शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:26 IST

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत हे सरकार गंभीर नाही. ज्या गतीने तपास व्हायला पाहीजे, त्या पध्दतीने तपास होत नाही, असा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे केला.

ठळक मुद्देदाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील ‘अंनिस’चे ‘जवाब दो’आंदोलन

कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत हे सरकार गंभीर नाही. ज्या गतीने तपास व्हायला पाहीजे, त्या पध्दतीने तपास होत नाही, असा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे केला.डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांच्यासह पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समाधानकारक तपास होत नसल्याच्या निषेधार्थ अंधश्रध्दा निर्मुलन समिती व समविचारी पक्ष, संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जवाब दो’आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. यानंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे सांगण्यात आले.एन.डी. पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांच्या हत्येप्रकरणी आम्ही आमच्या परीने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या नाकर्ते सरकारने आतापर्यंत रडतराऊतचीच भूमिका घेतली आहे. दाभोलकरांसह पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासामध्ये नेमेलल्या सीबीआयसह अन्य पोलिस यंत्रणांकडून समाधानकारक पावले उचलल्याचे दिसत नाही.ते पुढे म्हणाले, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासात आतापर्यंत पाच अधिकारी बदलले आहेत. त्यामुळे तपासात गती आलेली नाही. याकरीता स्वतंत्र अधिकाऱ्याचे पथक या तपासासाठी नेमण्याची गरज असून ते नेमावे. या प्रकरणी सरकार योग्य दिशेने तपास करत असल्याची ग्वाही कृतीतून मिळाली पाहीजे. परंतु सरकारला याबाबत आश्वासक चित्र मांडता आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमत्र्यांशी याबाबत चर्चा करावी.आंदोलनात कृष्णात कोरे, दिलीप पवार, डॉ. टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, रमेश वडणगेकर, रवी जाधव, अरुण पाटील, नियाज अत्तार, सीमा पाटील, स्रेहल कांबळे, स्वाती कृष्णात, बी. एल. बरगे, अनुप्रिया कदम आदी सहभागी झाले होते.

सनातन,हिंदू जनजागरणवर रोखदाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या खुनांच्या मालीकांमागे षडयंत्र आखून नियोजनबध्द कार्यवाही करायला प्रवृत्त करणारे सुत्रधार म्हणून सनातन संस्था व हिंदू जनगागरण समितीच्या साधकांचा सहभाग असल्याचे आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. असे असूनही तपासात दिरंगाई होत असल्याचो आरोप ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

औषधांचा वापर गुन्हेगारी वाढविण्यासाठीपनवेलच्या आश्रमात पोलिसांनी छापे टाकून औषधे जप्त केली होती. या औषधांचा वापर गुन्हेगारी वाढविण्यासाठी होतोय हे भयानक आहे. त्यावर ड्रग्स अ‍ॅक्टखाली कारवाई करता येऊ शकते, परंतु सरकार हे काम करत नाही, असा आरोप एन.डी. पाटील यांनी केला.

 

 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरkolhapurकोल्हापूर