शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:57 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

संतोष भोसलेकिणी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून उभारलेला किणी (ता. हातकणंगले) येथील दोन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे महावितरणकडून किणी, घुणकी, वाठार गावच्या जवळपास १२१६ शेती पंपांना आठ तास दिवसा वीजपुरवठा होणार आहे. यामुळे पिकांना रात्रपाळीला पाणी पाजण्याचा त्रास बंद होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गायरानातील जागा सौर प्रकल्पासाठी देऊन दिवसा वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.महावितरणनकडून शेती पंपांना भारनियमन लागू असल्याने दिवसा व रात्री दोन टप्प्यांत वेळापत्रकानुसार विद्युतपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची उन्हाळ्यात पुरती दैना होते. अनेक वर्षांपासून दिवसा शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासन व महावितरण कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेतून विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणाची या प्रकल्पासाठी जमीन घेतली असेल, त्या गावातील शेती पंपांना दिवसा विद्युतपुरवठा करण्याचे धोरण आहे. त्यानुसार महावितरणकडून किणी, घुणकी, वाठारमधील विहीर, बोअरवेल, वारणा नदीवरील खासगी व सहकारी पाणी पुरवठ्याच्या जवळपास १२१६ शेती पंपांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच असा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून सुटका होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. किणी येथील हत्ती माळ येथे दहा एकर क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात आला असून, साडेचार हजार सौर पॅनल बसवले आहेत. यातून दोन मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेतून वाठार उपकेंद्राद्वारे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

तीन गावांना लाभसौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने वाठर उपकेंद्रतील तीन गावातील भारनियमन बंद होऊन शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती वडगावचे उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी यांनी दिली.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. याचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतींनी सौर प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, - विक्रांत पाटील (किणीकर) अध्यक्ष जिल्हा इरिगेशन फेडरेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज