शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य’साठी ‘करो या मरो’ची लढाई

By admin | Updated: February 15, 2017 00:54 IST

‘शेकाप’ ‘जनता दल’चे अस्तित्व पणाला : स्थानिक आघाड्यांना हवा करण्यात यश; सत्तेच्या सारीपाटात येणार महत्त्व

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --एकेकाळी चार आमदार व राज्यभर नेटवर्क असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला या निवडणुकीत अस्तित्वासाठी झुंजावे लागत आहे. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातंर्गत आलेली मरगळ झटकून जिल्हा परिषद व पंचायत समितीत पक्षाध्यक्षांनी कंबर कसली असली तरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच राहणार आहे. इतर छोटे-छोटे पक्ष व आघाड्यांनी या निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच हवा केली असून ही हवा मतदान यंत्रांपर्यंत पोहोचली तर सत्तेच्या सारीपाटात या आघाड्यांना महत्त्व येणार आहे. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी स्थापनेवेळीच चार आमदार निवडून आणत राज्यात दबदबा निर्माण केला. या ताकदीवरच पाच वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. कोल्हापूर महापालिकेची सत्ताही पक्षाच्या ताब्यात राहिली. ‘विनय कोरे यांना वगळून जिल्ह्याचे राजकारण करणेच अशक्य,’ अशी हवा पक्षाने निर्माण केली होती. इतर राजकीय पक्षांना चांगला पर्याय म्हणून जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण ही हवा फार काळ टिकली नाही. २००९ ला फक्त दोन आमदार निवडून आले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील स्वत: कोरेंचा समावेश होता. महापालिकेबरोबर राज्यातील सत्तेतही वाटा नसल्याने पक्षाची गोची झाली. या कालावधीत पक्षांतर्गत मोठी पडझड झाली. त्याचा फटका सन २०१४ च्या विधानसभेला बसला. राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या पक्षाची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. भाजपसोबत आघाडी केली असली तरी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या ‘स्वाभिमानी’, ‘ताराराणी’ यांच्याशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत. त्याचा फटकाही या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. विद्यमान सभागृहात पक्षाचे सहा सदस्य आहेत. आता पक्षाच्या चिन्हावर चौदा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. बालेकिल्ला असलेल्या पन्हाळा तालुक्यात सर्व विरोधकांनी त्यांना घेरल्याने तिथे गेल्यावेळच्या चार जागा राखतानाही दमछाक उडणार आहे.दोन्ही काँग्रेसला खिंडार पाडत भाजपला रसद पुरविणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘ताराराणी’आघाडी रिंगणात उतरली आहे. आघाडीचे सहा उमेदवार असून त्यापैकी तिघांनी इतर पक्षांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, नंदिनी बाभूळकर व गोपाळराव पाटील यांच्या ‘युवक क्रांती’ने चंदगड चार व हातकणंगलेत दोन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने ‘करवीर’मध्ये तीन, तर चंदगड व शाहूवाडी तालुक्यात प्रत्येक एक असे पाच उमेदवार उभे केले आहेत. जनता दलाने बड्याचीवाडी व सरवडे या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. भारिप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती पार्टी, बसपा, रासप, मनसे, माकप, ब्लॅक पॅँथर, ‘रिपाइं’ या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीचा रागरंग पाहिला तर कोणत्याही एका पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता येणार नाही, हे निश्चित आहे. दोन पक्ष एकत्र आले तरीही सत्तेची ३४ ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे मुश्कील असल्याने सत्तेचा सारीपाट मांडताना ‘जनसुराज्य’सह छोटे पक्ष व अपक्षांना महत्त्व येणार आहे. ‘रिपाइं’ ची ताकद विभागली!प्रत्येक गावात ‘रिपाइं’ पक्षाची ताकद असल्याने या गटांना बेदखल करता येत नाही; पण ही ताकद विविध गटांत विभागल्याने या पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकसंधपणे सर्व गट निवडणुकीला सामोरे गेले असते तर वेगळे चित्र दिसले असते. असे आहेत उमेदवार रिंगणात-जनसुराज्य -१४, ताराराणी आघाडी-६,युवक क्रांती-६, ताराराणी विकास आघाडी-५, बहुजन मुक्ती पार्टी-५, शेकाप-५, जनता दल-२, भारिप-३,बसप-२.जिल्हा परिषदेच्या ६७ मतदारसंघात एकूण ६६ अपक्ष रिंगणात आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांसमोर या अपक्षांनी कमी-अधिक प्रमाणात आव्हान निर्माण केले आहे. दोन -तीन ठिकाणी अपक्ष बाजी मारण्याची शक्यताही आहे.