शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:57 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

संतोष भोसलेकिणी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून उभारलेला किणी (ता. हातकणंगले) येथील दोन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे महावितरणकडून किणी, घुणकी, वाठार गावच्या जवळपास १२१६ शेती पंपांना आठ तास दिवसा वीजपुरवठा होणार आहे. यामुळे पिकांना रात्रपाळीला पाणी पाजण्याचा त्रास बंद होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गायरानातील जागा सौर प्रकल्पासाठी देऊन दिवसा वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.महावितरणनकडून शेती पंपांना भारनियमन लागू असल्याने दिवसा व रात्री दोन टप्प्यांत वेळापत्रकानुसार विद्युतपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची उन्हाळ्यात पुरती दैना होते. अनेक वर्षांपासून दिवसा शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासन व महावितरण कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेतून विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणाची या प्रकल्पासाठी जमीन घेतली असेल, त्या गावातील शेती पंपांना दिवसा विद्युतपुरवठा करण्याचे धोरण आहे. त्यानुसार महावितरणकडून किणी, घुणकी, वाठारमधील विहीर, बोअरवेल, वारणा नदीवरील खासगी व सहकारी पाणी पुरवठ्याच्या जवळपास १२१६ शेती पंपांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच असा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून सुटका होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. किणी येथील हत्ती माळ येथे दहा एकर क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात आला असून, साडेचार हजार सौर पॅनल बसवले आहेत. यातून दोन मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेतून वाठार उपकेंद्राद्वारे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

तीन गावांना लाभसौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने वाठर उपकेंद्रतील तीन गावातील भारनियमन बंद होऊन शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती वडगावचे उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी यांनी दिली.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. याचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतींनी सौर प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, - विक्रांत पाटील (किणीकर) अध्यक्ष जिल्हा इरिगेशन फेडरेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज