शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत आहेत !

By admin | Updated: October 29, 2015 00:28 IST

अजित पवार : सत्ताधारी गांडुळासारखे दुतोंडी

सांगली : जलसंधारणाची, जलस्रोतांच्या सक्षमीकरणाची कामे आमच्या काळातच सुरू झाली. ज्या कामांची उद्घाटने आज मुख्यमंत्री करताहेत, तसेच कार्यक्रम आमच्याही कालावधीत झाले होते. त्यामुळे आघाडी सरकारने काही केले नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत. गांडुळासारखी दुतोंडी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वत:कडे घ्यायचे आणि वाईट गोष्टींचे खापर आघाडी सरकारवर फोडायचे, अशी दुटप्पी भूमिका युती सरकार घेत आहे. जलसंधारणाची, तलाव पुनर्भरणाची, जलस्रोतांच्या सक्षमीकरणाची कामे आमच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर झाली होती. दुष्काळी तालुक्यांना त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. ही कामे चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर आम्हीही कार्यक्रम घेतले होते. त्याच योजनांची नावे बदलून सध्याचे सरकार काम करीत आहे. मार्केटिंग करून केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले आहे. आता राज्यातील आणि देशातील शेतकरी, नागरिक समाधानी नाहीत. त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. आठ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात एकालाही ही मदत मिळालेली नाही. मग आठ हजार कोटी रुपये गेले कोठे? प्रत्येकाला खाती काढायला सरकारने सांगितले. खात्यांचे आकडेही जाहीर झाले. मात्र कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. निधीच्या विभागीय वादाचा मुद्दा उपस्थित होत असला तरी, असा कोणताही भेदभाव होता कामा नये. सर्वांनाच समान वाटणी झाली पाहिजे. आघाडी सरकारच्या काळात सर्वच महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे होती. त्यामुळे या भागातील योजनांना न्याय मिळत होता, ही वस्तुस्थिती आहे. तरीही वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या काळापासून विभागीय दुजाभाव कधीही झाला नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा सर्वच विभागांनाही आघाडी सरकारच्या काळात तितकीच मदत केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी निधी आणण्यात येथील लोकप्रतिनिधीच कमी पडत असावेत, असे वाटते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यास सरकार कमी पडत आहे. त्यातच खोटे व बिनबुडाचे आरोप करून अनेक गोष्टींचे खापर आघाडी सरकारवर फोडले जात आहे. सरकारला वर्ष पूर्ण झाल्याने जाहिरातीसाठी कोट्यवधी खर्च केले जात आहेत. (प्रतिनिधी)नरड्याला आलं की जाग येते !प्रत्येक गोष्ट नरड्याला आली की सरकार जागे होते. डाळीच्या दराने शंभरी गाठली, त्यावेळीच छापे टाकून साठवणुकीवर निर्बंध आणायला हवे होते. डाळ दोनशेवर जाईपर्यंत सरकार काय करीत होते? उसाच्या बाबतीतही तसेच झाले. हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व प्रश्न सुटायला हवे होते. तोडणी वाहतुकीपासून ऊसाच्या दरापर्यंत प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आले. परदेशातील उद्योजकांना ‘रेड कार्पेट’ अंथरणाऱ्या सरकारने साखर कारखानदारी मोडीत निघत आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे पवार म्हणाले.