शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:31 IST

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.

ठळक मुद्देकोल्हापुरातील प्रवाशांच्या खिशाला कात्रीएस. टी. कर्मचारी संपाचा परिणाम कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू

कोल्हापूर , दि. १७ :  सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली. एकंदरीतच एस.टी  बसच्या संपामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिरूद मिरवणाऱ्या  एस.टी.ने प्रवाशांचे चांगलेच हाल केले.

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने राज्यातील सर्व मार्गांवरील एस. टी. बसच्या फेऱ्या  रद्द केल्या. अनेकजणांना संप असल्याचे माहीत नसल्याने ते बसस्थानकांवरच अडकून पडले होते. मध्यवर्ती बसस्थानक येथे पुणे-मुंबई येथून कोकणाकडे जाणारे काही प्रवासी मध्यरात्रीपासून गाडीमध्येच बसून होते.

गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता.

ऐन दिवाळीतील संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: महिला आणि लहान मुलांना सांभाळून सणाच्या दिवशी घरी पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. दरम्यान, कोल्हापूरच्या एस. टी. स्थानकावर ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खासगी वाहनधारकांकडून लूटमारएस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. ऐन दिवाळीत बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. इचलकरंजीचा एस.टी.चा तिकीट दर ३३ रुपये असताना खासगी वाहनधारक १०० रुपये घेत होते; तर निपाणीसाठी ५२ रुपये तिकीट दर असताना २०० ते २५० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. पुणे-मुंबईच्या तिकीटदराबाबत तर मनमानीचाच कारभार या ठिकाणी पाहावयास मिळत होता. नाइलाजास्तव इतके चढे दर देऊन अनेकांनी प्रवास केला.

पाण्याच्या बाटल्यांची विक्रीबस आता सुरू होईल, मग सुरू होईल, या विचारात असलेल्या व सुमारे पाच ते सात तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पाणीविक्रेत्यांची या निमित्ताने दिवाळीच साजरी झाली.

रेल्वेगाड्या फुल्लमिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या  व कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या तुडुंब झाल्या होत्या. याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसला.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ