शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 12:14 IST

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : अविकाज सेक्युअर इन्क्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ गुंतवणूकदारांना एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संजय सदाशिव चव्हाण (वय ३८, रा. गिरगाव, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कंपनीच्या संचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा प्रकार मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात घडला.कंपनीचा संचालक पिरगोंडा उर्फ विजय नरसगोंडा पाटील (रा. हातकणंगले) याच्यासह अश्विनी जयवंत तोडकर, अभिजित जयवंत तोडकर (दोघे रा. पोतदार हायस्कूलजवळ, सांगली), कृष्णा पोवार, कोमल चौगुले, किरण गोते (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीत अविकाज सेक्युअर कंपनीचे कार्यालय आहे. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष संचालक पिरगोंडा पाटील याच्यासह अन्य संचालक आणि एजंटनी गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानुसार गुंतवणूकदारांनी २५ मार्च २०२२ पासून कंपनीत पैसे भरण्यास सुरुवात केली. फिर्यादी चव्हाण यांच्यासह २२ जणांकडून कंपनीने एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम भरून घेतली. या रकमेचे करार करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.यातील काही जणांना परताव्याचा एक हप्ता दिला. त्यानंतर परतावे देणे थांबवले. वारंवार विचारणा करूनही परतावा आणि मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने कंपनीकडून फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. अखेर चव्हाण यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यताअविकाज कंपनीचा संचालक हातकणंगले येथील असून, त्याचे अन्य साथीदार सांगली, जयसिंगपूर आणि शिरोळ येथील आहेत. त्यांनी आणखी काही गुंतवणूकदारांकडून पैसे जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती वाढू शकते, अशी माहती तपास अधिकारी शेळके यांनी दिली.

जादा परताव्याचा हव्यास नडलाकमी कालावधीत जादा परतावा मिळवण्याचा हव्यास गुंतवणूकदारांच्या अंगलट आला. मोठ्या बँका, पतसंस्था वार्षिक सहा ते सात टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाहीत. अशावेळी दरमहा १० ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या प्रामाणिक असतील का? याचाही विचार गुंतवणूकदारांकडून केला जात नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी