शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजीपाल्याचे दर अजून चढेच, पेरू, डाळिंबांचे ढीग, दरही उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:18 IST

पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे दर अजून चढेचपेरू, डाळिंबांचे ढीग, दरही उतरले

कोल्हापूर : पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत. घाऊक बाजारात भाजीचा सरासरी ४० ते ५०, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोचा दर राहिला आहे. पुरामुळे ऐन श्रावणात भाजीपाल्याची महागाई अनुभवायला मिळत आहे.गेल्या आठवडाभर जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाला काढता येत नाही. काढला तरी तो बाजारात पोहोचविण्यासाठी रस्तेच सुरू नाहीत. नदीलगत असणाऱ्या शिवारांत तर अजून पाणी असल्याने पीक पाण्याखाली जाऊन कुजू लागले आहे. या सर्वांमुळे रविवारी बाजारात भाजीपाला खूपच कमी दिसत होता. मालच कमी आल्याने दरही वाढवण्यात आले होते.दर किलोमध्ये

  • टोमॅटो ४० ते ६०
  • वांगी ६० ते ७०
  • ओली मिरची ६०
  • ढबू मिरची ६०
  • भेंडी ५० ते ६०
  • कारली ५० ते ६०
  • ओला वाटाणा ८० ते १००
  • दोडका ७० ते ८०
  • बिनीस ६० ते ७०
  • फ्लॉवर २५ ते ४० रुपये गड्डा
  • कोथिंबीर १५ ते २५ रुपये पेंढी
  • मेथी २० ते २५ रुपये पेंढी
  • कांदा पात व पालक १० ते १५ रुपये पेंढी 

ज्वारी महागलीआवक आणि मालवाहतुकीचे कारण सांगत ज्वारी आणि गव्हाचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात ४० रुपये असणारी ज्वारी आता ५० रुपयांवर गेली आहे. एक नंबर शाळू ५६ रुपये प्रतिकिलो झाला आहे. गहूही वाढला आहे. ३० ते ३२ रुपयांचा गहू आता ३५ ते ३६वर गेला आहे.डाळिंब, सीताफळांचे ढीगफळबाजारात सीताफळ आणि पेरूची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला आणि कोपऱ्या-कोपऱ्यांवर विक्रेते ढीग लावून ही फळे विकताना दिसत आहेत. किलोचा दर ३० ते ५० रुपये असा आहे.

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर