शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्याचे जग समजून घेतलात तरच संघर्ष संपेल --दत्तात्रय मोरसे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:10 IST

जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल तर आपल्याला ध्यानधारणेसारखी एकाग्रता आत्मसात करावी लागते - दत्तात्रय मोरसे

ठळक मुद्देपर्यावरणवादी निसर्ग साहित्यिक

इंदुमती गणेश ।गेल्या १६ वर्षांपासून अभयारण्याची सफर, भाषा आणि गव्यांवर संशोधन करणारे मठगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय मोरसे यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरणवादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंड कादंबरीला नुकताच तापीपूर्णा पुरस्कार जाहीर झाला. अभयारण्याची एकजीवनशैली आणि भाषा असते, ते समजून घेऊन त्यांच्याशी नातं घट्ट करा, असे प्रबोधन करणारे मोरसे यांची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : आपली पार्श्वभूमी सांगा?उत्तर : मी मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात माध्यमिक मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जंगल फिरण्याची आवड पूर्वीपासूनच. त्यामुळे देशभरातील बºयापैकी अभयारण्यांना मी जाऊन आलो आहे. सध्या मराठी साहित्यातील वन्यजीव या विषयावर पीएच.डी. करीत आहे. अरण्याची भाषा, जंगल साक्षरता हे दोन नवीन उपक्रम मी सध्या राबवत आहे.प्रश्न : गव्यांवर संशोधन करावे असे का वाटते?उत्तर : अभयारण्यातच फिरता फिरता मी गव्यांचा अभ्यास करू लागलो. गव्यांची प्रत्येक हालचाल टिपू लागलो. अगदी दहा फुटांच्या अंतरावरून मी त्यांचे शूटिंग घेतले आहे. आता गवा थेट गावात, शिवारात येत असला, तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यांची सांकेतिक भाषा, जीवनशैली, हावभाव समजून घेऊ लागलो आणि त्यांच्यातील संवाद समजत गेला. गव्यांच्या या विश्वावरच ‘झुंड’ ही कादंबरी आहे.

प्रश्न : अभयारण्याची भाषा कशी समजते?उत्तर : जंगलात प्रत्येक ऋुतूत पानांची, झाडाचे वेगवेगळे आवाज असतात, माणसाने जंगलात पाय ठेवला की प्रत्येक प्राण्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना धोक्याची जाणीव करून देतात, त्याला प्रतिसाद देतात. याला अरण्याची भाषा म्हणतात. प्रत्येक प्राण्याची चालण्याची पद्धत, जंगलातील वावर, आवाजातील बदल, हे सगळं म्हणजेच अरण्याची भाषा आहे.

प्रश्न : जंगल साक्षरता उपक्रमाविषयी काय सांगाल?उत्तर : नव्या पिढीला जंगलांचे, वन्यजिवांचे महत्त्व समजावे, त्यांना जंगलाची माहिती मिळावी यासाठी मी वर्षातून ठरावीक ट्रेक आयोजित करतो. विद्यार्थ्यांना जंगलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देतो. मार्गदर्शन करतो. जंगलाची-प्राण्यांची भाषा सांगतो.मानवाचेच अतिक्रमणगवा हा खरंतर पाला खाणारा प्राणी आहे. उगाचच मानवी वस्तीचा विध्वंस करायचा अशी प्राण्यांची मानसिकता नसते. माणसाने गव्यांच्या विश्वात अतिक्रमण केले आहे. वणवा, जंगलांचा नाश, शेतीसाठी वापरले जाणारे खत, उसावर किंवा पिकांवर  फवारले जाणारे कीटकनाशक यांच्या वासामुळे गव्यांची वाट चुकते आणि त्यामुळेते शेतात येतात. मग गवा आणि माणसात संघर्ष होतो. संघर्ष नेमका कुणी निर्माण केला, याचे उत्तर माणूस या शब्दावर येऊन थांबते.वन्यजीवन समजून घ्याआजकाल जंगलात फिरायला जायची फार क्रेझ आहे. मद्यपान, पॅकेटबंद चटपटीत पदार्थ जंगलात न्यायचे. वाट्टेल तो दंगा, धुडगूस घालायचा, ठिकठिकाणी कचरा करायचा असे विध्वंसक स्वरूप या सफारीचे झाले आहे. जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल, तर आपण ध्यानधारणेला ज्या समाधी अवस्थेत जातो, ती एकाग्रता स्वत:मध्ये आणावी लागेल.