शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाची सेवा करणारी कोल्हापूरची मंडळी

By admin | Updated: September 1, 2015 00:11 IST

१८ वर्षे सलग सेवा : कोल्हापूर-गणपतीपुळे मार्गावर गाडीतील बिघाड दूर करण्यास तत्पर

कोल्हापूर : एखाद्या आडमार्गावर दुचाकी, चारचाकी बंद पडली, पंक्चर झाली, तर त्या ठिकाणी काही सेवा उपलब्ध नसल्यास किती मोठी अडचण निर्माण होते. त्याचा विचारही न केलेलाच बरा, त्यात अशावेळी एखाद्या गु्रपने मदतीचा हात दिल्यानंतर किती हायसे वाटते, अशी मदत कोल्हापुरातून गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टीसाठी जाणाऱ्यांना वाहनधारकांना तेही एकही पैशाची अपेक्षा न ठेवता मोफत सेवा देणाऱ्या अमोल सरनाईक यांच्या गु्रपची गणेश सेवा काही औरच म्हणावी लागेल.१९९६ मध्ये कोल्हापुरातील अमोल सरनाईक हे आपल्या मित्रांसह गणपतीपुळे (रत्नागिरी) येथे अंगारकी संकष्टीला गणेश दर्शनासाठी निघाले होते. जातानाच त्यांची दुचाकी साखरपा ते पालीदरम्यान पंक्चर झाली. यावेळी त्यांनी जाणा-येणाऱ्या वाहनधारकांकडे मदत मागितली, पण कोणीच मदतीचा हात दिला नाही. बिघाड झालेली गाडी त्यांनी ओढत पाली येथे नेली तेथून त्यांनी ती दुरुस्त करून पुढे गणपतीपुळे गाठले व दर्शन घेतले. ही बाब त्यांच्या मनात घर करून बसली. त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींना आपण अंगारकी संकष्टीला कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोणाची गाडी बंद पडली अथवा पंक्चर झाली, तर केवळ स्पेअर पार्टचे पैसे घेऊन ती तत्काळ दुरुस्त करून द्यायची, अशी संकल्पना मांडली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या अंगारकी संकष्टीला त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवलेही. पहिल्या वर्षी त्यात काही मोजकीच मंडळी सहभागी झाली. पुढे त्यांचे मित्र उदय चव्हाण, संदीप रसाळे, अमित नलवडे, अभिजित नारे, राजू मुजावर, शंकर केंगार, सचिन भोसले, अभिजित लोहार, उल्हास पाटील, कुणाल भोसले, रमेश बावले, विनायक पाटील, विशाल खटांगळे यांनीही साथ दिली. यंदा तर या मोफत सेवेला १८ वर्षे पूर्ण झाली. आज, मंगळवारी कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोल्हापूरच्या मंडळींनी दोन मोफत केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात चाफे गावाजवळ, तर दुसरे केंद्र गणपतीपुळे संस्थानजवळील आपत्ती व्यवस्थापन कक्षाजवळ उभारण्यात आले आहे. या सेवा केंद्राद्वारे दुचाकी, चारचाकी दुरुस्ती , पंक्चर काढणे, बंद पडल्यास टोचण लावून या केंद्रांपर्यंत आणून दुरुस्त करून देणे ही सेवा केली जाते. ‘लोकमत’शी बोलताना अमोल सरनाईक म्हणाले, आपल्या वाट्याला आलेले दु:ख दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये. देवदर्शनासाठी जाताना व तेथून सुरक्षित आपल्या घरी पोहोचावीत, अशी मनात भावना ठेवून आपण मित्रमंडळींसमवेत हे काम मोफत करतो. केवळ त्यात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या स्पेअरची किंमत घेतली जाते. भाविकांच्या सेवा अर्थात ईश्वर सेवाच मानून आम्ही हे काम करतो.