शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 5:29 PM

water shortage Grampanchyat Kolhapur- धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.

ठळक मुद्देधामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद थकबाकी वसुलीसाठी उचलले पाऊल

श्रीकांत ऱ्हायकरधामोड (ता. राधानगरी) :  येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.धामोड येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये नऊनंबर, लाडवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी व तुळशी धरण वसाहत या गावांचा समावेश होतो. या सर्व गावांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सध्या या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे.

पण गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या मिळकत उत्पन्नातील घरफाळा व पाणीपट्टीचे जवळपास सोळा लाख रुपये थकल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यातच थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज महामंडळाने तगादा लावला आहे. पण ग्रामपंचायतीकडे हे वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यास या सर्वच गावचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. याची पूर्व कल्पना म्हणून गावातून वारंवार दौंडी देऊन लोकांना पाणीपट्टी व घरफाळा भरण्याचे आवाहन केले आहे. पण लोकांनी या आवाहनाला दाद न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कालच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गावकऱ्यांकडून घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य न मिळाल्यास एक फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण डिमांड व वसुली यांचा विचार केला असता लाईट बिल व इतर खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य असल्याची बाब सर्व सदस्यांना सांगीतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय बैठकअंती घेतला आहे .-एल. एस. इंगळेग्रामसेवक, धामोड.

थकित घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन धामोड वाशीयांना वारंवार करून देखील ते भरण्याची तसदी त्यांनी न घेतल्याने नाईलाजास्तव ही कठोर पावले उचलावी लागणार आहेत .- अशोक सुतारसरपंच, ग्रामपंचायत, धामोड

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर