झाली. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांत उसाचा दर दोन हजार ते अडीच हजार दरम्यान स्थिरावला. मात्र, आंदोलनातून एफ.आर.पी. कायदा अस्तित्वात आल्याने यावेळी मोठ्या आंदोलनाशिवाय कारखान्यांना याप्रमाणे दर जाहीर करावा लागला. यावर्षी कारखान्यांनी दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे या दरम्यान पहिला हप्ता दिला आहे. आॅक्टोबरपासून कारखाने सरू झाले. मात्र, पैसे उपलब्ध करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे कारखान्यांनी डिसेंबरमध्ये पहिल्या पंधरावड्याची बिले अदा केली. त्यानंतरही पुढील उचल झालेल्या उसाची बिले अनियमितपणे मिळाली आहेत. कायद्यानुसार पंधरा दिवसांत उसाचे बिल देणे बंधकारक असूनही एकाही कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही. साखरेचे वाढलेले उत्पादन, घसरलेले दर, कमी मागणी, कर्ज देणाऱ्या बॅँकांनी घेतलेला आखडता हात ही त्याची प्रमुख कारणे आहेत. शेतकऱ्यांनीही ती समजून घेऊन फारशी खळखळ केलेली नाही. आज ना उद्या बिले मिळणारच, अशा आशेवर शेतकरी राहिले आहेत.या परिसरातील ऊस नेणाऱ्या भोगावती साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत रोखीची बिले अदा केली आहेत. तर ३१ जानेवारीपर्यंत फक्त सेवा संस्थाच्या वसुलीची रक्कम वर्ग केली आहे. छत्रपती राजाराम व बिद्रीच्या दूधगंगा-वेदगंगा या कारखान्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंतची बिले अदा केली आहेत. यावर्षी नव्याने सुरू झालेल्या फराळे येथील खासगी कारखान्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत उचललेल्या उसाचीच रक्कम अदा केली आहे. हमीदवाडा, डी. वाय. पाटील, संताजी घोरपडे या कारखान्यांनीही जेमतेम ३१ जानेवारी २०१५ पर्यंतचीच बिले दिली आहेत.ऊस उत्पादकांबरोबरच ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अशा अन्य घटकांनाही कारखान्यांनी त्यांच्या रकमा दिलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील या घटकांकडे येणारा पैसाच थांबल्याने होणारी मोठी उलाढाल मंदावलेली आहे. याचा सर्वच संबधित घटकांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. दीड वर्षे होऊनही पैसे नाहीतऊसाचे बिल आले की पहिले कर्जाला राहिले तर हातात व त्यानंतर पुन्हा कर्ज घेऊन पिकांची देखभाल, उदरनिर्वाह, इतर गरजा पूर्ण करण्याचे अनेकांचे नित्यचक्र आहे. त्यात व्यत्यय आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उसाच्या लागणीपासूनचा कालावधी पाहिला, तर दीड वर्षे होऊनही अजून हातात पैसे आलेले नाहीत. उदार उसणवार कन चालढकल सुरू असली तरी त्यातही मर्यादा येत आहेत. बिलाबाबत कारखाने व बॅँकांकडे विचारणा करून शेतकरी थकले आहेत. साखर उद्योगाची सद्य:स्थिती पाहता शेवटी तुटलेल्या उसाची बिले शेतकऱ्याला मिळणार काय ? याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.