शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत आहेत !

By admin | Updated: October 29, 2015 00:28 IST

अजित पवार : सत्ताधारी गांडुळासारखे दुतोंडी

सांगली : जलसंधारणाची, जलस्रोतांच्या सक्षमीकरणाची कामे आमच्या काळातच सुरू झाली. ज्या कामांची उद्घाटने आज मुख्यमंत्री करताहेत, तसेच कार्यक्रम आमच्याही कालावधीत झाले होते. त्यामुळे आघाडी सरकारने काही केले नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत. गांडुळासारखी दुतोंडी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वत:कडे घ्यायचे आणि वाईट गोष्टींचे खापर आघाडी सरकारवर फोडायचे, अशी दुटप्पी भूमिका युती सरकार घेत आहे. जलसंधारणाची, तलाव पुनर्भरणाची, जलस्रोतांच्या सक्षमीकरणाची कामे आमच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर झाली होती. दुष्काळी तालुक्यांना त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. ही कामे चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर आम्हीही कार्यक्रम घेतले होते. त्याच योजनांची नावे बदलून सध्याचे सरकार काम करीत आहे. मार्केटिंग करून केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले आहे. आता राज्यातील आणि देशातील शेतकरी, नागरिक समाधानी नाहीत. त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. आठ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात एकालाही ही मदत मिळालेली नाही. मग आठ हजार कोटी रुपये गेले कोठे? प्रत्येकाला खाती काढायला सरकारने सांगितले. खात्यांचे आकडेही जाहीर झाले. मात्र कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. निधीच्या विभागीय वादाचा मुद्दा उपस्थित होत असला तरी, असा कोणताही भेदभाव होता कामा नये. सर्वांनाच समान वाटणी झाली पाहिजे. आघाडी सरकारच्या काळात सर्वच महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे होती. त्यामुळे या भागातील योजनांना न्याय मिळत होता, ही वस्तुस्थिती आहे. तरीही वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या काळापासून विभागीय दुजाभाव कधीही झाला नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा सर्वच विभागांनाही आघाडी सरकारच्या काळात तितकीच मदत केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी निधी आणण्यात येथील लोकप्रतिनिधीच कमी पडत असावेत, असे वाटते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यास सरकार कमी पडत आहे. त्यातच खोटे व बिनबुडाचे आरोप करून अनेक गोष्टींचे खापर आघाडी सरकारवर फोडले जात आहे. सरकारला वर्ष पूर्ण झाल्याने जाहिरातीसाठी कोट्यवधी खर्च केले जात आहेत. (प्रतिनिधी)नरड्याला आलं की जाग येते !प्रत्येक गोष्ट नरड्याला आली की सरकार जागे होते. डाळीच्या दराने शंभरी गाठली, त्यावेळीच छापे टाकून साठवणुकीवर निर्बंध आणायला हवे होते. डाळ दोनशेवर जाईपर्यंत सरकार काय करीत होते? उसाच्या बाबतीतही तसेच झाले. हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व प्रश्न सुटायला हवे होते. तोडणी वाहतुकीपासून ऊसाच्या दरापर्यंत प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आले. परदेशातील उद्योजकांना ‘रेड कार्पेट’ अंथरणाऱ्या सरकारने साखर कारखानदारी मोडीत निघत आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे पवार म्हणाले.