शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अस्वस्थतेचे ‘अर्थ’कारण महानगरपालिकेचे राजकारण : पदं वाटताना वशिलेबाजीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:30 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना दिली जाणारी पसंती, चार सदस्य असलेल्या शिवसेना नगरसेवकांची होणारी मनधरणी आणि सतत जाणविणारी आर्थिक विवंचना यामुळे काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसमध्ये ...

भारत चव्हाण ।कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना दिली जाणारी पसंती, चार सदस्य असलेल्या शिवसेना नगरसेवकांची होणारी मनधरणी आणि सतत जाणविणारी आर्थिक विवंचना यामुळे काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसमध्ये वर्षभरापासून धुसफूस सुरू असून, त्याचा परिपाक सोमवारी स्थायी समिती सभापतिपद गमाविण्यात झाला.

काँग्रेस-राष्ट्वादी च्या नेत्यांनी जर आपल्या वृत्तीत तातडीने बदल करून सर्वांना विश्वास दिला नाही, तर मे महिन्यात होणाºया महापौर-उपमहापौर निवडणुकीतसुद्धा गोंधळ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षांपासून विविध कारणांनी काँग्रेस व राष्ट्वादी तील अनेक नगरसेवक नाराज आहेत. या नाराजीचा लाभ उठविण्याकरिता विरोधी गटाशी हातमिळवणी करून काही व्यावसायिक ‘कारभारी नगरसेवक’ लाभ उठवत आहेत. नेते मात्र अशा ‘कारभाºयां’वरच विसंबून राहत असल्यामुळे नेते आणि नगरसेवक यांच्यातील समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. ‘पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाय, जातोय कुठं’ ही कारभाºयांची मानसिकता आघाडी फुटीला कारणीभूत ठरत आहे.

काँग्रेस-राष्टÑवादीतील धुसफूस ही पदं वाटपात होणारी वशिलेबाजी तर आहेच, शिवाय वेगवेगळ्या कामांत होत असलेल्या आर्थिक उलाढालीदेखील आहेत. स्थायी समिती सभापतींसह ठरावीक कारभाºयांनी एखादे काम आणायचं आणि त्यात तोडपाणी करायचे. कोट्यवधींचा मलिदा मोजक्या तीन-चार लोकांनी वाटून घ्यायचा आणि बाकीच्यांना फक्त गाजरे दाखवायची; ही वृत्ती बळावली आहे. मिळाल्याचा जेवढा आनंद होत नाही त्यापेक्षा जास्त दु:ख न मिळाल्याचे आहे. काही दिवसांपूर्वी असंतुष्टांनी निनावी पत्राद्वारे कोणी किती मिळविले याचे आकडेच जाहीर केले होते.आत्महत्येची भाषानिवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.आत्महत्येची भाषानिवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.घर जाळून कोळशाचा व्यापारनगरसेवक म्हणजे प्रतिष्ठेचे पद; पण या खोट्या प्रतिष्ठेसाठी महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक कर्ज काढून निवडणूक लढले. निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांना चांगलाच पश्चात्ताप झालाय. इथं काही ठराविकांनाच पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य नगरसेवकांना काहीच मिळत नाही याची खात्री त्यांना पटली आहे. ‘फुकटची हमाली आणि घर जाळून कोळशाचा व्यापार’ करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातूनच नगरसेवकांच्या मोठ्या समूहात अस्वस्थता आहे.वाटी तो बोटं चाटीमलिदा वाटपात जसा दुुजाभाव केला जातो, तसाच तो राज्य व कें द्र सरकारच्या निधीतही केला जातो, अशा तक्रारी आहेत. सरकारचा निधी सर्वांना समान देण्यात यावा, अशी मागणी केली जाते, परंतु काही ठरावीक पदाधिकारी त्यातील जादा निधी त्यांच्या भागाकडे वळवतात. दलितेतर निधी वाटपात असाच गदारोळ झाला. साडेतीन कोटींचा निधी काही पदाधिकारी घेणार आहेत, असं कळताच त्याची तक्रार झाली. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील ५० टक्के निधी स्थानिक आमदार सुचवतील त्या कामांवर खर्च करा, असे सांगावे लागले. गेले दोन वर्षे या निधीतून करायच्या कामांचा घोळ सुरू आहे.