शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी शीतगृहे उभी करणार

By admin | Updated: August 1, 2015 00:53 IST

हसन मुश्रीफ : कार्वे येथे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा प्रचार मेळावा

चंदगड : शेतकऱ्यांच्या पिकाला जादा दर कसा मिळेल, याचा विचार करून तालुक्यात पिकणाऱ्या काजू, रताळी, बटाटा, भाजीपाला, सोयाबीन ही पिके साठवणूक करून योग्य दर मिळाल्यास विक्री करता यावीत, यासाठी बाजार समितीतर्फे शीतगृहांची सोय करणार, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते.यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘दौलत’ कारखाना सभासदांचा राहावा ही प्रामाणिक इच्छा असली, तरी गेली चार वर्षे बंद स्थितीत असलेला हा कारखाना चालू करण्यास अनेक अडचणी आहेत. जिल्हा बँकेचे थकीत देणे वसूल होणे तत्काळ गरजेचे आहे. बँकेचे पैसे भरण्यास मुदत देऊनही रक्कम जमा झाली नाही, अथवा चालविण्यास कुणी घेतला नाही, तर देणेकरी फार मोठा गोंधळ घालतील. नरसिंगराव पाटील जर १०० टक्के हमी घेत असतील, तर आम्ही जरूर प्रयत्न करू.एवढे करूनही रक्कम भरली नाही, तर याला जबाबदार कोण?भरमू पाटील म्हणाले, चंदगड तालुक्यात पिकणाऱ्या काजूवर गडहिंग्लज बाजार समितीतर्फे तालुक्यातच शीतगृहे उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्यांच्या शेतमालाला चांगला भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना जादा दर व योग्य वजन देण्यासाठी प्रयत्नशील असून, शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय उभे करण्यास आपण तत्पर आहोत. तुर्केवाडी येथील बाजार समितीच्या आवारात शीतगृहे उभी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मल्लिकार्जुन मुगेरी, तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर, नामदेव दळवी, प्रकाश चव्हाण, अशोक चराटी, उपसभापती शांताराम पाटील, तुकाराम बेनके, अनिल सुरूतकर, बंडू चव्हाण, भीमराव चिमणे, तानाजी गडकरी, अभय देसाई, कागल तालुका संघाचे अध्यक्ष अरुण भोसले, चंद्रकला बामुचे, किरण कांबळे, नारायण बांदिवडेकर, विश्वनाथ करंबळी, सारिका चौगुले, आदींसह कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते. उदयकुमार देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. आर. जी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘दौलत’ कुणी बुडवला त्यांना विचारा...मुश्रीफ भाषण करण्यास उभे राहताच तालुका संघाचे संचालक जानबा चौगुले यांनी तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मते मागायला येताय. ‘दौलत’ सुरू करण्यासंदर्भात काय केलात ते सांगा, अशी विचारणा करताच मुश्रीफ यांनी ‘दौलत’वर राजकारणासाठी जेवणावळी, मटन खाल्ली. त्यावेळी तुम्ही राजकारण करणाऱ्यांना विचारल नाही. ‘दौलत’ काय आम्ही बुडविला नाही. ‘दौलत’ ज्यांनी बुडविला त्यांना विचारलं नाही, असे सांगून ‘राष्ट्रवादी’च्या संध्यादेवी कुपेकर यांना विधानसभा निवडणुकीत किती मते दिली ते सांगा, असा सवाल केला.