शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

अभयारण्याचे जग समजून घेतलात तरच संघर्ष संपेल --दत्तात्रय मोरसे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:10 IST

जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल तर आपल्याला ध्यानधारणेसारखी एकाग्रता आत्मसात करावी लागते - दत्तात्रय मोरसे

ठळक मुद्देपर्यावरणवादी निसर्ग साहित्यिक

इंदुमती गणेश ।गेल्या १६ वर्षांपासून अभयारण्याची सफर, भाषा आणि गव्यांवर संशोधन करणारे मठगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय मोरसे यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरणवादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंड कादंबरीला नुकताच तापीपूर्णा पुरस्कार जाहीर झाला. अभयारण्याची एकजीवनशैली आणि भाषा असते, ते समजून घेऊन त्यांच्याशी नातं घट्ट करा, असे प्रबोधन करणारे मोरसे यांची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : आपली पार्श्वभूमी सांगा?उत्तर : मी मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात माध्यमिक मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जंगल फिरण्याची आवड पूर्वीपासूनच. त्यामुळे देशभरातील बºयापैकी अभयारण्यांना मी जाऊन आलो आहे. सध्या मराठी साहित्यातील वन्यजीव या विषयावर पीएच.डी. करीत आहे. अरण्याची भाषा, जंगल साक्षरता हे दोन नवीन उपक्रम मी सध्या राबवत आहे.प्रश्न : गव्यांवर संशोधन करावे असे का वाटते?उत्तर : अभयारण्यातच फिरता फिरता मी गव्यांचा अभ्यास करू लागलो. गव्यांची प्रत्येक हालचाल टिपू लागलो. अगदी दहा फुटांच्या अंतरावरून मी त्यांचे शूटिंग घेतले आहे. आता गवा थेट गावात, शिवारात येत असला, तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यांची सांकेतिक भाषा, जीवनशैली, हावभाव समजून घेऊ लागलो आणि त्यांच्यातील संवाद समजत गेला. गव्यांच्या या विश्वावरच ‘झुंड’ ही कादंबरी आहे.

प्रश्न : अभयारण्याची भाषा कशी समजते?उत्तर : जंगलात प्रत्येक ऋुतूत पानांची, झाडाचे वेगवेगळे आवाज असतात, माणसाने जंगलात पाय ठेवला की प्रत्येक प्राण्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना धोक्याची जाणीव करून देतात, त्याला प्रतिसाद देतात. याला अरण्याची भाषा म्हणतात. प्रत्येक प्राण्याची चालण्याची पद्धत, जंगलातील वावर, आवाजातील बदल, हे सगळं म्हणजेच अरण्याची भाषा आहे.

प्रश्न : जंगल साक्षरता उपक्रमाविषयी काय सांगाल?उत्तर : नव्या पिढीला जंगलांचे, वन्यजिवांचे महत्त्व समजावे, त्यांना जंगलाची माहिती मिळावी यासाठी मी वर्षातून ठरावीक ट्रेक आयोजित करतो. विद्यार्थ्यांना जंगलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देतो. मार्गदर्शन करतो. जंगलाची-प्राण्यांची भाषा सांगतो.मानवाचेच अतिक्रमणगवा हा खरंतर पाला खाणारा प्राणी आहे. उगाचच मानवी वस्तीचा विध्वंस करायचा अशी प्राण्यांची मानसिकता नसते. माणसाने गव्यांच्या विश्वात अतिक्रमण केले आहे. वणवा, जंगलांचा नाश, शेतीसाठी वापरले जाणारे खत, उसावर किंवा पिकांवर  फवारले जाणारे कीटकनाशक यांच्या वासामुळे गव्यांची वाट चुकते आणि त्यामुळेते शेतात येतात. मग गवा आणि माणसात संघर्ष होतो. संघर्ष नेमका कुणी निर्माण केला, याचे उत्तर माणूस या शब्दावर येऊन थांबते.वन्यजीवन समजून घ्याआजकाल जंगलात फिरायला जायची फार क्रेझ आहे. मद्यपान, पॅकेटबंद चटपटीत पदार्थ जंगलात न्यायचे. वाट्टेल तो दंगा, धुडगूस घालायचा, ठिकठिकाणी कचरा करायचा असे विध्वंसक स्वरूप या सफारीचे झाले आहे. जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल, तर आपण ध्यानधारणेला ज्या समाधी अवस्थेत जातो, ती एकाग्रता स्वत:मध्ये आणावी लागेल.