शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

..त्यावेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरची हद्दवाढ का केली नाही, अमल महाडिक यांची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:57 IST

'..तर आंदोलन केले जाईल'

कोल्हापूर : हद्दवाढ करण्याची जबाबदारी सर्वच लोकप्रतिनिधींची आहे. हद्दवाढ कोणत्या पक्षावर ढकलण्याचे महत्त्वाचे नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडीकडे सत्ता होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी हद्दवाढ का केली नाही, असा प्रश्न आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी केला.जिल्ह्याने महायुतीला भरभरून दिले आहे. यामुळे हद्दवाढीचा निर्णय सत्तेत असणाऱ्यांनी घ्यायला हवे, आमच्या हातात काहीही नाही, अशी भूमिका काॅंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी मांडली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार महाडिक हे हद्दवाढ विरोधी कृती समितीने निवेदन दिल्यानंतर बोलत होते.ते म्हणाले, महायुती सरकार शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला न्याय देईल. यावर राज्याचे तिन्ही नेते निर्णय घेतील. ग्रामीण भागातील जनतेला सुविधा देण्यास सक्षम आहे, हे महापालिकेने दाखवणे गरजेचे आहे. काही ग्रामपंचायती शहराला जोडूनच आहेत. या गावातील लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा निर्णय घ्यावा लागेल.प्राधिकरणाच्या माध्यमातून शेजारील गावांना कोणताही कर न वाढता सर्व सुविधा पाच ते सात वर्षे देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करीत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर हद्दवाढीबाबत विचार होईल. माझा मतदारसंघ दोन्ही भागांत आहे. शहराचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेलाही सुविधा देणे कर्तव्य आहे. सर्वांना विचारात आणि विश्वासात घेऊन निर्णय घेणे योग्य राहील.दरम्यान, यावेळी सर्वपक्षीय कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हद्दवाढीसाठी मुंबईत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. पण, यापूर्वीच २० गावांनी हद्दवाढीला कडाडून विरोध केला आहे. गावे बंद ठेवून हद्दवाढ होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. मूळ कोल्हापूरचा विकास करण्यात महापालिकेस यश आलेले नाही. विकास कामांचा बोजवारा उडालेला आहे.शहराच्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावे विकासात पुढे आहेत. ग्रामपंचायती गावचा विकास करण्यास सक्षम आहेत. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांतून निधीही मिळत आहे. यामुळेच हद्दवाढीला विरोध आहे. हद्दवाढ झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघणार आहे. शेत जमिनीवर आरक्षण पडल्याने शेतीवर संकट येणार आहे. अवाजवी पाणी, घरपट्टी वाढणार आहे. बांधकाम फी परवडणारी नाही. यामुळे कोणत्याही परिस्थिती हद्दवाढ करू नये.निवेदनावर उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे, पाचगावचे नारायण गाडगीळ, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, बालिंगे सरपंच राखी भवड, माजी सरपंच मयूर जांभळे, पूजा जांभळे, वाडीपीरचे सरपंच अनिता खोत, उपसरपंच सागर लाड, नागदेवाडी सरपंच अमृता पोवार, वडणगे सरपंच संगीता पाटील, आंबेवाडी सरपंच सुनंदा पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, सरनोबत सरपंच शुभांगी आडसूळ, गडमुडशिंगीचे सरपंच आश्विनी शिरगावे, कळंबा सरपंच सुमन गुरव, वळीवडे सरपंच रूपाली कुसाळे यांच्यासह ३९ जणांच्या सह्या आहेत.

..तर आंदोलन केले जाईलमूळ शहराचाच विकास झालेला नाही. त्यामुळे पहिल्यापासून शहरालगतच्या २० गावांचा हद्दवाढीला विरोध आहे. विरोध डावलून हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास मोर्चे, आंदोलन, उपोषण, रस्ता रोको केले जाईल, असा इशाराही समितीने निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील