शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

‘प्रतिसाद’च्या पोतदारची आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

कर्जबाजारीपणास कंटाळून कृत्य

कोल्हापूर : वादग्रस्त ‘प्रतिसाद मिल्क’ व इव्हेंट कंपनीचा प्रमुख अमोल बाळासाहेब पोतदार (वय ३१, रा. शाहूनगर) याने गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास राजारामपुरी शाहूनगरातील राहत्या घरी हाताच्या शिरा ब्लेडने कापून घेऊन व गळफास लावून आत्महत्या केली.कर्जबाजारीपणा व प्रकृतीच्या कारणावरून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार व ‘किसान शक्ती’ मासिकाचे संपादक बाळ पोतदार यांचा तो मुलगा होय. / पोलिसांनी सांगितले, अमोल आई-वडील व पत्नीसमवेत शाहूनगरात राहत होता. आज सकाळी तो कुठेतरी बाहेरून जावून आला. दुपारी घरी आल्यानंतर जेवण करून बेडरूममध्ये गेला. चारच्या सुमारास त्याने आईकडे चहा मागितला. बराच वेळ तो चहा पिण्यास न आल्याने आई शकुंतला पोतदार त्याला बोलविण्यासाठी गेल्या असता बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्यांनी हाक मारली असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जोराने दरवाजा ढकलला असता तो सिलिंग फॅनला लटकत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केला. यावेळी त्याचे वडील, पत्नी व शेजारील लोक पळत आले. बेडरूममध्ये सर्वत्र रक्त सांडले होते व त्याचा तिथेच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोलचा मृतदेह खाली उतरला. त्याची पाहणी केली असता उजव्या हाताची शीर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसून आल्या. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला. एका चांगल्या कुटुंबातील तरुणाने झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी पत्करलेला मार्ग अखेर आत्महत्येपर्यंत गेल्याची प्रतिक्रिया अमोल याच्या निधनानंतर उमटली. अमोल राजाराम महाविद्यालयात शिकला. प्रकृतीनेही तो सडपातळ होता. परंतु सतत काहीतरी भानगडी करण्याचा हव्यास होता. वर्षभरापूर्वी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावतो म्हणून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यात त्याला अटकही झाली होती. या प्रकरणात त्याने तत्कालिन स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यावरही अपहरणाचा आरोप केला होता. या प्रकरणी देशमुख यांना अटकही झाली होती. हे प्रकरणही राज्यभर बरेच गाजले होते. त्याचा तपास अजून सुरुच आहे. तोपर्यंत त्याने ‘प्रतिसाद’ ग्रुप आॅफ कंपनीज ही कंपनी स्थापन केली व त्यामार्फत अगोदर पुण्यात ‘प्रतिसाद’ दूध योजना सुरू केली. ‘सहा हजार रुपये भरून एक लिटर दूध वर्षभर घरपोच’ अशी ही योजना होती. ती पुण्यात अडचणीत आल्यावर कोल्हापुरात सुरू केली. नव्या ग्राहकांकडून पैसे घेऊन जुन्या ग्राहकांना दूध पुरवठा करायचा, असा फंडा तो वापरत होता. परंतु ही फसवणूक फार काळ चालली नाही. १२ आॅगस्टपासून कोल्हापुरातही ही योजना बंद पडली. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते. शिवाय लोकांचाही पैशांसाठी तगादा सुरू होता. या सगळ््यालाच कुलूप घालून तो कायमचाच निघून गेला.कमी रक्तदाबाचा त्रास अमोलला कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. काल, बुधवारी तो रुग्णालयातून घरी आला. आज दुपारी ध्यान करणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते. गेल्या चार महिन्यांपासून त्याचे पत्नीशीही भांडण झाले होते. त्यामुळे ते दोघे परस्परांशी बोलत नव्हते, असे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले...तरीही असेल गीत माझे..!अमोलने आठच दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुकवर ‘असेन मी...नसेन मी...तरीही असेल गीत माझे...’या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या ओळी पोस्ट केल्या होत्या व त्याबरोबरच ‘आठवण ठेवा,’ असाही मेसेज त्याने मित्रांना दिला होता. मला आयुष्याचा कंटाळा आला असल्याचे तो मित्रांकडे बोलून दाखवत होता.