शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

Kolhapur: विधानसभेला कॉग्रेसचे हेलिकाँप्टर कागलात का नाही?, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:56 IST

पक्षाच्या नेतृत्वाबाबत अफवा पसरवत असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता

कोल्हापूर : लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची जागा काँग्रेसला सोडून शाहू छत्रपती यांना मोठ्या फरकाने विजयी केले. पण, विधानसभेला आमच्या विरोधात काम केले. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे तर ‘कागल’ मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरलेच नाही, प्रत्येक वेळेला प्रामाणिक फक्त आम्हीच वागायचे का? अशी विचारणा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुधवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी म्हणाले, समरजीत घाटगे यांचा पराभव अशक्य होता, पण काँग्रेसने मदत केली नाही. याबद्दल काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाला विचारणा होणार आहे की नाही. शिवाजीराव खोत म्हणाले, काँग्रेसने प्रामाणिक मदत केली असती तर ‘चंदगड’, ‘कागल’मध्ये आमचे आमदार असते. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखाना, बाजार समिती, संघ संपवला. यापुढच्या काळात त्यांना गडहिंग्लजमध्येच राेखले जाईल.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. त्यांनी जे भोगले तेच ते बोलत आहेत. पण, आता मागील काढत बसण्यापेक्षा पक्ष मजबुतीसाठी आराखडा तयार करूया. तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊया.जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, पक्षाच्या नेतृत्वाबाबत अफवा पसरवत असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. आम्ही स्वाभिमानी आहे, कोणाच्या दारात भीक मागायला जाणार नाही, हे पक्षनेतृत्वाची भेट घेऊन सांगणार आहे. काँग्रेसने विधानसभेला मदत केली नाही, हे खरे असले तरी त्यांचेही मोठे नुकसान झाले. आता मागील काढत बसायचे नाही, काँग्रेससोबतच पुढे जायचे आहे.शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, सत्तेसाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते नाही, शरद पवार यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून लढतोय. कार्यकर्त्यांना नाउमेद न होता, पक्ष बळकटीसाठी ताकदीने कामाला लागा.धनाजीराव पर्वते, धनराज चव्हाण, बी. के. चव्हाण, विठ्ठल जगदाळे, श्रीकांत पाटील, अश्विनी माने, फिरोज बागवान, जयकुमार शिंदे, स्नेहा देसाई, शर्मिला सावंत, पद्मा तिवले, अमर चव्हाण, बी. के. डोंगळे, रोहित पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. बाजीराव खाडे, मुकुंद देसाई, रावसाहेब भिलवडे, अनिल घाटगे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.

कागल गांजाचे हब..पैसे देऊन विधानसभेला मताधिक्य कमी केल्याची वल्गना हसन मुश्रीफ करत आहे, हा मोठा विनोद असून कागलातील यशवंत किल्ल्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. मंत्र्यांचे कागल गांजाचे हब बनत असल्याचा आरोप शिवानंद माळी यांनी केला.

ऐक्याची संभ्रमावस्था दूर करादोन्ही राष्ट्रवादी एक होणार असल्याच्या चर्चा आहेत, ही संभ्रमावस्था पहिल्यांदा दूर करा. असे होणार असेल तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नसल्याचे ‘गोकुळ’चे संचालक रामराज कुपेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024