शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उसाला तुरा, वजनाला मारा, शेतकऱ्यांवर अडचणींचा फेरा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 'इतक्या' टक्क्यांपर्यंत घट

By राजाराम लोंढे | Updated: January 2, 2023 16:05 IST

कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाला यंदा लवकर फुलोरा आल्याने वजनात मोठी घट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण १०, तर मराठवाड्यात हेच २५ टक्क्यांपर्यंत राहिले आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही तफावत दिसत असून, सर्वच कारखान्यांची उद्दिष्ट गाठताना दमछाक होणार आहे.राज्यात मागील हंगामात राज्यात १४ कोटी टन गाळप झाले होते. यंदा त्यापेक्षा अधिक होईल, असा ठोकताळा कारखान्यांचा होता. मात्र, उसाच्या वजनात घट होत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत एकरी पाच ते सात टन ऊस कमी मिळत आहे. हेच प्रमाण मराठवाड्यात अधिक असून, २५ ते ३० टक्के घट दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.वाढीच्या वेळीच धुवादार पाऊसउसाची वाढ ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत गतीने होते. सप्टेंबरमध्ये कडक ऊन पडल्याने वाढ जोमात होते. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाला. त्यात परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिल्याने उसाची वाढच खुंटल्याने त्याचा परिणाम वजनात दिसत आहे.

राज्यात खोडवा ऊस अधिकराज्यात यंदा खोडव्याच्या उसाचे पीक तुलनेत अधिक असल्याने सरासरी २५ ते ३० लाख टन उसाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे.

तुरा लवकर येणारे वाणको ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशिरा येतो.

तुरा का येतो :

  • शेतामध्ये पाणी साठून राहणे.
  • पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता.

काय करावे :

  • पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण देणे.
  • पॅराक्वाट या रसायनाची फवारणी.
  • भरणीच्या वेळी फवारणी केली तर अधिक फायदा.
  • उसाच्या शेंड्याजवळील पाने पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात काढणे.

 

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे किमान १० टक्के गाळप कमी होऊ शकते. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ. 

खतांचे वाढलेले दर आणि मजुरांची वानवा पाहता, उसाचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. वजन घटीने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. - ज्योतिराम खाडे, शेतकरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने