शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकरी विरोधी कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा, राजू शेट्टींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 17:30 IST

शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार

अनिल पाटीलसरुड : इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले असतानाही शासन व साखर कारखानदारांनी एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तुकडे पाडण्याचे व ऊसाला अपेक्षीत दर न देण्याचे कुटील कारस्थान रचले आहे. त्यामुळे भविष्यात हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी  शेतकऱ्यांनी टोकाच्या संघर्षासाठी सज्ज रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गावांच्या संपर्क दौऱ्याप्रसंगी सरुड येथे बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, उत्पादन खर्च पाहता २०१९ नंतर ऊस दरामध्ये अपेक्षित अशी दरवाढ झाली नाही. वास्तविक रासायनिक खते, मशागत खर्च, कीटक, तसेच तणनाशकांचा खर्च आदी खर्चामध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ होऊन उत्पादन खर्च वाढला असताना त्या प्रमाणात ऊस दरामध्ये वाढ करणे गरजेचे होते. परंतु शासन तसेच साखर कारखानदारांकडून त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.उलट एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन तुकडे पाडण्याचे कुटील कारस्थान सुरु आहे. शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढकार घेणार असून संघटनेच्यावतीने लवकरच प्रत्येक गावा गावात सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उसाला प्रतिटन सातशे ते नऊशे रुपये जादा मिळावेतसाखर कारखान्यांकडून उत्पादित होत असलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ झाल्याने सध्या इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. इथेनॉलला मिळणारा हा दर पाहता साखर कारखान्यांना ऊसाला सध्या देत असलेल्या दरापेक्षा अधिक ७०० ते ९०० रु पर्यंत जादा दर देण्यास काही अडचण नाही असेही शेट्टी यांनी यावेळी मुद्यासह पटवुन सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने