शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

मरळेतील मागासवर्गीयांच्या जमिनींची कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:16 IST

शाहूवाडी तालुक्यातील महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे मरळे गावातील मागासवर्गीय समाजाला कसण्यासाठी दिलेल्या जमिनींची कागदपत्रे तहसील

ठळक मुद्देकसण्यासाठी दिलेल्या जमिनी : महसूल विभागाकडे हेलपाटे : भोंगळ कारभार

राजाराम कांबळे ।मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे मरळे गावातील मागासवर्गीय समाजाला कसण्यासाठी दिलेल्या जमिनींची कागदपत्रे तहसील कार्यालयात सापडत नसल्यामुळे गेली ६६ वर्षे शेतकरी महसूल विभागाकडे हेलपाटे मारीत आहेत.

आम्ही मेल्यावर आमची जमीन आमच्या नावावर होणार काय? गेल्या दोन पिढ्या जमीन नावावर होणार, असे म्हणत यमसदनी गेल्या आहेत. ३५ शेतकरी जमीन नावावर होण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. आम्हाला न्याय मिळणार का?, असा सवाल शेतकरी व्यक्त करीत आहेत. जमिनीच्या सात-बारावर आपले नाव लावण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी शासनाशी संघर्ष करीत आहेत. तलाठी, मंडल अधिकारी व संबंधित कर्मचारी आम्हाला हेलपाटे मारायला लावत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनी शेतकºयांच्या नावावर करून द्या, असा आदेश दिला होता. जिल्हाधिकाºयांनी पन्हाळा उपविभागीय अधिकारी व शाहूवाडी तहसील कार्यालयाला आदेश दिला होता. या आदेशाला कनिष्ठ कर्मचारी यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शाहूवाडी तहसील कार्यालयात जमिनीची कागदपत्रे सापडली नाहीत, तर आमच्या पोराबाळांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकरी लक्ष्मण कांबळे यांनी दिला आहे.

मरळे गावातील मागासवर्गीय ३५ शेतकरी १९५२ पासून गट नबंर ६६, 3८, ४७, १३, ७४, १२, १३ मुळकीपड जमीन कसत आहेत. शासनाने महारवतन वाटप केले. त्या वेळेपासून या जमिनीमध्ये ३५ कुळे आपल्या कुंटुबांचा या शेतीतून उदरनिर्वाह करीत आहेत. या शेतकºयांनी शासनाकडे अर्ज करून मुलकीपड जमीन आमच्या नावावर व्हावी, असा अर्ज शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे केला होता. महसूल विभागाने मुलकीपड जमिनीत अतिक्रमण नियमित होण्यासाठी दि. १६-५-२०१६ला उपविभागीय अधिकारी पन्हाळा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मंडल अधिकाºयांनी ३५ शेतकºयांची आनेवारी देखील केली होती. जाहिरनाम्यावर अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी यांची सही आहे.

सात- बारा पत्रकी इतर हक्कांत शेतकºयांची नावे समाविष्ट केली आहेत. तत्कालीन तलाठी, मंडल अधिकाºयांनी पुढील कामे वेळेवर न केल्यामुळे ३५ शेतकरी सात-बारा उताºयावर नाव लावण्यापासून वंचित आहेत. ही सर्व कागदपत्रे तयार करण्यासाठी तीन वर्षे लागली आहेत. हे ३५ मागासवर्गीय शेतकºयांच्या कागदपत्रांच्या ३५ फाईली जिल्हाधिकारी कार्यालयाने शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. मात्र, शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ही कागदपत्रे सापडत नसल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. मरळे येथील मागासवर्गीय शेतकरी गरीब असून, या जमिनीवर त्यांची उपजीविका सुरू आहे. या जमिनींचा शेतसारा हे शेतकरी भरत आहेत. तीन पिढ्या जमीन नावावर होण्यासाठी शासनाबरोबर लढा सुरू आहे. शाहूवाडी-कोल्हापूर गेली अनेक वर्षे हेलपाटे मारत आहेत.जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदीशाहूवाडी तालुक्यात मुलकीपड, नियंत्रित सत्ता, महार वतन, अशा जमिनींचे मोठे क्षेत्र आहे. या जामिनी धनदांडगे खरेदी करीत असून तलाठी, मंडल अधिकाºयांना हाताशी धरून ताबडतोब सात-बारा नावावर केला जातो. मात्र, गरीब, मागासवर्गीय शेतकरी जमिनीचा तुकडा नावावर होण्यासाठी तीन पिढ्या संपत आल्या, तरी सरकारी बाबूंच्या कारभाराचा फटका गरिबांना बसत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलcollectorजिल्हाधिकारी