शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

शेतकरी सोबत आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:13 IST

पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.

कोल्हापूर : महाविकास आघाडीशी फारकत घेतली म्हणून आता लोकसभेचे काय होणार? अशी काहींना चिंता आहे, मात्र राज्यातील शेतकरी जोपर्यंत माझ्या मागे आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. आता नव्याने शून्यापासून सुरुवात करायची आहे, नवा हुंकार घेऊन महाराष्ट्र पिंजून काढत संघटनेची बांधणी भक्कम करू आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांची ताकद राज्यकर्त्यांना दाखवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक चोकाक (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी झाली, त्यामध्ये शेट्टी यांनी महाविकास आघाडीसह भाजपवर निशाणा साधला. शेट्टी म्हणाले, महायुती व महाआघाडीसोबत स्वत:हून गेलो नाही. गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांनी महायुतीत घेतले, तर शरद पवार यांच्या विनंतीनुसारच आघाडीसोबत आलो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, या आशेपोटी दोघांशी मैत्री केली, मात्र दोघांनीही विश्वासघाताचे राजकारण केले.राजकीय सोयीसाठी चळवळ नाही, हे मान्य करतो. काहीवेळा मी भूमिका बदलल्या, शेतकऱ्यांना चार पैसे फायदा होईल, यासाठी हा प्रयत्न होता. कर्जमाफी वगळता राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. पीक विम्याच्या माध्यमातून विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. महागाईच्या आगडोंबामुळे सामान्य माणूस अस्वस्थ असताना त्याचे केंद्र सरकारला देणे-घेणे पडलेले नाही. यासाठी केंद्राच्या धोरणांची यापुढे चिरफाड करणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडणार असाल, तर उद्याच्या हंगामात साखर कारखानदार व संघटनेमध्ये संघर्ष अटळ आहे. हे करत असतानाच संघटनेचा राज्याबाहेर विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ईडी’ला विमा कंपन्यांचा घोटाळा दिसत नाही का?

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना २२ हजार कोटींचा चुना लावला आहे. खोटे रेकॉर्ड करून विमा नाकारला जातो, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग हे ईडीला का दिसत नाही? असा सवाल शेट्टी यांनी केला.

चळवळीतून विश्रांती घ्या, पण खो घालू नकाचळवळीतील काहींना आता धगधग सोसवत नाही. दहा-वीस वर्षे काम केल्याने विश्रांती घ्यावी लागते. त्यांचा सन्मान कायम राहील, त्यांनी विश्रांती घ्यावी, पण चळवळीला खो घालण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांचे शेट्टींनी कान टोचले.

शेट्टींना गाडीसाठी १०.४५ लाखांची मदत

संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांनी वर्गणी काढून २००२ मध्ये गाडी घेऊन दिली. त्यानंतर दोन गाड्या मी घेतल्या. त्यावेळी मला पगार सुरू असल्याने हात पसरण्याची वेळ आली नाही. आता उत्पन्न कमी झाले असून, पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी