शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्साईट उत्खननामुळे पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

‘उत्खनन बंद’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : ग्रामस्थ, इतिहासप्रेमींतून संताप; आंदोलनाचा इशारा

राजेंद्र लाड - आंबा शिवकालीन जाज्वल्य इतिहास आणि संपन्न जैवविविधता जपलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावनखिंड, मानोली सडा, वाघझरा परिसरात ‘इको झोन’च्या निर्बंधांना बगल देत बेधडक बॉक्साईट उत्खनन सुरू केल्याने इतिहास व निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. जंगल पोखरून बॉक्साईटचे उत्खनन सुरू असल्यामुळे खाणीपासून दीड किलो मीटरवर पायथ्यासी असलेल्या पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बॉक्साईट खाण बंद करावी, अशी मागणी वीररत्न बाजीप्रभू तरुण मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील व रामचंद्र यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्धारे केली आहे.याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सत्यजित पाटील, पर्यावरण व पर्यटन मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे पावनखिंड जागतिक वारसास्थळाचा एक भाग आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करणे स्थानिक लोकांबरोबर जागतिक स्तरावरही याचा विचार होत असताना येथे मात्र बेधडक उत्खनन सुरू आहे, याचे आश्चर्य इतिहासप्रेमींतून व्यक्त होत आहे. पावनखिंड व धोपेश्वर या दरम्यानच्या सह्याद्रीच्या सड्यावरील अडीचशे हेक्टर क्षेत्रात बॉक्साईट आहे. ही जागा लीजवर दिल्यामुळे पावनखिंडीच्या बाजूने सडा खोदण्यास प्रारंभ झाला आहे. पावनखिंडीलगतच्या सड्यावर थेट झाडीतून रस्ते काढून मशिनरीची घरघर गती घेत आहे. गेल्या महिन्याभरात पन्नास हजार टनांपर्यंत खनिजांचे उत्खनन केले आहे. वनविभागाने रस्ता अडविल्याने खनिज जाग्यावरच पडले आहे. अन्य वाहनांची ये-जा मात्र पावनखिंडीला जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरून चालू आहे. खाणीवर बंदी न आणल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडूनच राष्ट्रीय अस्मितेवर घालाशाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सुमारे दोन हजार मिली मीटरपेक्षा जास्त पाउस पडतो. या खाणीमुळे जंगल नष्ट होईलच शिवाय पावसाचे प्रमाणही कमी होईल. विपुल वनौषधी तसेच शेखरू, मॉरमन, हरियाल, गेळा, जारूळ नामशेष होण्याची शक्यता आहे. शासन पावनखिंडीलगतच्या उत्खननाला परवानगी देऊन राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालत असल्याचा आरोप मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी केला आहे. बॉक्साईट उत्खनन सुरू असले, तरी वनविभागाने वाहतुकीचा रस्ता रोखला आहे. केंबुणेर्वाडी, गजापूर, भाततळी, मालाईधनगरवाडा, पांढरेपाणी, आदी गावांतील ग्रामस्थांना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकीचा त्रास होणार आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.