शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

शेतकरी सोबत आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:13 IST

पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.

कोल्हापूर : महाविकास आघाडीशी फारकत घेतली म्हणून आता लोकसभेचे काय होणार? अशी काहींना चिंता आहे, मात्र राज्यातील शेतकरी जोपर्यंत माझ्या मागे आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. आता नव्याने शून्यापासून सुरुवात करायची आहे, नवा हुंकार घेऊन महाराष्ट्र पिंजून काढत संघटनेची बांधणी भक्कम करू आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांची ताकद राज्यकर्त्यांना दाखवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक चोकाक (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी झाली, त्यामध्ये शेट्टी यांनी महाविकास आघाडीसह भाजपवर निशाणा साधला. शेट्टी म्हणाले, महायुती व महाआघाडीसोबत स्वत:हून गेलो नाही. गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांनी महायुतीत घेतले, तर शरद पवार यांच्या विनंतीनुसारच आघाडीसोबत आलो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, या आशेपोटी दोघांशी मैत्री केली, मात्र दोघांनीही विश्वासघाताचे राजकारण केले.राजकीय सोयीसाठी चळवळ नाही, हे मान्य करतो. काहीवेळा मी भूमिका बदलल्या, शेतकऱ्यांना चार पैसे फायदा होईल, यासाठी हा प्रयत्न होता. कर्जमाफी वगळता राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. पीक विम्याच्या माध्यमातून विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. महागाईच्या आगडोंबामुळे सामान्य माणूस अस्वस्थ असताना त्याचे केंद्र सरकारला देणे-घेणे पडलेले नाही. यासाठी केंद्राच्या धोरणांची यापुढे चिरफाड करणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडणार असाल, तर उद्याच्या हंगामात साखर कारखानदार व संघटनेमध्ये संघर्ष अटळ आहे. हे करत असतानाच संघटनेचा राज्याबाहेर विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ईडी’ला विमा कंपन्यांचा घोटाळा दिसत नाही का?

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना २२ हजार कोटींचा चुना लावला आहे. खोटे रेकॉर्ड करून विमा नाकारला जातो, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग हे ईडीला का दिसत नाही? असा सवाल शेट्टी यांनी केला.

चळवळीतून विश्रांती घ्या, पण खो घालू नकाचळवळीतील काहींना आता धगधग सोसवत नाही. दहा-वीस वर्षे काम केल्याने विश्रांती घ्यावी लागते. त्यांचा सन्मान कायम राहील, त्यांनी विश्रांती घ्यावी, पण चळवळीला खो घालण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांचे शेट्टींनी कान टोचले.

शेट्टींना गाडीसाठी १०.४५ लाखांची मदत

संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांनी वर्गणी काढून २००२ मध्ये गाडी घेऊन दिली. त्यानंतर दोन गाड्या मी घेतल्या. त्यावेळी मला पगार सुरू असल्याने हात पसरण्याची वेळ आली नाही. आता उत्पन्न कमी झाले असून, पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी