शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

काँग्रेसला ‘प्रकाश’ : आवाडेंच्या निवडीने बळ ; बदल माझ्या संमतीनेच - पी. एन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:43 IST

उत्तम संघटनकौशल्य असणाऱ्या प्रकाश आवाडे यांच्याकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. २०११ साली ज्या पदासाठी संघर्ष करावा लागला, तेच पद सन्मानाने आवाडे यांच्याकडे आले असले तरी त्यांच्यासमोर

ठळक मुद्दे नेत्यांची मोट बांधण्याचे आव्हानकाँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदल माझ्या संमतीनेचपी. एन.: पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज अनुपस्थित

समीर देशपांडे।कोल्हापूर : उत्तम संघटनकौशल्य असणाऱ्या प्रकाश आवाडे यांच्याकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. २०११ साली ज्या पदासाठी संघर्ष करावा लागला, तेच पद सन्मानाने आवाडे यांच्याकडे आले असले तरी त्यांच्यासमोर आव्हानांचाही मोठा डोंगर आहे. नेत्यांमधील ‘मनभेद’ संपविण्यात त्यांना यश आले तरच कॉँग्रेससाठी जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

गेली २० वर्षे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पी. एन. पाटील यांच्याकडे होते. जरी विधानसभेला काही वेळा पराभव स्वीकारावा लागला असला तरीही त्यांना सहज डावलणे नेत्यांना शक्य झाले नव्हते.आठ वर्षांमध्ये पंचगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दिल्लीतील आणि राज्यातील सत्ता गेली आणि सतेज पाटील वगळता जिल्ह्यात एकही आमदार नाही. आजरा तालुक्यात सर्व सत्तास्थाने भाजप आणि राष्ट्रवादीकडे आहेत. चंदगडमध्ये भरमूअण्णा पाटील, तर गडहिंग्लजमध्येही राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. कागलमध्ये तर कॉँग्रेसचे कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली आहे. भुदरगडमध्ये बजरंग देसाई कॉँग्रेसमध्ये, तर त्यांचे चिरंजीव राहुल भाजपमध्ये अशी अवस्था आहे.

राधानगरी आणि करवीरमध्ये पी. एन. पाटील यांना मानणारा कॉँग्रेसचा मोठा गट आहे. पन्हाळ्यातही कॉँग्रेसची अवस्था वाईट आहे. शिरोळमध्ये गणपतराव पाटील आणि हातकणंगलेमध्ये जयवंतराव आवळे यांच्या रूपाने कॉँग्रेसचे मजबूत नेतृत्व आहे. गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. शाहूवाडीतही कॉँग्रेसला मोठे परिश्रम घ्यावे लागतील. यापुढे ‘गोकुळ’च्या माध्यमातून कॉँग्रेसचे राजकारण करण्याला मर्यादा येणार आहेत. जेथे महाडिक समर्थक कॉँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर आवाडे यांचे विशेष ‘लक्ष’ राहणार आहे.आवाडे यांच्या सर्व संस्था इचलकरंजी परिसर आणि हातकणंगले तालुक्यात असल्याने त्यांचे जिल्ह्यातील अन्य नेत्यांवर फारसे काही अवलंबून नाही. मात्र, कॉँग्रेसच्या सर्व नेत्यांचीच मोट ते किती प्रभावीपणे बांधू शकतात, यावरच हे यश अवलंबून आहे.ताराराणी आघाडी विसर्जित करावी लागेलकॉँग्रेसमध्ये स्थान दिले जात नाही, या संतापातून आवाडे यांनी सव्वादोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ‘ताराराणी आघाडी’च्या माध्यमातून सवता सुभा मांडला होता. एवढेच नव्हे, तर जेव्हा पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे आले तेव्हा भाजपला पाठिंबा देत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. त्यामुळे आपली आघाडी विसर्जित करून आवाडे यांना जिल्हा परिषदेतही पक्षाच्या पाठीशी राहावे लागणार आहे.सर्व बाजूंनी मजबूत : आवाडे यांचे सहकारातील साम्राज्य एवढे आहे की, त्यांना निधीसाठी पक्षावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आवाडे हे सर्व बाजूंनी मजबूत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आवाडे हे जिल्हाभर चांगली वातावरण निर्मिती करू शकतात.काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदल माझ्या संमतीनेचपी. एन.: पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज अनुपस्थितकोल्हापूर : आपण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज, शुक्रवारी प्रकाश आवाडे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिले आहे. आवाडे यांची ही निवड माझ्या संमतीनेच झाल्याचे सांगत, आपल्या अनुपस्थितीची कल्पना आवाडे यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पी. एन. पाटील म्हणाले, अध्यक्ष बदल हा माझ्यावरील अन्याय नव्हे. याआधीही मी सहा वेळा लेखी राजीनामा दिला होता; मात्र तो नेत्यांनी स्वीकारला नव्हता. २७ डिसेंबरला मी पदाचा राजीनामा देत असताना तोदेखील स्वीकारला गेला नाही. यानंतर तीन-चार वेळा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या विषयावर माझ्याशी चर्चा केली. ‘गोकुळ’मध्ये काही परिणाम होणार नाही. सर्वच सहकारी संस्थांमध्ये अन्य पक्षांना स्थान दिले जाते. भोगावती कारखाना जरी अपवाद असला तरी जिल्हा बॅँकेतही सर्व पक्षांचे लोक आहेत, याकडे पी. एन. पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :congressकाँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्षkolhapurकोल्हापूर