शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचनेचा परिणाम; नव्या शैक्षणिक धोरणाची गरज, युनेस्कोने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:53 IST

कोरोनामुळे मुलींचे शिक्षण होणार ‘लॉकडाऊन’

- संतोष मोरबाळेकोल्हापूर : कोरोना या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याची भीती ‘युनेस्को’ने व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनपूर्वी युनिसेफ आणि सेंटर फॉर बजेट पॉलिसी स्टडीज यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ४० टक्के मुली अद्यापही शिक्षणापासून दूर आहेत. यातील ३० टक्के मुलींनी कधी शाळेत पायही टाकलेला नाही. लॉकडाऊननंतर ही स्थिती अजूनही गंभीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींवरच त्यांचे सध्या लक्ष आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणाकडे कितपत लक्ष दिले जाईल, याबाबत शंकाच आहे.

शहरात काम नसलेले मजूर आपल्या गावी जात आहेत. गावी गेल्यानंतर त्यांच्यासमोर कोणत्या समस्या असतील याचीही त्यांना अद्याप कल्पना आलेली नाही. तेथे गेल्यानंतर सावकाराकडून कर्ज काढल्याशिवाय घरातील चूलही पेटणार नाही अशी बहुतांश मजुरांची स्थिती आहे. अशा गरीब मजुरांच्या मुलींच्या शिक्षणाची दारे कोविड-१९ मुळे बंद होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच सरकारने नवे शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.

दहावीपर्यंचे मुलींचे शिक्षण मोफत असले तरी लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील तेव्हा मुलींवर घरातील कामांची जबाबदारी असणार आहे. आता शिकून काय होणार म्हणून मुलींसाठी शिक्षणाची दारे बंद होऊ शकतात. मुलगी ही जबाबदारी असल्याने तिचे कमी वयातच लग्नही लावून दिले जाण्याची शक्यता आहे. दिव्यांग मुलींच्या अडचणी यापेक्षा वेगळ्या आणि गंभीर आहेत.

लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे, तर जगभरातील शाळा बंद केल्या आहेत. राज्यात ४००० पेक्षा अधिक शाळा बंद होणार अशी चर्चा होत आहे. या शाळांतील मुलांनी काय करायचे? यामुळेच आॅनलाइन शिक्षणावर भर न देता मुलींना शालेय प्रवाहात आणण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागणार आहे.

१.भारतात अद्यापही मुलींसाठी सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कोणतीही आपत्ती आली तर मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो.

२.अनेक मुलींनी पाणी आणण्यासाठी टँकरवर नंबर लावणे किंवा दुसरीकडून पाणी आणणे यासाठी शाळा सोडल्या आहेत.

३.लॉकडाऊननंतर अनेक मुली शाळेत परत येणार नाहीत. पालक जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी कमी वयातच मुलीचे लग्न लावून देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण