शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

नगरसेवकांना स्वार्थच दिसला

By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST

गडहिंग्लजला राष्ट्रवादीची बैठक : कार्यकर्त्यांनी ‘मन’ मोकळं केलं; युतीचा अधिकार नेत्यांनाच

गडहिंग्लज : सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मिळविलेली पालिकेची सत्ता टिकविता आली नाही. पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांची कदरसुद्धा केली नाही. स्वार्थापलीकडे नगरसेवकांना काहीही दिसले नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच पाच वर्षे गेली. पक्ष वाढीसाठी काहीही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाशी युती करायची याचा अधिकार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाच राहील, अशा परखड शब्दांत ‘मन’ मोकळ करतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या कामगिरीचा पाढाच बैठकीत वाचला.राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आणि गडहिंग्लज पालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात चार दिवसांपूर्वीही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा ‘व्यापक’ बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष वसंत यमगेकर होते.कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, पालिकेतील साडेतीन वर्षांची आपली ‘कारकीर्द आणि कामगिरी’ विचारात घेतली तर आगामी निवडणूक स्वबळावर लढवितो म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. विकासकामांपेक्षा आपली भांडणेच लोकांच्या लक्षात राहिली. त्यामुळे वॉर्डा-वॉर्डांतील जनमत घेऊनच नेत्यांना सल्ला द्यावा.नगरसेवक किरण कदम म्हणाले, सगळ्या चुका केवळ नगरसेवकांवर ढकलू नयेत. पक्षांतर्गत कुरबुरी वेळोवेळी नेत्यांच्या कानावर घालूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वबळावरच लढावे, अशी आपली भूमिका असून, नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.नगरसेवक हारुण सय्यद म्हणाले, बैठकीतील भावना नेत्यांपर्यंत पोहोचवूया. कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे. शहराध्यक्ष यमगेकर म्हणाले, पाच वर्षांतील कामगिरीबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करायला हवे. झालेल्या चुका दुरुस्त करूया, एकत्र राहून पक्ष वाढवूया. यावेळी शारदा आजरी व चंद्रकांत मेवेकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे, नगरसेविका मंजूषा कदम, अरुणा शिंदे, लक्ष्मी घुगरे, सुनील गुरव, युवराज पाटील, इकबाल शायन्नावर, दिलीप उपराटे, प्रकाश कांबळे, महेश सलवादे, महेश शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांना दु:खपक्ष व नेत्यांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरसेविका सुंदराबाई बिलावर अंतर्गत वादामुळेच आपले कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात गेल्या. त्यामुळे नेते व सर्वसामान्यांनी मिळवून दिलेली सत्ता गेल्याचे दु:ख कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, नगरसेवकांना त्याचे काही वाटत नाही, अशी खंतदेखील राहुल पाटील यांनी व्यक्त केली.