शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:26 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती.

ठळक मुद्देभाजप सरकारला तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शहरासाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही.

कोल्हापूर : राज्यात तसेच केंद्रात भाजपचे सरकार आणि कोल्हापूर महानगरपालिकेत कॉँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता अशी विचित्र परिस्थिती गेल्या पाच वर्षांत निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास म्हणावा तितक्या गतीने झाला नाही. उलट कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पही पूर्णत्वास गेले नाहीत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता राज्यात सत्तांतर झाल्यामुळे आणि कॉँग्रेस-राष्टÑवादी या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे महापालिकेचे भाग्य उजळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना मोठी खाती मिळाली. त्यांना सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महानगरपालिकेची निवडणूक झाली. महापालिकेवर भाजपचा झेंडा लावायचा, असा निर्धार पाटील यांनी केला. त्यांनी त्याकरिता महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी युती केली; परंतु भाजप व ताराराणी आघाडी यांना ३३ जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले. त्याचे शल्य पाटील यांच्या मनात सतत पाच वर्षे बोचत राहिले.

राज्यात आणि महापालिकेतील सत्तेत एकमेकांच्या विरोधातील मंडळी बसल्याने महापालिकेचे गेल्या पाच वर्षांत मोठे नुकसान झाले. महापालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून दोन उपायुक्त, दोन साहाय्यक आयुक्त, आरोग्याधिकारी, जल अभियंता, कार्यकारी अभियंता अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या पदांचे अधिकारी राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर दिले जातात. सातत्याने मागणी करूनही हे अधिकारी आजअखेर मिळालेले नाहीत. कोणी पाठपुरावा करायला गेलेच तर त्यांना ‘तेवढं सोडून बोला’ असे वरिष्ठ अधिकारी खासगीत सांगत होते. वरिष्ठ अधिकारी, राज्यकर्त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे महापालिकेचा कारभार खिळखिळा झाला.

कॉँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरसाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली. योजनेच्या कामाला सुरुवात झाली आणि भाजप सरकार सत्तेवर आले. या योजनेच्या पूर्ततेकरिता केंद्र व राज्य सरकारने निधी दिला असल्यामुळे सरकारच्या नियंत्रणाखालीच ही योजना पूर्ण करणे आवश्यक होते; पण तसे घडले नाही. योजनेवर काम करण्याकरिता पाच ते सहा अभियंता मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती; पण या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अधिकारी दिले नसल्यामुळे आजही एकच शाखा अभियंता या योजनेचे काम पाहत आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम महापालिकेने हाती घेतले असून, पहिल्या टप्प्यातील सर्व कामे स्वनिधीतून केली. दुसºया टप्प्यासाठीच्या निधीसाठी तत्कालीन महापौर हसिना फ रास, सरिता मोरे यांनी सरकारकडे मागितला. निवेदने दिली, तत्कालीन पालकमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली; पण कसलेच सहकार्य मिळाले नाही.

अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती. शहरातील खराब रस्ते करण्याकरिता १७८ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव, सेफ सिटी दुसरा टप्पा, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण, आदी प्रस्ताव प्रलंबित राहिले. भाजप सरकारला तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शहरासाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही.फक्त टोल घालवला...भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी कोल्हापुरातील टोल घालविण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला जागत सरकारने टोल घालवला हे खरे असले तरी कोल्हापूर शहराचे सगळे प्रश्न सुटले असे नाही. शहरातील रस्ते महापुरात वाहून गेले असताना त्यासाठी विशेष बाब म्हणून निधी दिला असता तरीही जनतेने कौतुक केले असते. जलवाहिनी टाकणे (११४ कोटी) तसेच ड्रेनेज लाईन टाकणे (७० कोटी) या कामांसाठी राज्य सरकारने निधी दिला खरा; पण ही कामेही अर्धवट आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा