शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राष्ट्रीय सुरक्षितेत नागरिकांचीही जबाबदारी, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:40 IST

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचे

कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षितता ही बाब केवळ लष्कर, वायू आणि नौदलाची जबाबदारी नाही, तर या देशातील सर्व नागरिकांचीही ही जबाबदारी आहे हे प्रथम लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. शुक्रवारी येथील रोटरी परिषदेच्या उद्घाटनावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षितता’ या विषयावर ते बोलत हाेते.नरवणे म्हणाले, आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेले लोक राहतात. मक्याची रोटी एकीकडे आणि पुरणपोळी दुसरीकडे. इतकी भिन्नता असली तरीही आपण भारत म्हणून एक आहोत. भारतातील ही वैविधता ही केवळ प्रचाराची संकल्पना नाही तर ती आमच्या जीवनाचा भाग आहे. हीच विविधता आपली ताकद असून, आता अमृतकाळात तर प्रगतीचा वेग वाढला आहे.राष्ट्रीय सुरक्षितता हा विषय डोळ्यांसमोर आला की आपल्यासमोर लगेच सैनिक,रणगाडे, संचलन येते. परंतु, ही व्यापक संकल्पना आहे. केवळ सीमांचे संरक्षण नव्हे, तर या देशातील जमीन, ऊर्जा, पाणी, आरोग्य या सगळ्याचे संरक्षण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता आहे. त्यामुळे ही सुरक्षितता करताना प्रत्येक भारतीय नागरिकाची त्यामध्ये भूमिका असली पाहिजे. बाह्य आणि अंतर्गत अशा सुरक्षिततेमध्ये आपल्याला दोन्हीकडे सातत्याने लक्ष द्यावेच लागेल. अनेकदा देशांतर्गत असुरक्षितता असते ती लवकर कळत नाही. तिचे बाहेरून नियंत्रण होत असते.जसा आरेाग्यासाठी आपण विमा हप्ता भरतो तसाच निधी देशाच्या संरक्षणासाठीच्या निधीसाठीचा हप्ता असतो. आपल्या शेजाऱ्यांचे हेतू पाहता आपल्याला संरक्षणदृष्ट्या सिद्धच राहावे लागेल. सध्या सगळीकडे शांतता आहे मग लष्करावर इतका खर्च कशाला असे विचारले जाते. परंतु, ते योग्य नाही. कारण लष्करी सामर्थ्य एका रात्रीत उभे करता येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजनपूवर्क खर्च करावा लागतो. ही एक प्रकारची गुंतवणूकही आहे. कारण देशांतर्गत संरक्षण उत्पादनांचे प्रमाण वाढले असून, तो पैसा देशातच राहतो.

शांतता हवी असेल तर युद्धसज्जता हवीच

पूर्वीपासून एक वाक्य सांगितले जाते की, ‘जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धसज्जता ठेवावीच लागते’. हे सत्य असून, त्यामुळेच गृहीत न धरता सर्व प्रकारची युद्धसज्जता ठेवण्याकडे भारताचा कल आहे. युक्रेनने याकडेच दुर्लक्ष केल्याने त्यांना ते महाग पडले. आपल्या देशाचे युद्ध झाले नाही तर आता जगात कुठेही युद्ध झाले तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो हे वास्तव आहे.

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचेराष्ट्राच्या सुरक्षिततेचा विचार करता नागरिकांनी समाजविघातक पोस्ट आणि मजकूर फॉरवर्ड न करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे असा टोलाही यावेळी नरवणे यांनी लगावला. रोटरीने या सर्व गोष्टी डोळ्यांसमोऱ ठेवून उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmanoj naravaneमनोज नरवणे