शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नगरसेवकांना स्वार्थच दिसला

By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST

गडहिंग्लजला राष्ट्रवादीची बैठक : कार्यकर्त्यांनी ‘मन’ मोकळं केलं; युतीचा अधिकार नेत्यांनाच

गडहिंग्लज : सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मिळविलेली पालिकेची सत्ता टिकविता आली नाही. पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांची कदरसुद्धा केली नाही. स्वार्थापलीकडे नगरसेवकांना काहीही दिसले नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच पाच वर्षे गेली. पक्ष वाढीसाठी काहीही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाशी युती करायची याचा अधिकार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाच राहील, अशा परखड शब्दांत ‘मन’ मोकळ करतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या कामगिरीचा पाढाच बैठकीत वाचला.राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आणि गडहिंग्लज पालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात चार दिवसांपूर्वीही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा ‘व्यापक’ बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष वसंत यमगेकर होते.कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, पालिकेतील साडेतीन वर्षांची आपली ‘कारकीर्द आणि कामगिरी’ विचारात घेतली तर आगामी निवडणूक स्वबळावर लढवितो म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. विकासकामांपेक्षा आपली भांडणेच लोकांच्या लक्षात राहिली. त्यामुळे वॉर्डा-वॉर्डांतील जनमत घेऊनच नेत्यांना सल्ला द्यावा.नगरसेवक किरण कदम म्हणाले, सगळ्या चुका केवळ नगरसेवकांवर ढकलू नयेत. पक्षांतर्गत कुरबुरी वेळोवेळी नेत्यांच्या कानावर घालूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वबळावरच लढावे, अशी आपली भूमिका असून, नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.नगरसेवक हारुण सय्यद म्हणाले, बैठकीतील भावना नेत्यांपर्यंत पोहोचवूया. कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे. शहराध्यक्ष यमगेकर म्हणाले, पाच वर्षांतील कामगिरीबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करायला हवे. झालेल्या चुका दुरुस्त करूया, एकत्र राहून पक्ष वाढवूया. यावेळी शारदा आजरी व चंद्रकांत मेवेकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे, नगरसेविका मंजूषा कदम, अरुणा शिंदे, लक्ष्मी घुगरे, सुनील गुरव, युवराज पाटील, इकबाल शायन्नावर, दिलीप उपराटे, प्रकाश कांबळे, महेश सलवादे, महेश शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांना दु:खपक्ष व नेत्यांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरसेविका सुंदराबाई बिलावर अंतर्गत वादामुळेच आपले कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात गेल्या. त्यामुळे नेते व सर्वसामान्यांनी मिळवून दिलेली सत्ता गेल्याचे दु:ख कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, नगरसेवकांना त्याचे काही वाटत नाही, अशी खंतदेखील राहुल पाटील यांनी व्यक्त केली.