शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सोडलेल्यांना तूर्त प्रवेश नाही, 'अलिखित' नियमाने अनेकांची कोंडी

By समीर देशपांडे | Updated: April 12, 2025 16:13 IST

मूळ पक्ष प्रवेशासाठी प्रतीक्षेची वेळ, सत्तेचा लाभ घेण्याचा प्रयत्न

समीर देशपांडे कोल्हापूर : महायुतीतील तीनही पक्षांना सोडून गेलेल्या आणि विरोधात निवडणूक लढवलेल्या कोणालाही परस्पर संमतीशिवाय घेऊ नये, या अलिखित नियमाने अनेकांची कोंडी केली आहे. एकीकडे पराभव झाल्यानंतर राज्यातील अनेकजण पुन्हा आपापल्या पक्षात परतून सत्तेचा लाभ घेण्यासाठी आग्रही असताना त्यांना सबुरीचा सल्ला दिला जात आहे. या सर्वांची कामे त्यांचे जुने नेते करत आहेत. परंतु पुन्हा प्रवेश मात्र धोरण बदलल्याशिवाय हाेणार नसल्याचे दिसते.महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतर राज्यात भाजप शिंदेसेनेचे सरकार आणि नंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीही सोबत घेतली गेली. विधानसभेला अनेकांनी आपल्या पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेना किंवा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. जे जिंकले त्यांची सध्या तरी काही अडचण नाही. परंतु जे पराभूत झालेत त्यांची कोंडी झाली आहे. एकीकडे आपला जुना नेता सत्तेत आहे, परंतु जाहीरपणे त्यांच्यासोबत जाता येत नाही अशी ही कोंडी झाली आहे.कारण महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच तूर्त पक्ष सोडून विरोधात लढलेल्यांना तातडीने पुन्हा पक्षात प्रवेश न देण्याबाबत एकमत झाले आहे. ज्या ठिकाणी उद्धवसेना किंवा शरद पवारांच्या पक्षातील कोणी येत असतील तर त्यांना घ्यायचे. परंतु सोडून या दोन्ही पक्षात गेलेल्यांना लगेच घ्यायचे नाही असे हे धोरण आहे.

कोल्हापूरमध्ये दोघांना प्रतीक्षाकागल मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी पक्ष सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. ते पराभूत झाल्याने आता पुढे काय असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. पण त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. तर के. पी. पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही साथ सोडून उद्धवसेनेत प्रवेश केला. प्रकाश आबिटकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यांना हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जाहीरपणे अजित पवार यांच्यासोबत यायचे आहे. पण अलिखित नियम आड आला आहे.

अनेकांसमोर पेचसिंधुदुर्गमध्ये राजन तेली विधानसभेसाठी उद्धवसेनेत गेले. दीपक केसरकर यांच्याकडून पराभूत झाले. आता त्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनीही पक्ष सोडला. सांगलीत रोहित पाटील यांच्याकडून पराभूत झालेले माजी खासदार संजयकाका पाटील भाजपच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत. साताऱ्यामध्ये संजीव नाईक निंबाळकर गट अजित पवार यांच्याशी जुळवून घेत आहे.

जिल्हा परिषदेवेळी प्रवेश शक्यमहानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या की हे पक्षप्रवेश होऊ शकतात. कारण या सर्वच ठिकाणी महायुतीला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षात कोण जाईना आपलीच ताकद वाढेल असे गणित मांडून हे प्रवेश होऊ शकतात असे एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMahayutiमहायुतीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार