शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Kolhapur: पंचगंगा नदीत दूषित पाणी, तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच; अधिकाऱ्यांनी प्रदूषित पाण्याचे घेतले नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:25 IST

पंचगंगा काठच्या नागरिकांतून संताप

कुरुंदवाड : हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पंचगंगा नदीला काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी आले असून दूषित पाण्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे प्रदूषित पाण्याचा प्रश्न आतापासूनच सुरू झाला असून दूषित पाण्याचा त्रास पुढील वर्षातील मान्सूनच्या आगमनापर्यंत सोसावा लागणार आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, तेरवाड बंधारा येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याचे समजताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड व अंकुश पाटील यांनी बंधाऱ्यावर येऊन पाहणी केली व दूषित पाण्याचा पंचनामा करून पाण्याचे नमुने घेतले. नदी दूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालीघाटे व बंडू पाटील यांनी अधिकारी हरबड यांना दिले.पाण्याअभावी गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे अनेक शेतकरी, सहकारी संस्थांचे शेतीपंप बंद पडले होते. शेतीसाठी धरणांतून पाणी सोडण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत होती. बुधवारी नदीपात्रात पाणी आल्याने नदीपात्र तुडुंब भरले. मात्र धरणांतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर औद्योगिक वसाहतीतून रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया सोडल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.प्रदूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मृत माशांचा खच तेरवाड बंधाऱ्यावर येऊन तटला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचा बडगा उगारून नदीचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, संजय मालगावे, रावसाहेब लठ्ठे, अरविंद सासणे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण