शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

नगरसेवकांना स्वार्थच दिसला

By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST

गडहिंग्लजला राष्ट्रवादीची बैठक : कार्यकर्त्यांनी ‘मन’ मोकळं केलं; युतीचा अधिकार नेत्यांनाच

गडहिंग्लज : सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मिळविलेली पालिकेची सत्ता टिकविता आली नाही. पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांची कदरसुद्धा केली नाही. स्वार्थापलीकडे नगरसेवकांना काहीही दिसले नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच पाच वर्षे गेली. पक्ष वाढीसाठी काहीही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाशी युती करायची याचा अधिकार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाच राहील, अशा परखड शब्दांत ‘मन’ मोकळ करतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या कामगिरीचा पाढाच बैठकीत वाचला.राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आणि गडहिंग्लज पालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात चार दिवसांपूर्वीही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा ‘व्यापक’ बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष वसंत यमगेकर होते.कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, पालिकेतील साडेतीन वर्षांची आपली ‘कारकीर्द आणि कामगिरी’ विचारात घेतली तर आगामी निवडणूक स्वबळावर लढवितो म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. विकासकामांपेक्षा आपली भांडणेच लोकांच्या लक्षात राहिली. त्यामुळे वॉर्डा-वॉर्डांतील जनमत घेऊनच नेत्यांना सल्ला द्यावा.नगरसेवक किरण कदम म्हणाले, सगळ्या चुका केवळ नगरसेवकांवर ढकलू नयेत. पक्षांतर्गत कुरबुरी वेळोवेळी नेत्यांच्या कानावर घालूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वबळावरच लढावे, अशी आपली भूमिका असून, नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.नगरसेवक हारुण सय्यद म्हणाले, बैठकीतील भावना नेत्यांपर्यंत पोहोचवूया. कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे. शहराध्यक्ष यमगेकर म्हणाले, पाच वर्षांतील कामगिरीबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करायला हवे. झालेल्या चुका दुरुस्त करूया, एकत्र राहून पक्ष वाढवूया. यावेळी शारदा आजरी व चंद्रकांत मेवेकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे, नगरसेविका मंजूषा कदम, अरुणा शिंदे, लक्ष्मी घुगरे, सुनील गुरव, युवराज पाटील, इकबाल शायन्नावर, दिलीप उपराटे, प्रकाश कांबळे, महेश सलवादे, महेश शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांना दु:खपक्ष व नेत्यांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरसेविका सुंदराबाई बिलावर अंतर्गत वादामुळेच आपले कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात गेल्या. त्यामुळे नेते व सर्वसामान्यांनी मिळवून दिलेली सत्ता गेल्याचे दु:ख कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, नगरसेवकांना त्याचे काही वाटत नाही, अशी खंतदेखील राहुल पाटील यांनी व्यक्त केली.