शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

बॉक्साईट उत्खननामुळे पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

‘उत्खनन बंद’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : ग्रामस्थ, इतिहासप्रेमींतून संताप; आंदोलनाचा इशारा

राजेंद्र लाड - आंबा शिवकालीन जाज्वल्य इतिहास आणि संपन्न जैवविविधता जपलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावनखिंड, मानोली सडा, वाघझरा परिसरात ‘इको झोन’च्या निर्बंधांना बगल देत बेधडक बॉक्साईट उत्खनन सुरू केल्याने इतिहास व निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. जंगल पोखरून बॉक्साईटचे उत्खनन सुरू असल्यामुळे खाणीपासून दीड किलो मीटरवर पायथ्यासी असलेल्या पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बॉक्साईट खाण बंद करावी, अशी मागणी वीररत्न बाजीप्रभू तरुण मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील व रामचंद्र यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्धारे केली आहे.याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सत्यजित पाटील, पर्यावरण व पर्यटन मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे पावनखिंड जागतिक वारसास्थळाचा एक भाग आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करणे स्थानिक लोकांबरोबर जागतिक स्तरावरही याचा विचार होत असताना येथे मात्र बेधडक उत्खनन सुरू आहे, याचे आश्चर्य इतिहासप्रेमींतून व्यक्त होत आहे. पावनखिंड व धोपेश्वर या दरम्यानच्या सह्याद्रीच्या सड्यावरील अडीचशे हेक्टर क्षेत्रात बॉक्साईट आहे. ही जागा लीजवर दिल्यामुळे पावनखिंडीच्या बाजूने सडा खोदण्यास प्रारंभ झाला आहे. पावनखिंडीलगतच्या सड्यावर थेट झाडीतून रस्ते काढून मशिनरीची घरघर गती घेत आहे. गेल्या महिन्याभरात पन्नास हजार टनांपर्यंत खनिजांचे उत्खनन केले आहे. वनविभागाने रस्ता अडविल्याने खनिज जाग्यावरच पडले आहे. अन्य वाहनांची ये-जा मात्र पावनखिंडीला जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरून चालू आहे. खाणीवर बंदी न आणल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडूनच राष्ट्रीय अस्मितेवर घालाशाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सुमारे दोन हजार मिली मीटरपेक्षा जास्त पाउस पडतो. या खाणीमुळे जंगल नष्ट होईलच शिवाय पावसाचे प्रमाणही कमी होईल. विपुल वनौषधी तसेच शेखरू, मॉरमन, हरियाल, गेळा, जारूळ नामशेष होण्याची शक्यता आहे. शासन पावनखिंडीलगतच्या उत्खननाला परवानगी देऊन राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालत असल्याचा आरोप मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी केला आहे. बॉक्साईट उत्खनन सुरू असले, तरी वनविभागाने वाहतुकीचा रस्ता रोखला आहे. केंबुणेर्वाडी, गजापूर, भाततळी, मालाईधनगरवाडा, पांढरेपाणी, आदी गावांतील ग्रामस्थांना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकीचा त्रास होणार आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.