शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

सर्किट बेंचची मागणी योग्यच, पायाभूत सुविधा पाहून निर्णय; मुख्य न्यायमूर्तींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:27 IST

कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करावे, या मागणीसाठी १९८७पासून लढा सुरु

कोल्हापूर-मुंबई : कोल्हापूरची सर्किट बेंचची मागणी योग्यच आहे. परंतु, तिथे कोणत्या स्वरुपाच्या पायाभूत सुविधा आहेत हे पाहावे लागेल व त्यासाठी थोडा अवधी हवा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले. न्यायमूर्तींनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या लढ्याचे एक पाऊल पुढे पडले.सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या शिष्टमंडळाने न्यायमूर्ती दत्ता यांची मुंबई उच्च न्यायालयातील सभागृहात भेट घेतली व सुमारे दीड तास चर्चा केली. या बैठकीनंतर खंडपीठ कृती समितीच्यावतीने बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यात आली.मुख्य न्यायमूर्तींनी कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. कोल्हापुरात किती वकील प्रॅक्टीस करतात, विमानसेवा कशी आहे, इमारत आदींबाबत माहिती घेतली.शिष्टमंडळाच्यावतीने निवृत्त न्यायाधीश टी. व्ही. नलवडे, ॲड. युवराज नरवणकर, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे व संग्राम देसाई यांनी न्यायमूर्तींशी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करावे, या मागणीसाठी १९८७पासून लढा सुरु असल्याचे प्रास्ताविकात निवृत्त न्यायाधीश नलवडे यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी माजी मुख्यमंत्री सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस व आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्किट बेंच होण्याबाबत पत्रे दिली आहेत.ॲड. नरवणकर म्हणाले, जसवंतसिंग समितीने मागणी असेल तिथे सर्किट बेंच मंजूर करावे, असे म्हटले होते. त्यानुसार आतापर्यंत गुलबर्गा व धारवाड येथे सर्किट बेंच मंजूर करण्यात आले. जसवंतसिंग समितीचा अहवाल केंद्र सरकारनेही मान्य केला आहे. त्यामुळे कोल्हापूरची मागणी रास्त आहे. तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनीही या मागणीबाबत सकारात्मक मत नोंदविले होते.ॲड. संग्राम देसाई म्हणाले, आम्ही गेली ३४ वर्षे सर्किट बेंचची मागणी करत आहोत. सरकारनेही या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय घ्यावा.

या शिष्टमंडळात कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, विजयकुमार ताटे-देशमुख, विवेक घाटगे, संकेत जाधव, संतोष शहा, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, प्रशांत चिटणीस, प्रकाश मोरे, विजय महाजन, एन. बी.भांदिगरे, राजेंद्र किंकर, आर. बी. पाटील, एस. एस. खोत, विजय कदम, सचिन मांडके, विश्वास चिडमुंगे, संदीप चौगले, तृप्ती नलवडे, आदित्य रक्ताडे आदींचा समावेश होता.

न्यायमूर्तींना कोल्हापूर भेटीचे निमंत्रणसर्किट बेंचसाठी आवश्यक असणाऱ्या कोल्हापुरातील पायाभूत सुविधांची पाहणी करु, असे न्यायमूर्तींनी सांगितले. खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांनी त्यांना लगेच कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले.

५० एकर जागा आरक्षित

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांनी कोल्हापुरात राज्य शासनाने सर्किट बेंचसाठी ५० एकर जागा आरक्षित केल्याची माहिती न्यायमूर्तींना दिली. कोल्हापुरातील सुविधांची माहिती त्यांनी नकाशाद्वारे पटवून दिली. सध्याच्या न्यायालयाच्या इमारतीचे व जुन्या इमारतींचीं छायाचित्रे न्यायमूर्तींना यावेळी दाखविण्यात आली.

न्यायाधिशांचीही कमतरता...मुंबई येथील उच्च न्यायालयातही खटले निकाली निघण्याचे प्रमाण जास्त आहे. उच्च न्यायालयात लोक न्याय मागण्यासाठी येतात. येथे ९४ न्यायाधीशांची मंजुरी आहे, परंतु प्रत्यक्षात ६९ आहेत, त्यापैकी दहा यावर्षी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुरेसे मनुुष्यबळ नाही. औरंगाबाद व नागपूर खंडपीठासाठी मुंबई उच्च न्यायालयातूनच न्यायाधीश पाठवावे लागले आहेत. त्यामुळे सध्या उच्च न्यायालयात फक्त तत्काळ खटल्यांसाठीच वेळ दिला जात असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यावर मुंबईतील ताण कमी होईल, हे शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनाला आणूून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय