शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खेबवडेच्या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण; विट्टभट्टी कामगारांच्या ठेक्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 1:06 PM

विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली.

कोल्हापूर: विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. सागर सुरेश गायकवाड (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. बेनिंग्रेच्या सहा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केल्याचे जखमी सागरने कागल पोलीसांना सांगितले. संशयित सागर व इतर पाच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, सागर गायकवाड हा शेती करतो. खेबवडे गावात त्याचा विटभट्टी व्यवसाय आहे. रविवारी दूपारी तो शेतात पाणी पाजत होता. यावेळी त्याचे मोबाईलवर सागर नावाच्या व्यक्तिचा फोन आला. तुम्हाला मी ओळखतो, महत्वाचे काम आहे, तुम्ही कागलमध्ये येवून भेटा असा निरोप आल्याने सागर मेव्हणा विरकुमार भिकाजी पाटील यांची दूचाकी घेवून गेला. कागल नाका येथील एका हॉटेलच्या दारात आलेनंतर संशयित याठिकाणी दूचाकीवरुन थांबून होते. त्यांनी सागर गायकवाड याला तुमच्या विटभट्टीवरील कामगार कुठे आहेत. त्याने साहित्य ठेवून बाजार आनण्यासाठी ते कागलला गेले असल्याचे सांगितले.

आमचे कामगार तू का घेतले म्हणून शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. तेथून त्याला दूचाकीवरुन व्हन्नुर माळावर, यळगुड, निपाणी आदी ठिकाणी नेवून काठीने बेदम मारहाण केली. मध्यरात्री दोनपर्यंत त्याला फिरवीत होते. कर्नाटक सीमा भागात लघुशंकेला आले म्हणून सागरने संशयितांच्या हातातून सुटका करीत ऊसातून पळ काढला. चालत तो निपाणी येथील बहिणीच्या घरी आला. तेथून भाऊ प्रतापला फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मारहाण इतकी जोरात केली आहे की, सागरच्या अंगावरील कातडे निघून गंभीर जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर