शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

‘प्रतिसाद’च्या पोतदारची आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

कर्जबाजारीपणास कंटाळून कृत्य

कोल्हापूर : वादग्रस्त ‘प्रतिसाद मिल्क’ व इव्हेंट कंपनीचा प्रमुख अमोल बाळासाहेब पोतदार (वय ३१, रा. शाहूनगर) याने गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास राजारामपुरी शाहूनगरातील राहत्या घरी हाताच्या शिरा ब्लेडने कापून घेऊन व गळफास लावून आत्महत्या केली.कर्जबाजारीपणा व प्रकृतीच्या कारणावरून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार व ‘किसान शक्ती’ मासिकाचे संपादक बाळ पोतदार यांचा तो मुलगा होय. / पोलिसांनी सांगितले, अमोल आई-वडील व पत्नीसमवेत शाहूनगरात राहत होता. आज सकाळी तो कुठेतरी बाहेरून जावून आला. दुपारी घरी आल्यानंतर जेवण करून बेडरूममध्ये गेला. चारच्या सुमारास त्याने आईकडे चहा मागितला. बराच वेळ तो चहा पिण्यास न आल्याने आई शकुंतला पोतदार त्याला बोलविण्यासाठी गेल्या असता बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्यांनी हाक मारली असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जोराने दरवाजा ढकलला असता तो सिलिंग फॅनला लटकत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केला. यावेळी त्याचे वडील, पत्नी व शेजारील लोक पळत आले. बेडरूममध्ये सर्वत्र रक्त सांडले होते व त्याचा तिथेच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोलचा मृतदेह खाली उतरला. त्याची पाहणी केली असता उजव्या हाताची शीर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसून आल्या. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला. एका चांगल्या कुटुंबातील तरुणाने झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी पत्करलेला मार्ग अखेर आत्महत्येपर्यंत गेल्याची प्रतिक्रिया अमोल याच्या निधनानंतर उमटली. अमोल राजाराम महाविद्यालयात शिकला. प्रकृतीनेही तो सडपातळ होता. परंतु सतत काहीतरी भानगडी करण्याचा हव्यास होता. वर्षभरापूर्वी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावतो म्हणून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यात त्याला अटकही झाली होती. या प्रकरणात त्याने तत्कालिन स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यावरही अपहरणाचा आरोप केला होता. या प्रकरणी देशमुख यांना अटकही झाली होती. हे प्रकरणही राज्यभर बरेच गाजले होते. त्याचा तपास अजून सुरुच आहे. तोपर्यंत त्याने ‘प्रतिसाद’ ग्रुप आॅफ कंपनीज ही कंपनी स्थापन केली व त्यामार्फत अगोदर पुण्यात ‘प्रतिसाद’ दूध योजना सुरू केली. ‘सहा हजार रुपये भरून एक लिटर दूध वर्षभर घरपोच’ अशी ही योजना होती. ती पुण्यात अडचणीत आल्यावर कोल्हापुरात सुरू केली. नव्या ग्राहकांकडून पैसे घेऊन जुन्या ग्राहकांना दूध पुरवठा करायचा, असा फंडा तो वापरत होता. परंतु ही फसवणूक फार काळ चालली नाही. १२ आॅगस्टपासून कोल्हापुरातही ही योजना बंद पडली. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. शिवाय लोकांचाही पैशांसाठी तगादा सुरू होता. या सगळ््यालाच कुलूप घालून तो कायमचाच निघून गेला.कमी रक्तदाबाचा त्रास अमोलला कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. काल, बुधवारी तो रुग्णालयातून घरी आला. आज दुपारी ध्यान करणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते. गेल्या चार महिन्यांपासून त्याचे पत्नीशीही भांडण झाले होते. त्यामुळे ते दोघे परस्परांशी बोलत नव्हते, असे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले...तरीही असेल गीत माझे..!अमोलने आठच दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुकवर ‘असेन मी...नसेन मी...तरीही असेल गीत माझे...’या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या ओळी पोस्ट केल्या होत्या व त्याबरोबरच ‘आठवण ठेवा,’ असाही मेसेज त्याने मित्रांना दिला होता. मला आयुष्याचा कंटाळा आला असल्याचे तो मित्रांकडे बोलून दाखवत होता.