शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kolhapur: आजरा-बांदा महामार्गावर टोलवसुलीच्या हालचाली; जमीन संपादन, पण शेतकरी भरपाईपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:26 IST

महामार्गाचे ५० टक्के काम अपूर्ण : आजरा एमआयडीसीजवळ द्यावा लागणार टोल

शीतल सदाशिव मोरेआजरा : संकेश्वर-आजरा-बांदा राष्ट्रीय महामार्गावरीलटोलनाका आजरा एमआयडीसीजवळ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम ५० टक्केही पूर्ण झालेले नाही. आजरा, हिरलगे, भादवण, भादवणवाडी, धनगरमोळासह जंगल क्षेत्रातील रस्त्याचे काम झालेले नाही. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुलीला सुरुवात करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. महामार्गावरील लहान-मोठे ४० पूल व अनेक नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ केला आहे. काँक्रीटच्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलांचे काम अर्धवट स्थितीत असून पूल व काँक्रीटचा रस्ता यामध्ये गॅप राहिल्यामुळे पुलांवर स्पीडब्रेकर तयार झाला आहे. आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पूल बांधून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र, पुलावरून एकेरीच वाहतूक सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणच्या पुलांवरून अशीच एकेरी वाहतूक सुरू आहे.

लेंडओहोळवरील पूल धोकादायकचलेंडओहोळवरील पूल १०० वर्षांपूर्वीचा धोकादायक स्थितीत आहे. रस्त्याचे काम करताना त्यावर तीनवेळा भगदाड पडले आहे. नवीन पुलासाठी आजरेकरांची आग्रही भूमिका आहे. मात्र, महामार्गाच्या कामात हा पूल धरलेला नाही. पूल झाला नाही तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी दुकानात येऊन घुसणार आहे, तर असणारा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कोसळण्याची शक्यता जास्त आहे.

टोलवसुली व कर्मचारी निवासस्थानाचे काम अंतिम टप्प्यातराष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका आजरा ‘एमआयडीसी’शेजारी आहे. या ठिकाणी टोलवसुली व कर्मचारी निवासस्थानाचे काम युद्धपातळीवर सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. १५ जून किंवा १ जुलैपासून टोलवसुलीला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.जमीन संपादन; पण शेतकरी भरपाईपासून वंचितराष्ट्रीय महामार्गासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन भरपाईपूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. कागदोपत्री ताब्यात घेतलेल्या जमिनीपेक्षाही जास्त जमिनीवर राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनी अतिक्रमण केले आहे. अशा जमिनीची भरपाई देताना मात्र शासनस्तरावर टाळाटाळ होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका