शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

By admin | Updated: July 3, 2016 00:48 IST

महापालिकेचे यशस्वी नियोजन : तीन महिन्यांत एकही तक्रार नाही

कोल्हापूर : यंदा राधानगरी धरणातील संपलेले पाणी आणि भविष्यात साठणारे पाणी यांचा विचार करता महापालिकेने कोल्हापूर शहरासाठी ‘एक दिवसाआड’पाणी पुरवठा आॅगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांतील या नियोजनाचा अनुभव चांगला आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहिला. त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही; त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला आहे. टंचाईच्या काळातही प्रशासनाने समयसूचकतेने योग्य नियोजन केल्यामुळे एप्रिलपासून आजपर्यंत रोज किमान सुमारे ४० एमएलडी पाणीबचत करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले. गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरणे उशिरा व कमी भरण्यामध्ये झाला. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा पूर्णपणे प्रथमच आटला. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून पाण्याची खोली जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न झाला. दुष्काळाची झळ कोल्हापूर शहरालाही प्रथमच बसली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पुढे राधानगरी धरणाने तळ गाठलाच; त्यामुळे १ जूननंतर तुळशी धरणाचा आधार महापालिकेला प्रथमच घ्यावा लागला; पण भविष्यात उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने तशी पाणीटंचाईची झळ शहराला बसली नाही. दिवसाआड पाण्याचे नियोजन शहरवासीयांनीही अंगीकृत केले. त्यातून तक्रार उद्भवली नाही. दिवसाआड नियोजनामध्ये प्रतिदिनी किमान ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पुरेसा असल्याने हेच ‘दिवसाआड’ पाण्याचे नियोजन आॅगस्टअखेर ठेवून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) रोज ८० एमएलडी उपसा : आतापर्र्यंत ४० एमएलडी पाण्याची बचत शहराला रोज पाणीपुरवठा सुरू असताना शिंगणापूर आणि बालिंगा येथील उपसा पंपांतून सुमारे १२० एमएलडी पाणीउपसा रोज करण्यात येत होता; पण दिवसाआड नियोजनानंतर रोज सुमारे ८० एमएलडी पाणीउपसा होऊन सुमारे ४० एमएलडी पाण्याची बचत होत गेली. पाण्यासाठी आंदोलने गायब गेल्या तीन वर्षांत पाण्यासाठी अवघी तीनच आंदोलने झाली. बापट कॅम्प, कसबा बावडा आणि मोरेवाडीनजीक अशा तीनच ठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको झाले. याशिवाय आॅनलाईन तक्रारीमध्ये कसबा बावडा येथील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावर पाणी चढण्याइतके जादा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय पाण्यासाठीची आंदोलने लुप्त झाली आहेत. गेल्या तीन महिन्यांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीपुरवठ्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. याचाच अर्थ सुमारे ८० एमएलडी पाणी शहरासाठी पुरेसे आहे. पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन व लोकांचे सहकार्य यामुळे टंचाई स्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झाले. - मनिष पवार, जलअभियंता, महापालिका कोल्हापूर. एक दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी पुरवून वापरण्याची सवय लागली. ही व्यवस्था कायम चालू ठेवावी. पाणी बचतीचा हा चांगला मार्ग आहे. राज्यात अनेक शहरांत आठ दिवसांतून एकदा पाणी येते. आपण कोल्हापूरकर त्या तुलनेत भाग्यवान आहोत. पुरेसे पाणी मिळत असल्याने व्यवस्था बदलण्याची गरज नाही. - किरण भोसले, निवृत्त उपसंचालक, अल्पबचत.