शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

आर्थिक विवंचनेचा परिणाम; नव्या शैक्षणिक धोरणाची गरज, युनेस्कोने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:53 IST

कोरोनामुळे मुलींचे शिक्षण होणार ‘लॉकडाऊन’

- संतोष मोरबाळेकोल्हापूर : कोरोना या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याची भीती ‘युनेस्को’ने व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनपूर्वी युनिसेफ आणि सेंटर फॉर बजेट पॉलिसी स्टडीज यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ४० टक्के मुली अद्यापही शिक्षणापासून दूर आहेत. यातील ३० टक्के मुलींनी कधी शाळेत पायही टाकलेला नाही. लॉकडाऊननंतर ही स्थिती अजूनही गंभीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींवरच त्यांचे सध्या लक्ष आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणाकडे कितपत लक्ष दिले जाईल, याबाबत शंकाच आहे.

शहरात काम नसलेले मजूर आपल्या गावी जात आहेत. गावी गेल्यानंतर त्यांच्यासमोर कोणत्या समस्या असतील याचीही त्यांना अद्याप कल्पना आलेली नाही. तेथे गेल्यानंतर सावकाराकडून कर्ज काढल्याशिवाय घरातील चूलही पेटणार नाही अशी बहुतांश मजुरांची स्थिती आहे. अशा गरीब मजुरांच्या मुलींच्या शिक्षणाची दारे कोविड-१९ मुळे बंद होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच सरकारने नवे शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.

दहावीपर्यंचे मुलींचे शिक्षण मोफत असले तरी लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील तेव्हा मुलींवर घरातील कामांची जबाबदारी असणार आहे. आता शिकून काय होणार म्हणून मुलींसाठी शिक्षणाची दारे बंद होऊ शकतात. मुलगी ही जबाबदारी असल्याने तिचे कमी वयातच लग्नही लावून दिले जाण्याची शक्यता आहे. दिव्यांग मुलींच्या अडचणी यापेक्षा वेगळ्या आणि गंभीर आहेत.

लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे, तर जगभरातील शाळा बंद केल्या आहेत. राज्यात ४००० पेक्षा अधिक शाळा बंद होणार अशी चर्चा होत आहे. या शाळांतील मुलांनी काय करायचे? यामुळेच आॅनलाइन शिक्षणावर भर न देता मुलींना शालेय प्रवाहात आणण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागणार आहे.

१.भारतात अद्यापही मुलींसाठी सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कोणतीही आपत्ती आली तर मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो.

२.अनेक मुलींनी पाणी आणण्यासाठी टँकरवर नंबर लावणे किंवा दुसरीकडून पाणी आणणे यासाठी शाळा सोडल्या आहेत.

३.लॉकडाऊननंतर अनेक मुली शाळेत परत येणार नाहीत. पालक जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी कमी वयातच मुलीचे लग्न लावून देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण