शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बैलगाडी कालव्यात पडून बैलांचा मृत्यू, कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे खुर्द येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:13 IST

लोकांनी बैलांना वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला

रमेश वारके

बोरवडे : शेतातील कामे आटोपून परताना अचानक बैल घाबरल्याने बैलगाडी शेतकऱ्यासह कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत दोन बैलांचा मृत्यू झाला. वाळवे खुर्द (ता. कागल) येथे आज, बुधवार (दि.१९) सकाळच्या सुमारास घडली ही घटना घडली. यात शेतकरी खुटाळे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.याबाबत माहिती अशी की, शेतकरी दिलीप खुटाळे हे सकाळी खाणीचे शेत नावाच्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. काम आटोपून बैलगाडीने ते कालव्याच्या काठावरील रस्त्याने घरी निघाले होते. अचानकपणे बैल घाबरल्याने कालव्यात पडले. गळ्यामध्ये बैलगाड्याचे सापती असल्यामुळे बैलांना पोहून बाहेर येता आले नाही. मात्र शेतकरी कसाबसा बचावला. 

त्यांनी आरडाओरडा करुन लोकांना गोळा केले. लोकांनी बैलांना वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बैलांचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त होत होती. गरीब शेतकऱ्याच्या दोन बैलांचा अचानक  मृत्यू झाल्याने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर