शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा

By भीमगोंड देसाई | Updated: July 13, 2024 13:13 IST

एकाचवेळी काम सुरू केल्याने चिखल, खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त : मृत्यूचा बनला सापळा, प्रवास बनला धोकादायक

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरणाचे काम २०२३ पासून सुरू आहे. सांगलीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पण त्यापुढे आंब्यापर्यंतच्या कामाला अपेक्षित गती नाही. सर्वत्र एकाचवेळी उकरल्याने उन्हाळ्यात धूळ तर आता चिखलांनी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कोकणाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने अवजडसह सर्वच वाहनधारक, दुचाकींची २४ तास वर्दळ असते. म्हणून महामार्ग कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची सद्यस्थिती, काम कधी पूर्ण होणार, कामाची गती संथ असल्याने होणारा त्रास, वाहनधारकांना होणारा त्रास यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे होत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील आंबा ते कोल्हापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम एकाचवेळी सुरू केल्याने काम गतीने होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी महामार्गाची वाट बिकट बनली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने करवीर तालुक्यातील केर्ले ते आंब्यापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. शेतवाडीतील रस्त्याप्रमाणे त्याची स्थिती असल्याने वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोकण ते विदर्भ असा प्रवास गतीने होण्यासाठी नागपूर-रत्नागिरी असा चौपदरीकरणाचा महामार्ग मंजूर केला. सांगलीपर्यंतचा महामार्ग तयार आहे. सांगलीपासून अंकलीपूल, चोकाक ते आंब्यापर्यंतच्या कामाची वाट लागल्याच्या तक्रारी आहेत. अंकली ते चौकाकपर्यंत अजूनही बाधित शेतकऱ्यांना भरपाईचा प्रश्न प्रलंबित आहे. भू-संपादनच नसल्याने या टप्प्यातील काम बंद आहे. तेथून कोल्हापूर ते पन्हाळा रोडवरील केर्ले गावापासून ते आंब्यापर्यंत महामार्गाचे काम एक वर्षापासून सुरू आहे. हे काम करताना टप्याटप्याने पूर्ण न करता एकाचवेळी सर्व ठिकाणी काम केले जात आहे.पूर्वीचा वळणाच्या रस्त्याला पर्यायी महामार्ग करून शक्य तितक्या सरळ रेषेत करण्यासाठी प्रचंड सपाटीकरण, डोंगर कापले जात आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पूल बांधले जात आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने शाहूवाडी तालुक्यात बहुतांशी ठिकाणचे काम बंद आहे. करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील काम केले जात आहे. या कामालाही गती नसल्याने मृत्यूच्या सापळ्यातून वाहन चालवण्याचा अनुभव वाहन चालकांना घ्यावा लागत आहे.

महामार्ग कसा आहे ?सांगली, अंकलीपूल चोकाक, शिये, भुये, केर्ले, पडवळवाडी, केर्ली, बोरपाडळी, नावली, देवाळे, पैजारवाडी, आवळी, डोणोली, बांबवडे, शाहूवाडी, चांदोली, आंबा.

पूर्णपणे काम कुठपर्यंत झाले आहे ?नागपूर - रत्नागिरी चौपदरीकरणाच्या कामाला सन २०२३ मध्ये सुरूवात झाली. सध्या नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगलीपासून अंकली पूल ते आंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर ते आंबा महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. उन्हाळ्यात वाहनधारकांना धुळ्याचा आणि आता चिखलाचा त्रास होत आहे. छोटे, मोठे अपघात होत आहे. अवजड वाहने घसरून पलटी होत आहेत. म्हणून रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे. - तुकाराम पाटील, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, वाहनधारक 

कोल्हापूर ते आंब्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी २०२५ पर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यास ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई होईल. सद्य स्थितीमध्ये अपेक्षित गतीने काम होत आहे. - गोविंद, उप व्यवस्थापक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर

 

  • महामार्गाची मंजुरी : सन २०२२
  • प्रत्यक्ष कामाला सुरूवात : २०२३
  • एकूण निधी मंजूर : ५६९८ कोटी
  • कोल्हापूर आंब्यापर्यंतच्या रस्त्यास निधी :३९२४ कोटी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गnagpurनागपूरRatnagiriरत्नागिरी