शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अस्वस्थतेचे ‘अर्थ’कारण महानगरपालिकेचे राजकारण : पदं वाटताना वशिलेबाजीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:30 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना दिली जाणारी पसंती, चार सदस्य असलेल्या शिवसेना नगरसेवकांची होणारी मनधरणी आणि सतत जाणविणारी आर्थिक विवंचना यामुळे काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसमध्ये ...

भारत चव्हाण ।कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना दिली जाणारी पसंती, चार सदस्य असलेल्या शिवसेना नगरसेवकांची होणारी मनधरणी आणि सतत जाणविणारी आर्थिक विवंचना यामुळे काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसमध्ये वर्षभरापासून धुसफूस सुरू असून, त्याचा परिपाक सोमवारी स्थायी समिती सभापतिपद गमाविण्यात झाला.

काँग्रेस-राष्ट्वादी च्या नेत्यांनी जर आपल्या वृत्तीत तातडीने बदल करून सर्वांना विश्वास दिला नाही, तर मे महिन्यात होणाºया महापौर-उपमहापौर निवडणुकीतसुद्धा गोंधळ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षांपासून विविध कारणांनी काँग्रेस व राष्ट्वादी तील अनेक नगरसेवक नाराज आहेत. या नाराजीचा लाभ उठविण्याकरिता विरोधी गटाशी हातमिळवणी करून काही व्यावसायिक ‘कारभारी नगरसेवक’ लाभ उठवत आहेत. नेते मात्र अशा ‘कारभाºयां’वरच विसंबून राहत असल्यामुळे नेते आणि नगरसेवक यांच्यातील समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. ‘पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाय, जातोय कुठं’ ही कारभाºयांची मानसिकता आघाडी फुटीला कारणीभूत ठरत आहे.

काँग्रेस-राष्टÑवादीतील धुसफूस ही पदं वाटपात होणारी वशिलेबाजी तर आहेच, शिवाय वेगवेगळ्या कामांत होत असलेल्या आर्थिक उलाढालीदेखील आहेत. स्थायी समिती सभापतींसह ठरावीक कारभाºयांनी एखादे काम आणायचं आणि त्यात तोडपाणी करायचे. कोट्यवधींचा मलिदा मोजक्या तीन-चार लोकांनी वाटून घ्यायचा आणि बाकीच्यांना फक्त गाजरे दाखवायची; ही वृत्ती बळावली आहे. मिळाल्याचा जेवढा आनंद होत नाही त्यापेक्षा जास्त दु:ख न मिळाल्याचे आहे. काही दिवसांपूर्वी असंतुष्टांनी निनावी पत्राद्वारे कोणी किती मिळविले याचे आकडेच जाहीर केले होते.आत्महत्येची भाषानिवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.आत्महत्येची भाषानिवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.घर जाळून कोळशाचा व्यापारनगरसेवक म्हणजे प्रतिष्ठेचे पद; पण या खोट्या प्रतिष्ठेसाठी महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक कर्ज काढून निवडणूक लढले. निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांना चांगलाच पश्चात्ताप झालाय. इथं काही ठराविकांनाच पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य नगरसेवकांना काहीच मिळत नाही याची खात्री त्यांना पटली आहे. ‘फुकटची हमाली आणि घर जाळून कोळशाचा व्यापार’ करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातूनच नगरसेवकांच्या मोठ्या समूहात अस्वस्थता आहे.वाटी तो बोटं चाटीमलिदा वाटपात जसा दुुजाभाव केला जातो, तसाच तो राज्य व कें द्र सरकारच्या निधीतही केला जातो, अशा तक्रारी आहेत. सरकारचा निधी सर्वांना समान देण्यात यावा, अशी मागणी केली जाते, परंतु काही ठरावीक पदाधिकारी त्यातील जादा निधी त्यांच्या भागाकडे वळवतात. दलितेतर निधी वाटपात असाच गदारोळ झाला. साडेतीन कोटींचा निधी काही पदाधिकारी घेणार आहेत, असं कळताच त्याची तक्रार झाली. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील ५० टक्के निधी स्थानिक आमदार सुचवतील त्या कामांवर खर्च करा, असे सांगावे लागले. गेले दोन वर्षे या निधीतून करायच्या कामांचा घोळ सुरू आहे.