शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ब्रीसक’ जाणार परत; कारखाना दुसऱ्यांना चालवायला द्या गडहिंग्लज कारखाना : हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:42 IST

गेली पाच वर्षे बीसक कंपनीने कारखाना चालविला, एफआरपीप्रमाणे ऊस बिले वेळेवर दिली. तोडणी-वाहतूकदारांची बिले, कमिशन, डिपॉझिटही वेळेवर दिले. करारानुसार कामगारांची देणी व थकीत पगारही दिला.

गडहिंग्लज : गेली पाच वर्षे बीसक कंपनीने कारखाना चालविला, एफआरपीप्रमाणे ऊस बिले वेळेवर दिली. तोडणी-वाहतूकदारांची बिले, कमिशन, डिपॉझिटही वेळेवर दिले. करारानुसार कामगारांची देणी व थकीत पगारही दिला. जी योग्य देणी आहेत त्यापोटी तीन कोटी रुपये २९ मे २०१८ रोजी जमा केले आहेत. यापुढे कंपनी कारखाना चालविणार नाही. त्यामुळे तत्काळ साखर आयुक्तांबरोबर बैठक घेऊन येणे-देणे निश्चित करून कारखाना दुसºयांना चालवायला देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असा सल्ला आमदार हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.

पत्रात पुढे म्हटले, ‘दौलत’सारखी गडहिंग्लजची अवस्था होऊ नये म्हणून शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदारांच्या हितासाठी तत्कालीन संचालक मंडळाने माझ्या संबंधामुळे ‘ब्रीसक’ कंपनीने शासन व आयुक्तांच्या निर्णयानुसार सहयोग तत्त्वावर कारखाना चालवायला घेतला आहे. कराराप्रमाणे साखर आयुक्तहे लवाद आहेत. त्यांचा निर्णय मान्य नसल्यास उच्च न्यायालयात दाद मागता येईल.

परंतु, कारखाना चालवायला देण्याची निविदा काढण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत विचारविनिमय करून पुढील कार्यवाही करावी. ऊसक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तोडणी-वाहतूक यंत्रणा, कारखान्यातील मेंटनन्स्ची कामे करण्यासाठी येणाºया घटकांना संधी दिली नाही तर कारखाना सुरू होण्यात अडचणी येऊ शकतात.

साखर व्यवसाय अडचणीत असल्यामुळे प्रचंड तोटा सहन करूनदेखील पाच वर्षे कंपनीने कारखाना चालविला. तरीदेखील करारामध्ये नसलेल्या मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद केले आहे. परंतु, कराराबाहेर कंपनी कोणतीही गोष्ट करणार नाही, ती कारखाना सोडून जात आहे. तिच्यावर सक्ती करू शकत नाही, असेही मुश्रीफ यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

कंपनी बैठकीस येणार नाहीकामगार व कंपनीत प्रेम राहिलेले नाही. त्यामुळे प्रांताधिकारी किंवा कामगार आयुक्त यांनी बोलविलेल्या कोणत्याही बैठकीस कंपनी उपस्थित राहणार नाही. परंतु, केवळ कारखाना व कामगार यांच्या येणी-देणीबाबत साखर आयुक्तांबरोबरच्या चर्चेलाच कंपनी उपस्थित राहील, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.सुमारे ७० कोटी खर्च केलेकरारानुसार ४३ कोटी ३ लाख कंपनीने कारखान्याला द्यावयाचे होते. त्यापैकी ४१ कोटी दिले आहेत. करारात नसतानाही कारखाना चालविण्यासाठी १९ कोटी ८७ लाख आणि गाळप क्षमता वाढीसाठी ८ कोटी ९७ लाख असे एकूण ६९ कोटी ८४ लाख रुपये कंपनीने खर्च केले आहेत. त्याचा हिशेब कारखाना व साखर आयुक्तांकडे अलाहिदा सादर करीत आहे, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले आहे.मोर्चा, आरोप बंद करावेत : पाच वर्षे कंपनीने कामगारांना भाकरी दिली आहे. त्यामुळे त्यांना शिव्या देणे, आरोप करणे व मोर्चा काढणे कामगारांनी बंद करावे, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने