शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नंदवाळ विकासाच्या उंबरठ्यावर, पण ‘बटालियन’-ग्रामस्थांमध्ये हवा समन्वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:57 IST

बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले.

कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील भारत राखीव बटालियनची आरक्षित सुमारे ११७ एकर जागा विस्तारीकरणासाठी यंत्रणा देऊन ज्यांनी हातभार लावला, आता तेच विरोध करून सदर जागा गावच्या ताब्यात राहण्यासाठी जीवाचे रान पेटवत आहेत.

नंदवाळ तीर्थक्षेत्राला शासनाने ‘ब’ दर्जा दिल्याने ही जागा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हवी असल्याबाबत ग्रामस्थ ठाम आहेत. खरंतर याच जागेशेजारी गटनंबर ५२० मधील सुमारे ६५ एकर असलेल्या गायरान जागेचा पर्याय ग्रामस्थांनी विकासासाठी पुढे करणे सोयीचे ठरणार आहे. हा वाद विकोपाला जाताना लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीसाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.नंदवाळ (ता. करवीर) गावातील गट नं. ६३ ची ११७ एकर गायरान जागा शासनाने भारत राखीव बटालियन क्र. ३ ला अडीच वर्षांपूर्वी दिली. जागेच्या सपाटीकरणासाठी गावातील जेसीबी, ट्रॅक्टर, ट्राॅलीसह यंत्रणा लागली. सध्या येथे दिवसभर ८०० हून अधिक जवानांच्या सात तुकड्या कवायती करतात.बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले. बटालियनच्या एकूण जमिनीपैकी ६५ एकर ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, त्या बदल्यात गट नं. ५२० ची ६५ एकर जागा बटालियनने घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणखासगी ॲकॅडमीमध्ये तरुणांना लाखो रुपये शुल्क आकारून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. पण या बटालियनच्या जागेत नंदवाळ परिससरातील सुमारे ६० हून अधिक तरुणांना विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे.

तलाव आणि बटालियननंदवाळ गायरानमध्ये १९९० मध्ये माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी तलाव मंजूर करून २००५ मध्ये त्याचे काम पूर्ण केले. तलाव पूर्ण करतानाही त्यावेळीही काहींनी विरोध केला होता. तलावासाठीच्या जागेची माेजणी, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम मध्यरात्रीच पोलीस बंदोबस्तात पूर्ण केले होते; पण त्याच तलावामुळे सध्या गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

कोल्हापूर मागेचभारत राखीव दलाचा गट आपल्या गावात स्थापन व्हावा यासाठी अनेक ठिकाणांहून मागणी असते. हा गट स्थापन झाल्यानंतर शेजारील गावात विकासगंगा वाहते, असे समजले जाते. कोल्हापूरनंतर राज्यात गडचिरोली, पुसटगाव (अहमदनगर), अकोला, चंद्रपूर येथे बटालियनचे गट स्थापन झाले, तेथे गटावर बांधकामेही सुरू झाली, पण नंदगाव (कोल्हापूर)मध्ये आंदोलनामुळे गटाला विकासकामाची गती येईना असे काहींनी बोलून दाखविले.

दरमहा ५ ते ६ कोटी पगार

सध्या ८०० जवानांवर दरमहा पाच ते ६ कोटी रुपये वेतनापोटी खर्च होतात. पूर्ण क्षमतेने गट सुरू झाल्यास जवानांची संख्या वाढणार, १० कोटीपर्यत वेतनावर खर्च होणार आहे. त्याच्या निवासासाठी उभारलेल्या क्वाॅटर्समध्ये कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. त्यांना दैनंदिन व्यवहारासाठी नंदवाळ गावकऱ्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात विकासाची गंगा वाहणार आहे.

जमीन हस्तांतराचा आदेश निघताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही, आमचा बटालियनला विरोध नाही, पण तीर्थक्षेत्र विकासासाठी ‘बटालियन’ने जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे द्यावी.- अस्मिता युवराज कांबळे, सरपंच, नंदवाळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर