शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:03 IST

पी.एन.पाटील जयंतीनिमित्त निर्धार

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला, तरी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील साडेअकरा लाखांहून मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे. या मतदारांना वाऱ्यावर सोडायचे नाही. त्यामुळे पराभवाने हिंमत हरू नका, आहे ही एकी कायम ठेवा, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आपण पुन्हा भरारी घेऊ, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेद जागवली. यावेळी त्यांनी सगळे संपली नाही, अजून बरेच काही शिल्लक आहे, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असल्याचा संदेशही दिला.माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, राजेंद्र मोरे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, पी.एन.पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जात होते. त्यांच्या निष्ठेचा हाच विचार आपण तेवत ठेवूया. शाहू छत्रपती म्हणाले, पी.एन.पाटील हे एकनिष्ठतेचे उदाहरण होते. पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिले. कार्यकर्त्यांनीही त्यांचे एकनिष्ठ विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.के.पी.पाटील म्हणाले, १९८५ पासून पी.एन. यांच्याबरोबर जिल्हा बँकेत एकत्र काम केले. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आमचे पक्ष वेगळे झाले. मात्र, त्यात कधीच कटुता आली नाही. एकनिष्ठतेचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शेकापचे बाबूराव कदम, उदय नारकर, भारती पोवार, सतीशचंद्र कांबळे, डी.जी.भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धैर्यशील पाटील कौलवकर, दिलीप पवार, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, हिंदुराव चौगले, भारत पाटील भुयेकर, सरलाताई पाटील उपस्थित होते. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले.करवीरचे ते मताधिक्य गेले कुठे?लोकसभा निवडणुकीत मला ७४ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला मात्र हे मताधिक्य गेले कुठे? असा सवाल शाहू छत्रपती यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस