शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दूधगंगेचा एकही थेंब इचलकरंजीला देणार नाही, सुळकुड योजनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:33 IST

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगेचे पाणी सुळकूड योजनेंर्तगत नेण्यासाठीचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून, त्याला भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

कोल्हापूर : दूधगंगा नदी प्रकल्पासाठी आम्ही कष्टाने कमावलेली जमीन दिली आहे, हे पाणी भागातील गावकऱ्यांच्या-शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, यातील एक थेंब पाणीहीइचलकरंजीला नेऊ देणार नाही, असा निर्धार करत भागातील शेतकऱ्यांनी सुळकूड पाणी योजनेविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उशाला असलेल्या पंचगंगेचे पाणी स्वच्छ करा, कृष्णा नदी योजनेची गळती काढून हवे तेवढे पाणी इचलकरंजीला द्या, पण दूधगंगेचे पाणी नेण्याचा प्रयत्न झाला तर शासकीय अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याबाबतचे निवेदन दिले.

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगेचे पाणी सुळकूड योजनेंर्तगत नेण्यासाठीचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून, त्याला भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आपला हा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, सुळकूड पाणी योजना रद्द झालीच पाहिजे, देणार नाही देणार नाही, पाणी आम्ही देणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.

विजय देवणे म्हणाले, सुळकूड योजना राबवण्यासाठी जे कोणी अधिकारी गावांमध्ये येतील त्यांना काम करू दिले जाणार नाही. त्यांना कोंडून पुढील टप्प्यात ज्या राजकारण्यांचा या योजनेला पाठिंबा आहे त्यांच्या घरावर मोर्चो काढू. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, दूधगंगेतील एक थेंबही पाणी इचलकरंजीला देणार नाही. नदीतील ०.५ टीएमसी पाण्यावर भागणार नाही, पुढे जाऊन ही गरज वाढणार आहे. अंबरिष घाटगे म्हणाले, पुढच्या पिढीचा विचार करून शेतकरी यात सहभागी झाले आहेत. प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात.

भवानीसिंग घोरपडे म्हणाले, दूधगंगा प्रकल्पासाठी सगळ्यांनी आपली शेती दिली आहे. पंचगंगेचे पाणी इचलकरंजी येथील उद्योगांनीच दूषित कले आहे. ते स्वच्छ करा, कृष्णा योजनेची गळती काढा, इचलकरंजीचा पाणीप्रश्न मिटेल. प्रमोद पाटील, बाबासाहेब पाटील म्हणाले, दूधगंगा प्रकल्पासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांचा या पाण्यावर हक्क आहे. कुणीही यावं आणि आमचं पाणी न्यावं असं होऊ देणार नाही. राजू पवार म्हणाले, सुळकूड योजनेसाठीचे १५६ कोटी रुपये पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी वापरावेत.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, स्थानिक नागरिकांची सिंचन, पिण्यासाठी, औद्योगिक व अन्य कारणांसाठीची गरज भागवून उरलेले पाणी देण्यात येईल. तुमच्या हक्काच्या पाण्याला कोणीही हात लावणार नाही, त्यामुळे घाबरू नका. तांत्रिक मान्यता घेताना प्रकल्पासाठी एमजेपीला पंचगंगेेऐवजी दूधगंगेचे पाणी का वापरणार याची कारणमीमांसा द्यावी लागते. ते कारण योग्य असेल तर प्रकल्पाचा विचार होईल. कागल, शिरोळ, सुळकूडसह पंचक्रोशीतील विविध गावांमधील हजारावर नागरिक, शेतकरी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते.

अभियंता असाल प्रशासक नाही

जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे पाणी योजनेतील बाबी समजावून सांगत असताना मध्येच एकजण म्हणाला, हे काही आपण काही सांगू नका, मी सिव्हिल इंजिनिअर आहे. तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे. यातलं काही घडत नसतं. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही अभियंता असाल, पण प्रशासक नाही. प्रशासनाचे अधिकार तुम्हाला नाहीत, एवढेच असेल तर इरिगेशनमध्ये जाऊन नियमांची माहिती करून घ्या, असे सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीichalkaranji-acइचलकरंजी