शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

350th Shivrajyabhishek Sohala 2023: वादंग निर्माण करायचे आहे का?; तिथीला सोहळा करण्याचे कारण काय, शिवप्रेमींचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

सरकारला एवढी कसली घाई झाली होती?

कोल्हापूर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते त्यांची समाधी कुणी शोधली इथपर्यंत अनेक वाद असताना आता शासनाला शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद निर्माण करण्याची हुक्की आली आहे की काय, असा संतप्त शिवप्रेमींकडून विचारला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अख्खे एक वर्ष गिळंकृत करत यंदा ३५० वा सोहळा तोही तिथीनुसार २ जूनला साजरा करण्याचं कारण काय? याला मूर्खपणा म्हणावा का? महाराजांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेला वादंगामध्ये अडकवून ठेवण्याचे षडयंत्र असा थेट आरोप सरकारवर केला जात आहे.लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने यंदाच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक साेहळ्याचे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सव (३५० वे वर्ष) म्हणून त्याचे चुकीचे मार्केटिंग केले आहे, याबाबतचे वृत्त शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरातून वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे इत्थंभूत वर्णन असताना आता हे मुखपत्र, त्यावेळी काही विचार करून निर्णय घेणारे इतिहास संशोधक, दिग्गज नेतेमंडळी खोटी ठरली आहेत.शासनाने केलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध करत शासनच जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांबद्दल वादंग निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे.

आधीच वाद कमी आहेत का?छत्रपती शिवाजी महाराजांवरून कोणतेही वादंग निर्माण होणे ही खरेतर सर्वांसाठी शरमेची बाब आहे. शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून तीन वेळा साजरी केली जाते. त्यांचे समाधिस्थान कित्येक वर्षे अंधारात होते, ते समाधिस्थान कोणी शोधले यावरून वाद आहेत. हे वाद कमी आहेत की काय म्हणून आता शासनाने ३५० वा शिवराज्याभिषेक साेहळा एक वर्ष आधीच साजरा करून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे.

तिथीला साेहळा का केला?तिथीनुसार उत्सव साजरा करताना दरवर्षी वेगवेगळी तारीख येते. त्यामुळे ६ जून हाच दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जात असताना यावर्षी तिथीनुसार २ जूनला शासनाने हा सोहळा करण्यामागचे कारण काय? सरकारला एवढी कसली घाई झाली होती? आता ६ जूनला काय करणार आहात, अशी विचारणा शिवप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेक