शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

CoronaVirus : दोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:53 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणारपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.कोरोनाह्णचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व गर्दीची ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. आठवडी बाजारासह शहरातील भाजी मंडईमध्ये मोठी गर्दी असते. येथे संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळेच लॉकडाऊनपूर्वीच भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत.

भाजीपाला हा जीवनाश्यक वस्तू असल्याने त्याची खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू राहिली. मात्र, आठवडी बाजार अथवा भाजी मंडईमध्ये न करता रस्त्यावर सामाजिक अंतर पाळून खरेदी-विक्री सुरू आहे. कोल्हापूर शहरातील दुकानांसह इतर व्यवहार सध्या विहीत वेळेत सुरू आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर भाजीपाला विक्री करणे तसे अडचणीचे ठरणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी कपिलतीर्थ मार्केटपासून झाली.कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र विक्रेते फारच कमी होते. गेली दोन महिने मंडई बंद असल्याने भाजीपाला नाही, त्यात सोमवारी रमजान ईदमुळे कोल्हापूर बाजार समितीमधील भाजीपाल्याचे सौदे बंद राहिले. त्यामुळे सोमवारी कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र दोन-चार विक्रेतेच आले होते. त्यांच्याकडेही मोजक्याच भाज्या दिसत होत्या.आठवडी बाजार सुरू कधी होणार?आजूबाजूच्या आठ-दहा गावांच्या सोयीसाठी मोठ्या गावांत आठवडी बाजार भरविले जातात. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने हे बाजार कार्यरत असले तरी गेली दोन महिने ते बंद आहेत. शहरातील भाजी मंडई सुरू झाल्याने आठवडी बाजारही सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. 

कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार अटीस अधीन राहून सुरू आहेत. त्यानुसार भाजी मंडईही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न असून कपिलतीर्थ मंडई सुरू केली.- मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, मनपा कोल्हापूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरMarketबाजार