शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

Kolhapur- Gokul Dudh Sangh: डोंगळेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:43 IST

राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाचीच

कोल्हापूर : राजकारणात दिलेला शब्द आणि विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि ती जपली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे अरूण डोंगळे यांनी अजूनही कोणतीही खळखळ न करता ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा तत्काळ द्यावा, अशी अपेक्षा सत्तारुढ आघाडीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी व्यक्त केली. संघातील राजकीय घडामोडीबद्दल ‘लोकमत’ने त्यांची भूमिका जाणून घेतली. डोंगळे यांना खुर्चीची हाव सुटत नाही म्हणून हे सगळे सुरू झाल्याची टिप्पणी त्यांनी केली.मुश्रीफ म्हणाले, संघात आमची सत्ता आल्यावर विश्वास पाटील अध्यक्ष झाले. तेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेलो. त्यांनी ठरल्याप्रमाणे डोंगळे यांना अध्यक्ष करा, असे सांगितले होते. तो शब्द आम्ही पाळला. आता डोंगळे यांना मुदतवाढ हवी होती तर ते उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे का गेले नाहीत, याचे उत्तर त्यांनी द्यावे. डोंगळे स्वत: व त्यांचा मुलगा आजही राष्ट्रवादीत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. आम्हीही त्यांना भेटून वस्तूस्थिती समजावून सांगू.गेल्या निवडणुकीत आम्ही जेव्हा सत्तारुढ आघाडीच्या विरोधात एकत्र आलो तेव्हा पक्षीय विचार नव्हता. माजी आमदार महादेवराव महाडिक, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी. एन. पाटील, शिवसेनेचे सत्यजीत पाटील यांच्याविरोधात आम्ही आघाडी केली. तेव्हा आघाडी, युती असा विषयच नव्हता. तेव्हा आता अशी भूमिका घेणे योग्य नाही.

डोंगळे यांनाही महायुतीचा साक्षात्कार राजीनामा देतानाच कसा झाला..त्यांनी त्यांची काही अपेक्षा असेल तर आमच्याशी चर्चा करायला हवी होती. संघ आम्ही पक्षविरहित राजकारण करत उत्तम चालवला आहे आणि यापुढेही आम्ही सर्व एकत्र राहून तो चांगला चालवू, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ