शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

अभयारण्याचे जग समजून घेतलात तरच संघर्ष संपेल --दत्तात्रय मोरसे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:10 IST

जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल तर आपल्याला ध्यानधारणेसारखी एकाग्रता आत्मसात करावी लागते - दत्तात्रय मोरसे

ठळक मुद्देपर्यावरणवादी निसर्ग साहित्यिक

इंदुमती गणेश ।गेल्या १६ वर्षांपासून अभयारण्याची सफर, भाषा आणि गव्यांवर संशोधन करणारे मठगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय मोरसे यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरणवादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंड कादंबरीला नुकताच तापीपूर्णा पुरस्कार जाहीर झाला. अभयारण्याची एकजीवनशैली आणि भाषा असते, ते समजून घेऊन त्यांच्याशी नातं घट्ट करा, असे प्रबोधन करणारे मोरसे यांची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : आपली पार्श्वभूमी सांगा?उत्तर : मी मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात माध्यमिक मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जंगल फिरण्याची आवड पूर्वीपासूनच. त्यामुळे देशभरातील बºयापैकी अभयारण्यांना मी जाऊन आलो आहे. सध्या मराठी साहित्यातील वन्यजीव या विषयावर पीएच.डी. करीत आहे. अरण्याची भाषा, जंगल साक्षरता हे दोन नवीन उपक्रम मी सध्या राबवत आहे.प्रश्न : गव्यांवर संशोधन करावे असे का वाटते?उत्तर : अभयारण्यातच फिरता फिरता मी गव्यांचा अभ्यास करू लागलो. गव्यांची प्रत्येक हालचाल टिपू लागलो. अगदी दहा फुटांच्या अंतरावरून मी त्यांचे शूटिंग घेतले आहे. आता गवा थेट गावात, शिवारात येत असला, तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यांची सांकेतिक भाषा, जीवनशैली, हावभाव समजून घेऊ लागलो आणि त्यांच्यातील संवाद समजत गेला. गव्यांच्या या विश्वावरच ‘झुंड’ ही कादंबरी आहे.

प्रश्न : अभयारण्याची भाषा कशी समजते?उत्तर : जंगलात प्रत्येक ऋुतूत पानांची, झाडाचे वेगवेगळे आवाज असतात, माणसाने जंगलात पाय ठेवला की प्रत्येक प्राण्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना धोक्याची जाणीव करून देतात, त्याला प्रतिसाद देतात. याला अरण्याची भाषा म्हणतात. प्रत्येक प्राण्याची चालण्याची पद्धत, जंगलातील वावर, आवाजातील बदल, हे सगळं म्हणजेच अरण्याची भाषा आहे.

प्रश्न : जंगल साक्षरता उपक्रमाविषयी काय सांगाल?उत्तर : नव्या पिढीला जंगलांचे, वन्यजिवांचे महत्त्व समजावे, त्यांना जंगलाची माहिती मिळावी यासाठी मी वर्षातून ठरावीक ट्रेक आयोजित करतो. विद्यार्थ्यांना जंगलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देतो. मार्गदर्शन करतो. जंगलाची-प्राण्यांची भाषा सांगतो.मानवाचेच अतिक्रमणगवा हा खरंतर पाला खाणारा प्राणी आहे. उगाचच मानवी वस्तीचा विध्वंस करायचा अशी प्राण्यांची मानसिकता नसते. माणसाने गव्यांच्या विश्वात अतिक्रमण केले आहे. वणवा, जंगलांचा नाश, शेतीसाठी वापरले जाणारे खत, उसावर किंवा पिकांवर  फवारले जाणारे कीटकनाशक यांच्या वासामुळे गव्यांची वाट चुकते आणि त्यामुळेते शेतात येतात. मग गवा आणि माणसात संघर्ष होतो. संघर्ष नेमका कुणी निर्माण केला, याचे उत्तर माणूस या शब्दावर येऊन थांबते.वन्यजीवन समजून घ्याआजकाल जंगलात फिरायला जायची फार क्रेझ आहे. मद्यपान, पॅकेटबंद चटपटीत पदार्थ जंगलात न्यायचे. वाट्टेल तो दंगा, धुडगूस घालायचा, ठिकठिकाणी कचरा करायचा असे विध्वंसक स्वरूप या सफारीचे झाले आहे. जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल, तर आपण ध्यानधारणेला ज्या समाधी अवस्थेत जातो, ती एकाग्रता स्वत:मध्ये आणावी लागेल.