शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नंदवाळ विकासाच्या उंबरठ्यावर, पण ‘बटालियन’-ग्रामस्थांमध्ये हवा समन्वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:57 IST

बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले.

कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील भारत राखीव बटालियनची आरक्षित सुमारे ११७ एकर जागा विस्तारीकरणासाठी यंत्रणा देऊन ज्यांनी हातभार लावला, आता तेच विरोध करून सदर जागा गावच्या ताब्यात राहण्यासाठी जीवाचे रान पेटवत आहेत.

नंदवाळ तीर्थक्षेत्राला शासनाने ‘ब’ दर्जा दिल्याने ही जागा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हवी असल्याबाबत ग्रामस्थ ठाम आहेत. खरंतर याच जागेशेजारी गटनंबर ५२० मधील सुमारे ६५ एकर असलेल्या गायरान जागेचा पर्याय ग्रामस्थांनी विकासासाठी पुढे करणे सोयीचे ठरणार आहे. हा वाद विकोपाला जाताना लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीसाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.नंदवाळ (ता. करवीर) गावातील गट नं. ६३ ची ११७ एकर गायरान जागा शासनाने भारत राखीव बटालियन क्र. ३ ला अडीच वर्षांपूर्वी दिली. जागेच्या सपाटीकरणासाठी गावातील जेसीबी, ट्रॅक्टर, ट्राॅलीसह यंत्रणा लागली. सध्या येथे दिवसभर ८०० हून अधिक जवानांच्या सात तुकड्या कवायती करतात.बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले. बटालियनच्या एकूण जमिनीपैकी ६५ एकर ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, त्या बदल्यात गट नं. ५२० ची ६५ एकर जागा बटालियनने घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणखासगी ॲकॅडमीमध्ये तरुणांना लाखो रुपये शुल्क आकारून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. पण या बटालियनच्या जागेत नंदवाळ परिससरातील सुमारे ६० हून अधिक तरुणांना विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे.

तलाव आणि बटालियननंदवाळ गायरानमध्ये १९९० मध्ये माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी तलाव मंजूर करून २००५ मध्ये त्याचे काम पूर्ण केले. तलाव पूर्ण करतानाही त्यावेळीही काहींनी विरोध केला होता. तलावासाठीच्या जागेची माेजणी, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम मध्यरात्रीच पोलीस बंदोबस्तात पूर्ण केले होते; पण त्याच तलावामुळे सध्या गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

कोल्हापूर मागेचभारत राखीव दलाचा गट आपल्या गावात स्थापन व्हावा यासाठी अनेक ठिकाणांहून मागणी असते. हा गट स्थापन झाल्यानंतर शेजारील गावात विकासगंगा वाहते, असे समजले जाते. कोल्हापूरनंतर राज्यात गडचिरोली, पुसटगाव (अहमदनगर), अकोला, चंद्रपूर येथे बटालियनचे गट स्थापन झाले, तेथे गटावर बांधकामेही सुरू झाली, पण नंदगाव (कोल्हापूर)मध्ये आंदोलनामुळे गटाला विकासकामाची गती येईना असे काहींनी बोलून दाखविले.

दरमहा ५ ते ६ कोटी पगार

सध्या ८०० जवानांवर दरमहा पाच ते ६ कोटी रुपये वेतनापोटी खर्च होतात. पूर्ण क्षमतेने गट सुरू झाल्यास जवानांची संख्या वाढणार, १० कोटीपर्यत वेतनावर खर्च होणार आहे. त्याच्या निवासासाठी उभारलेल्या क्वाॅटर्समध्ये कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. त्यांना दैनंदिन व्यवहारासाठी नंदवाळ गावकऱ्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात विकासाची गंगा वाहणार आहे.

जमीन हस्तांतराचा आदेश निघताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही, आमचा बटालियनला विरोध नाही, पण तीर्थक्षेत्र विकासासाठी ‘बटालियन’ने जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे द्यावी.- अस्मिता युवराज कांबळे, सरपंच, नंदवाळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर