शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

आजऱ्यात लोकशाहीदिन : आगार व्यवस्थापकांकडे साकडे, राखीव जागावरही अतिक्रमण

आजरा : एस. टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता एस. टी.मध्ये राखीव जागा ठेवल्या आहेत; परंतु ही सर्व मंडळी एस.टी.मध्ये उभी, तर महाविद्यालयीन तरुण जागा अडवितात. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा राहू दे, किमान वाहकांना आदराने वागायला सांगा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनीे आगार व्यवस्थापकांकडे केली.आजरा तहसील कार्यालयात तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने एस. टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वर्षभरापूर्वी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली होती; पण प्रत्यक्षात अंमलबजावाणीची गरज उपस्थितांनी बोलून दाखविली.वनविभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्यक्षात किती झाडे जगली, हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची तपासणी होऊन प्रत्यक्षात वृक्ष जगण्याचे प्रमाण किती आहे, याची तपासणी होण्याची गरज असून, २५ टक्के तरी वृक्ष जगतात का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वनखात्याकडून याची माहिती घेतली जाईल, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.आजरा-महागाव रस्त्यावर आजरा शहराच्या सीमेवर असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलाची दुरवस्था झाली असून, कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे, असे दिनकरराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी पूल दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर अपघात घडल्यावरच तुम्ही लक्ष देणार का? असा प्रश्न तहसीलदारांनी करत किमान पुलाच्या धोकादायकतेबद्दल तेथे फलक तरी लावा. यासाठी बजेट मंजुरीची वाट पाहत बसू नका, अशा शब्दांत सुनावले. वीज वितरण कंपनीकडे दाखल तक्रारींबाबतही मार्गदर्शक सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केल्या. यावेळी दुय्यम निबंधक, आगार व्यवस्थापक, वीज कंपनीचे अधिकारी, नायब तहसीलदार डी. बी. कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माईकवरून बसस्थानकावर जाहीर कराएस.टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर असून, माईकवरून पुकारण्याबरोबरच वाहकांना वैयक्तिक सूचना देण्याबरोबरच जे वाहक यांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध थेट तक्रार देण्याचे आवाहन तहसीलदारांसह आगार व्यवस्थापक के. डी. मुरुकटे यांनी केले.नागरिकांनीही जाणीव ठेवावीस्वच्छतेबाबत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता नागरिकांनीही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.