शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:57 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

संतोष भोसलेकिणी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून उभारलेला किणी (ता. हातकणंगले) येथील दोन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे महावितरणकडून किणी, घुणकी, वाठार गावच्या जवळपास १२१६ शेती पंपांना आठ तास दिवसा वीजपुरवठा होणार आहे. यामुळे पिकांना रात्रपाळीला पाणी पाजण्याचा त्रास बंद होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गायरानातील जागा सौर प्रकल्पासाठी देऊन दिवसा वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.महावितरणनकडून शेती पंपांना भारनियमन लागू असल्याने दिवसा व रात्री दोन टप्प्यांत वेळापत्रकानुसार विद्युतपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची उन्हाळ्यात पुरती दैना होते. अनेक वर्षांपासून दिवसा शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासन व महावितरण कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेतून विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणाची या प्रकल्पासाठी जमीन घेतली असेल, त्या गावातील शेती पंपांना दिवसा विद्युतपुरवठा करण्याचे धोरण आहे. त्यानुसार महावितरणकडून किणी, घुणकी, वाठारमधील विहीर, बोअरवेल, वारणा नदीवरील खासगी व सहकारी पाणी पुरवठ्याच्या जवळपास १२१६ शेती पंपांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच असा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून सुटका होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. किणी येथील हत्ती माळ येथे दहा एकर क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात आला असून, साडेचार हजार सौर पॅनल बसवले आहेत. यातून दोन मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेतून वाठार उपकेंद्राद्वारे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

तीन गावांना लाभसौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने वाठर उपकेंद्रतील तीन गावातील भारनियमन बंद होऊन शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती वडगावचे उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी यांनी दिली.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. याचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतींनी सौर प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, - विक्रांत पाटील (किणीकर) अध्यक्ष जिल्हा इरिगेशन फेडरेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज