शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आर्थिक विवंचनेचा परिणाम; नव्या शैक्षणिक धोरणाची गरज, युनेस्कोने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:53 IST

कोरोनामुळे मुलींचे शिक्षण होणार ‘लॉकडाऊन’

- संतोष मोरबाळेकोल्हापूर : कोरोना या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याची भीती ‘युनेस्को’ने व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनपूर्वी युनिसेफ आणि सेंटर फॉर बजेट पॉलिसी स्टडीज यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ४० टक्के मुली अद्यापही शिक्षणापासून दूर आहेत. यातील ३० टक्के मुलींनी कधी शाळेत पायही टाकलेला नाही. लॉकडाऊननंतर ही स्थिती अजूनही गंभीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींवरच त्यांचे सध्या लक्ष आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणाकडे कितपत लक्ष दिले जाईल, याबाबत शंकाच आहे.

शहरात काम नसलेले मजूर आपल्या गावी जात आहेत. गावी गेल्यानंतर त्यांच्यासमोर कोणत्या समस्या असतील याचीही त्यांना अद्याप कल्पना आलेली नाही. तेथे गेल्यानंतर सावकाराकडून कर्ज काढल्याशिवाय घरातील चूलही पेटणार नाही अशी बहुतांश मजुरांची स्थिती आहे. अशा गरीब मजुरांच्या मुलींच्या शिक्षणाची दारे कोविड-१९ मुळे बंद होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच सरकारने नवे शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.

दहावीपर्यंचे मुलींचे शिक्षण मोफत असले तरी लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील तेव्हा मुलींवर घरातील कामांची जबाबदारी असणार आहे. आता शिकून काय होणार म्हणून मुलींसाठी शिक्षणाची दारे बंद होऊ शकतात. मुलगी ही जबाबदारी असल्याने तिचे कमी वयातच लग्नही लावून दिले जाण्याची शक्यता आहे. दिव्यांग मुलींच्या अडचणी यापेक्षा वेगळ्या आणि गंभीर आहेत.

लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे, तर जगभरातील शाळा बंद केल्या आहेत. राज्यात ४००० पेक्षा अधिक शाळा बंद होणार अशी चर्चा होत आहे. या शाळांतील मुलांनी काय करायचे? यामुळेच आॅनलाइन शिक्षणावर भर न देता मुलींना शालेय प्रवाहात आणण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागणार आहे.

१.भारतात अद्यापही मुलींसाठी सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कोणतीही आपत्ती आली तर मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो.

२.अनेक मुलींनी पाणी आणण्यासाठी टँकरवर नंबर लावणे किंवा दुसरीकडून पाणी आणणे यासाठी शाळा सोडल्या आहेत.

३.लॉकडाऊननंतर अनेक मुली शाळेत परत येणार नाहीत. पालक जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी कमी वयातच मुलीचे लग्न लावून देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण