शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:27 IST

लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत.

ठळक मुद्देकोणत्याही शंका उपस्थित न करता लोकांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान केले आहेशहरांतही उजव्या विचारांचा प्रभाव असणारा मोठा वर्ग आहेशुक्रवारी दिवसभर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याबद्दलच चिंता व्यक्त झाली.

विश्र्वास पाटील : कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. या पक्षांच्यामागे गेलेला मतदार परत आणण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे; त्यामुळे शुक्रवारी दिवसभर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याबद्दलच चिंता व्यक्त झाली.

 

कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे तब्बल दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी विजयी झाले. हातकणंगलेतून शिवसेनेचेच धैर्यशील माने हे ९६ हजार ३९ मतांनी विजयी झाले. मंडलिक विजयी होतील अशी हवा अगोदर तयार झाली होती. हातकणंगलेत मात्र माने की राजू शेट्टी हा संभ्रम होता. म्हणजे दोन्ही मतदारसंघात लढत अटीतटीची होती. कोणी निवडून आले तर मताधिक्य पाच-पंचवीस हजारांपेक्षा जास्त असणार नाही, असे उमेदवारांचे समर्थकच बोलून दाखवित होते; परंतु तरीही प्रत्यक्ष निकालात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांना एकाही फेरीत मताधिक्य तरी मिळाले नाही. मंडलिक यांचे मताधिक्य तर त्यांच्यासह सर्वांनाच अचंबित करणारे आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी कॅम्पेन राबविली; त्यामुळे त्यांचा विजय साकारला हे खरे असले, तरी ही मोहीम व महाडिक नकोत या जनभावनेचे हे एवढे लीड नाही. त्यामागे तरुण, प्रथम मतदार, सुशिक्षित, मध्यम व उच्च मध्यमवर्ग, व्यापारी उद्योजकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच मोदी यांच्याबद्दल वाटत असलेली क्रेझ हेच महत्त्वाचे कारण आहे. मोदी प्रश्न सोडवतील, यापेक्षा मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील ही धार्मिक खुमखुमी जास्त होती; त्यामुळे उमेदवार कोण आहेत, ते आपले प्रश्न सोडवतील का, त्यांचे राजकीय चारित्र्य कसे आहे, असल्या कोणत्याही शंका उपस्थित न करता लोकांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान केले आहे; त्यामुळेच मताधिक्याचा काटा कीर्र झाला आहे. हाच खरा धोका आहे.

मंडलिक यांना कागल मतदारसंघात सर्वाधिक ७१४२७ चे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात प्रमुख तीन गट त्यांच्या बाजूने होते; त्यामुळे लीड अपेक्षितच होते. दक्षिण मतदारसंघातून मंडलिक यांना मिळालेले लीड एकट्या सतेज पाटील गटाचे नाही. त्यामध्ये भाजपला मानणाºया हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचाही त्यात वाटा आहे; कारण या मतदारसंघात शहरी भाग निम्मा आहे. हीच स्थिती चंदगड, राधानगरी, करवीर व उत्तर मतदार संघातील आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार असूनही जिथे शिवसेनेचे आमदार आहेत त्यापेक्षा कागल, चंदगड व दक्षिण मतदारसंघाने त्यांना जास्त लीड दिले आहे. शिवसेनेच्या आमदारांतही शहरातून लीड कमी मिळाले; कारण या मतदारसंघात महाडिक गटाला मानणारा वर्ग आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही धैर्यशील माने यांना तब्बल ७४९३० मतांची आघाडी मिळाली. या शहरांतही उजव्या विचारांचा प्रभाव असणारा मोठा वर्ग आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपचे सुरेश हाळवणकर हे दोनवेळा विजयी झाले आहेत. त्यांनी माने यांना दिलेले लीड काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांचे ठोके वाढविणारे आहे.

शुक्रवारी राजू शेट्टी यांना भेटायला आलेल्या काँग्रेस व त्यातही आवाडे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही हीच चिंता सतावत होती. दोन्ही काँग्रेसची अभेद्य एकजूट, त्यास वंचित आघाडीसह इतर डाव्या, पुरोगामी पक्षांची मनांपासून मदत झाली तरच विधानसभेला या पक्षांच्या उमेदवारांचा निभाव लागणार आहे. त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच करण्याची गरज आहे.शाहूवाडीत २१७४३ चे लिडगेल्या लोकसभा निवडणूकीत शेट्टी यांना शाहूवाडी मतदार संघातून ४२९०० मतांचे लिड मिळाले होते. या निवडणूकीत ते फेडून धैर्यशील माने यांनी धनुष्यबाण चिन्हांवर २१७४३ चे लिड मिळाले. आपल्याला धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागू नये यासाठी माजी आमदार विनय कोरे यांनी या निवडणूकीतून अंग काढून घेतले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांचे काम केल्याची चर्चा होती तरीही माने यांना चांगले मताधिक्य मिळाले असल्याने कोरे यांचीही धाकधूक वाढली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVinay Koreविनय कोरेHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ