शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकवटलेले शिक्षण क्षेत्र, पक्षीय जोडीमुळे आसगावकर यांचा विजयी सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST

कोल्हापूर : पहिल्यांदा संधी मिळाली म्हणून एकवटलेले कोल्हापूरकर, महाविकास आघाडीच्या रूपाने मिळालेली पक्षीय ताकद आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...

कोल्हापूर : पहिल्यांदा संधी मिळाली म्हणून एकवटलेले कोल्हापूरकर, महाविकास आघाडीच्या रूपाने मिळालेली पक्षीय ताकद आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे प्रा. जयंत आसगावकर यांचा विजय सुकर झाला. ‘आसगावकर हे शिक्षक नव्हे संस्थाचालक असल्या’चा प्रचार विरोधकांनी केला; मात्र तो मतदारांनी झिडकारला.

‘शिक्षक’मधून महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी डझनभर इच्छुक होते. मात्र कॉग्रेसची उमेदवारी मिळवण्यात प्रा. आसगावकर यांनी बाजी मारली. उमेदवारी मिळाली; मात्र विरोधकांचे बंड थंड करून कोल्हापुरातून एकच उमेदवार देण्याचे आव्हान होते. मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडोबांना शांत करीत आसगावकर यांच्यामागे बळ उभे केले. ‘शिक्षक’मधून पहिल्यांदा संधी मिळाल्याने कोल्हापुरातील संपूर्ण शिक्षण क्षेत्र एकवटल्याने मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. मतभेद विसरून सगळ्यांनी आसगावकर यांना पहिली पसंती दिली. त्यामुळेच त्यांना पहिल्या पसंतीची १६ हजार ८७४ मते मिळाली. त्यानंतर त्यांनी विजयापर्यंत मागे वळून पाहिले नाही.

‘रयत’ने आसगावकरांना तारले

रयत शिक्षण संस्थेने या वेळेला पहिल्यांदाच उघड पाठिंबा दिला होता. त्यांची सात हजार मते आहेत. त्यांतील बहुतांश पहिल्या पसंतीची मते घेण्यात प्रा. आसगावकर यशस्वी झाले. दत्तात्रय सावंत हे पहिल्या फेरीपासून आसगावकर यांचा पाठलाग करीत होते. एकूणच परिस्थिती पाहता, आसगावकर यांना ‘रयत’ने तारल्याची चर्चा सुरू आहे.

विजय खेचून आणण्यात विरोधकांची साथ

जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडित ‘कोजिमाशि’, मुख्याध्यापक संघ, आदी संस्थांच्या राजकारणात आमदार आसगावकर यांचे विरोधक आहेत. दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील यांनी तर निवडणुकीत अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. मात्र पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी समझोता केला. लाड, पाटील यांनी नुसता पाठिंबा दिला नाही; तर प्रचारात सक्रिय होऊन विजय खेचून आणण्यात मोलाची साथ दिली.

सांगरूळ शिक्षण संस्थेचे कर्मचारी राबले

उमेदवारी अर्ज भरल्यापासून सांगरूळ शिक्षण संस्थेचे कर्मचारी विविध जिल्ह्यांत तळ ठाेकून हाेते. प्रत्येक शिक्षकाची भेट घेण्याबरोबरच विरोधकांच्या काय हालचाली आहेत, यावर ते नजर ठेवून होते.

दत्तात्रय सावंत यांची शेवटपर्यंत झुंज

दत्तात्रय सावंत यांनी सहा वर्षांत शाळांना संगणक, विज्ञान पेटी, प्रोजेक्टर, आदी साहित्य दिले होते. संपर्काच्या पातळीवर ते पुढे राहिल्याने अपक्ष असूनही त्यांनी चांगली टक्कर दिली.

आसगावकर यांच्या विजयाची कारणे-

कोल्हापूरची अस्मिता जागी करण्यात आसगावकरांना यश

‘रयत’सह डी. वाय. पाटील ग्रुप, भारती विद्यापीठाची मिळालेली ताकद

स्थानिक विरोधकांचे बंड शांत करीत प्रचारात सक्रिय केले.

- राजाराम लोंंढे