शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:29 IST

शेतकरी संघर्ष समिती आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा नेणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी करत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा, देश वाचवा, जय जवान, जय किसान, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड व आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

फोंडे म्हणाले, महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, हे खोटे आहे. दहा जिल्ह्यांतील आंदोलनाने त्यांचे खोटे उघडे पडले आहे. कोल्हापुरात दोन मंत्र्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा. यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संकपाळ यांची भाषणे झाली.महामार्ग रद्दच, चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष कराभुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली. यावर आबिटकर यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला आहे, त्यामुळे महामार्ग करा, असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे शेतकऱ्यांना सांगितले.

या केल्या मागण्या

  • कोल्हापुरातील सहा तालुक्यांतील अधिसूचना रद्द केल्याच्या शासन आदेशाप्रमाणे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा जाणार, याचा उल्लेख असलेले नोटिफिकेशन काढा.
  • काही तालुक्यांमध्ये सुपाऱ्या घेऊन एजंटगिरी करणारे शक्तिपीठ महामार्ग करा, असे सांगत आहेत अशांना सत्ताधारी आमदारांचे समर्थन आहे काय, याचे स्पष्टीकरण द्यावे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन