शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

बॉक्साईट उत्खननामुळे पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

‘उत्खनन बंद’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : ग्रामस्थ, इतिहासप्रेमींतून संताप; आंदोलनाचा इशारा

राजेंद्र लाड - आंबा शिवकालीन जाज्वल्य इतिहास आणि संपन्न जैवविविधता जपलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावनखिंड, मानोली सडा, वाघझरा परिसरात ‘इको झोन’च्या निर्बंधांना बगल देत बेधडक बॉक्साईट उत्खनन सुरू केल्याने इतिहास व निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. जंगल पोखरून बॉक्साईटचे उत्खनन सुरू असल्यामुळे खाणीपासून दीड किलो मीटरवर पायथ्यासी असलेल्या पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बॉक्साईट खाण बंद करावी, अशी मागणी वीररत्न बाजीप्रभू तरुण मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील व रामचंद्र यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्धारे केली आहे.याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सत्यजित पाटील, पर्यावरण व पर्यटन मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे पावनखिंड जागतिक वारसास्थळाचा एक भाग आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करणे स्थानिक लोकांबरोबर जागतिक स्तरावरही याचा विचार होत असताना येथे मात्र बेधडक उत्खनन सुरू आहे, याचे आश्चर्य इतिहासप्रेमींतून व्यक्त होत आहे. पावनखिंड व धोपेश्वर या दरम्यानच्या सह्याद्रीच्या सड्यावरील अडीचशे हेक्टर क्षेत्रात बॉक्साईट आहे. ही जागा लीजवर दिल्यामुळे पावनखिंडीच्या बाजूने सडा खोदण्यास प्रारंभ झाला आहे. पावनखिंडीलगतच्या सड्यावर थेट झाडीतून रस्ते काढून मशिनरीची घरघर गती घेत आहे. गेल्या महिन्याभरात पन्नास हजार टनांपर्यंत खनिजांचे उत्खनन केले आहे. वनविभागाने रस्ता अडविल्याने खनिज जाग्यावरच पडले आहे. अन्य वाहनांची ये-जा मात्र पावनखिंडीला जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरून चालू आहे. खाणीवर बंदी न आणल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडूनच राष्ट्रीय अस्मितेवर घालाशाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सुमारे दोन हजार मिली मीटरपेक्षा जास्त पाउस पडतो. या खाणीमुळे जंगल नष्ट होईलच शिवाय पावसाचे प्रमाणही कमी होईल. विपुल वनौषधी तसेच शेखरू, मॉरमन, हरियाल, गेळा, जारूळ नामशेष होण्याची शक्यता आहे. शासन पावनखिंडीलगतच्या उत्खननाला परवानगी देऊन राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालत असल्याचा आरोप मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी केला आहे. बॉक्साईट उत्खनन सुरू असले, तरी वनविभागाने वाहतुकीचा रस्ता रोखला आहे. केंबुणेर्वाडी, गजापूर, भाततळी, मालाईधनगरवाडा, पांढरेपाणी, आदी गावांतील ग्रामस्थांना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकीचा त्रास होणार आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.