शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेडे व्हा, कष्टाला कधी लाजू नका

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

‘अभिग्यान’मधून प्रेरणा : डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद; ‘केआयटी’चा उपक्रम

कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरूर कमवा; मात्र समाजासाठीदेखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका, असा प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१७’मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉन्फरन्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात, ते ओळखून ‘गोली वडा’ची सुरुवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा; मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाऱ्या आव्हानांना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रिअल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था, आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेची साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले तरच मोठा बदल घडू शकतो; कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारी रूप आणून त्यांत रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे; मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत राहा, समाजासाठी काम करा. ‘नाम’ संस्था यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार आहे. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टी, अनुभवांतून स्वत:चे करिअर घडविले. आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या दोन हातांचा उपयोग नोकरीसाठीच्या विनवणीकरिता करू नका. उद्योग-व्यवसायाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक राहा. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, मागासवर्गीय समाजातील युवकांना ‘दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून नोकरी, राजकारण सोडून उद्योजकतेचा मार्ग दाखवून दिला आहे. शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्रोतांचा योग्य वापर करा. कौशल्य विकास साधा. या कार्यक्रमास ‘केआयटी’चे उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रॉडक्शनचे प्रमुख ए. एम. पिसे, अधिष्ठाता प्रीती पाटील, ‘वॉक विथ वर्ल्ड’चे समन्वयक प्रा. हर्षद ठाकूर, आदींसह विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)