शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

350th Shivrajyabhishek Sohala 2023: वादंग निर्माण करायचे आहे का?; तिथीला सोहळा करण्याचे कारण काय, शिवप्रेमींचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

सरकारला एवढी कसली घाई झाली होती?

कोल्हापूर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते त्यांची समाधी कुणी शोधली इथपर्यंत अनेक वाद असताना आता शासनाला शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद निर्माण करण्याची हुक्की आली आहे की काय, असा संतप्त शिवप्रेमींकडून विचारला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अख्खे एक वर्ष गिळंकृत करत यंदा ३५० वा सोहळा तोही तिथीनुसार २ जूनला साजरा करण्याचं कारण काय? याला मूर्खपणा म्हणावा का? महाराजांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेला वादंगामध्ये अडकवून ठेवण्याचे षडयंत्र असा थेट आरोप सरकारवर केला जात आहे.लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने यंदाच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक साेहळ्याचे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सव (३५० वे वर्ष) म्हणून त्याचे चुकीचे मार्केटिंग केले आहे, याबाबतचे वृत्त शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरातून वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे इत्थंभूत वर्णन असताना आता हे मुखपत्र, त्यावेळी काही विचार करून निर्णय घेणारे इतिहास संशोधक, दिग्गज नेतेमंडळी खोटी ठरली आहेत.शासनाने केलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध करत शासनच जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांबद्दल वादंग निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे.

आधीच वाद कमी आहेत का?छत्रपती शिवाजी महाराजांवरून कोणतेही वादंग निर्माण होणे ही खरेतर सर्वांसाठी शरमेची बाब आहे. शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून तीन वेळा साजरी केली जाते. त्यांचे समाधिस्थान कित्येक वर्षे अंधारात होते, ते समाधिस्थान कोणी शोधले यावरून वाद आहेत. हे वाद कमी आहेत की काय म्हणून आता शासनाने ३५० वा शिवराज्याभिषेक साेहळा एक वर्ष आधीच साजरा करून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे.

तिथीला साेहळा का केला?तिथीनुसार उत्सव साजरा करताना दरवर्षी वेगवेगळी तारीख येते. त्यामुळे ६ जून हाच दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जात असताना यावर्षी तिथीनुसार २ जूनला शासनाने हा सोहळा करण्यामागचे कारण काय? सरकारला एवढी कसली घाई झाली होती? आता ६ जूनला काय करणार आहात, अशी विचारणा शिवप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेक