शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: पंचगंगा नदीत दूषित पाणी, तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच; अधिकाऱ्यांनी प्रदूषित पाण्याचे घेतले नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:25 IST

पंचगंगा काठच्या नागरिकांतून संताप

कुरुंदवाड : हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पंचगंगा नदीला काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी आले असून दूषित पाण्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे प्रदूषित पाण्याचा प्रश्न आतापासूनच सुरू झाला असून दूषित पाण्याचा त्रास पुढील वर्षातील मान्सूनच्या आगमनापर्यंत सोसावा लागणार आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, तेरवाड बंधारा येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याचे समजताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड व अंकुश पाटील यांनी बंधाऱ्यावर येऊन पाहणी केली व दूषित पाण्याचा पंचनामा करून पाण्याचे नमुने घेतले. नदी दूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालीघाटे व बंडू पाटील यांनी अधिकारी हरबड यांना दिले.पाण्याअभावी गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे अनेक शेतकरी, सहकारी संस्थांचे शेतीपंप बंद पडले होते. शेतीसाठी धरणांतून पाणी सोडण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत होती. बुधवारी नदीपात्रात पाणी आल्याने नदीपात्र तुडुंब भरले. मात्र धरणांतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर औद्योगिक वसाहतीतून रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया सोडल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.प्रदूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मृत माशांचा खच तेरवाड बंधाऱ्यावर येऊन तटला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचा बडगा उगारून नदीचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, संजय मालगावे, रावसाहेब लठ्ठे, अरविंद सासणे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण