शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नंदवाळ विकासाच्या उंबरठ्यावर, पण ‘बटालियन’-ग्रामस्थांमध्ये हवा समन्वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:57 IST

बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले.

कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील भारत राखीव बटालियनची आरक्षित सुमारे ११७ एकर जागा विस्तारीकरणासाठी यंत्रणा देऊन ज्यांनी हातभार लावला, आता तेच विरोध करून सदर जागा गावच्या ताब्यात राहण्यासाठी जीवाचे रान पेटवत आहेत.

नंदवाळ तीर्थक्षेत्राला शासनाने ‘ब’ दर्जा दिल्याने ही जागा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हवी असल्याबाबत ग्रामस्थ ठाम आहेत. खरंतर याच जागेशेजारी गटनंबर ५२० मधील सुमारे ६५ एकर असलेल्या गायरान जागेचा पर्याय ग्रामस्थांनी विकासासाठी पुढे करणे सोयीचे ठरणार आहे. हा वाद विकोपाला जाताना लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीसाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.नंदवाळ (ता. करवीर) गावातील गट नं. ६३ ची ११७ एकर गायरान जागा शासनाने भारत राखीव बटालियन क्र. ३ ला अडीच वर्षांपूर्वी दिली. जागेच्या सपाटीकरणासाठी गावातील जेसीबी, ट्रॅक्टर, ट्राॅलीसह यंत्रणा लागली. सध्या येथे दिवसभर ८०० हून अधिक जवानांच्या सात तुकड्या कवायती करतात.बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले. बटालियनच्या एकूण जमिनीपैकी ६५ एकर ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, त्या बदल्यात गट नं. ५२० ची ६५ एकर जागा बटालियनने घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणखासगी ॲकॅडमीमध्ये तरुणांना लाखो रुपये शुल्क आकारून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. पण या बटालियनच्या जागेत नंदवाळ परिससरातील सुमारे ६० हून अधिक तरुणांना विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे.

तलाव आणि बटालियननंदवाळ गायरानमध्ये १९९० मध्ये माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी तलाव मंजूर करून २००५ मध्ये त्याचे काम पूर्ण केले. तलाव पूर्ण करतानाही त्यावेळीही काहींनी विरोध केला होता. तलावासाठीच्या जागेची माेजणी, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम मध्यरात्रीच पोलीस बंदोबस्तात पूर्ण केले होते; पण त्याच तलावामुळे सध्या गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

कोल्हापूर मागेचभारत राखीव दलाचा गट आपल्या गावात स्थापन व्हावा यासाठी अनेक ठिकाणांहून मागणी असते. हा गट स्थापन झाल्यानंतर शेजारील गावात विकासगंगा वाहते, असे समजले जाते. कोल्हापूरनंतर राज्यात गडचिरोली, पुसटगाव (अहमदनगर), अकोला, चंद्रपूर येथे बटालियनचे गट स्थापन झाले, तेथे गटावर बांधकामेही सुरू झाली, पण नंदगाव (कोल्हापूर)मध्ये आंदोलनामुळे गटाला विकासकामाची गती येईना असे काहींनी बोलून दाखविले.

दरमहा ५ ते ६ कोटी पगार

सध्या ८०० जवानांवर दरमहा पाच ते ६ कोटी रुपये वेतनापोटी खर्च होतात. पूर्ण क्षमतेने गट सुरू झाल्यास जवानांची संख्या वाढणार, १० कोटीपर्यत वेतनावर खर्च होणार आहे. त्याच्या निवासासाठी उभारलेल्या क्वाॅटर्समध्ये कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. त्यांना दैनंदिन व्यवहारासाठी नंदवाळ गावकऱ्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात विकासाची गंगा वाहणार आहे.

जमीन हस्तांतराचा आदेश निघताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही, आमचा बटालियनला विरोध नाही, पण तीर्थक्षेत्र विकासासाठी ‘बटालियन’ने जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे द्यावी.- अस्मिता युवराज कांबळे, सरपंच, नंदवाळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर