शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:56 IST

BloodBank Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढले : रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी होत आहे. कॅन्सर, हाडाचे आजार, प्रसूती, अपघातामुळे रुग्ण वाढले असून आता हॉस्पिटलमधून रक्ताची मागणी होऊ लागली आहे. त्यात कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई भासत आहे. यासाठी आता रक्तदानाची गरज असून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.कधी रक्तदान करावे

  • कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर चौदा दिवसांनंतर
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी
  • पुरुषांनी दर तीन महिन्याला
  • महिलांनी दर चार महिन्याला 

शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्तदानमानवी शरीरात (१८ ते ६५ वयोगटातील व ४५ किलोपेक्षा अधिक वजन) ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील ५ टक्के म्हणजेच ३५० ते ४५० मिली रक्त एका वेळी घेतले आहे.महिलांचे रक्तदानाचे प्रमाण ७ टक्केरक्तदानाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर देशात ७ टक्केच महिला रक्तदान करतात. रक्तदानाची मानसिकता असते. मात्र, फास्ट फूडचे सेवन, सकस आहार व व्यायामाचा अभाव, अनियमित मासिक पाळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी असते.जिल्ह्यात २५० थॅलेस्मियाचे रुग्णथॅलेस्मिया, डायलेसिस रुग्णांना महिन्याला रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २५० हून अधिक ह्यथॅलेस्मियाह्णचे रुग्ण असल्याने त्यांना मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.जून महिन्यात एक हजार प्लेटलेटची मागणीयंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्यात ऊन-पावसामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले. जून महिन्यात जिल्ह्यात एक हजार प्लेटलेटची मागणी विविध रक्तपेढ्यांतून झाली.

लोकमतने नेहमीच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले. सध्या रक्ताची टंचाई ओळखून राज्यभर रक्तदानाची मोहीम राबवण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.- प्रकाश घुंगूरकर ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर