शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त प्रवाशांनी नोकरदारांची रेल्वेगाडी रोखली -: कमी डब्यांची गाडी आल्याने प्रवासी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:01 IST

‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे जयसिंगपूर, रुकडी येथे पडसाद

जयसिंगपूर / रुकडी : जयसिंगपूर आणि रुकडी येथे मंगळवारी सकाळी प्रवाशांनी रेल्वे रोखली. लोकल रेल्वेला डबे कमी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळपास पन्नास टक्के प्रवाशांना नव्या लोकल रेल्वेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी करुनही जादा डबे जोडले जात नसल्यामुळे प्रवाशांचा हा उद्रेक पाहायला मिळाला.सातारा-कोल्हापूर (पॅसेंजर नं. ५१४४१) ही रेल्वे गाडी रुकडी येथे मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता संतप्त प्रवाशांनी अडविली. ‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.

या गर्दीमुळे प्रवाशाचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन यावर निर्णय घेत नव्हते. सोमवारी सकाळी याच गाडीमध्ये गांधीनगर ते जयसिंगपूर दरम्यान गर्दीमुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने व एक बालिका अत्यवस्थ झाल्याने प्रवासी संतप्त होते.त्यातच मंगळवारी सकाळची सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडीही कमी डब्यांची आल्याने प्रवासी संतप्त झाले. गाडीत प्रचंड गर्दी असल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. त्यामुळे प्रवाशांच्यात संतप्त भावना निर्माण झाली. रुकडी येथे तर संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरच थांबून ट्रॅक अडविल्यामुळे रेल्वेगाडी स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर थांबविण्यात आली.

याठिकाणी प्रवाशांना हटविण्याकरिता रेल्वे पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. प्रवाशांची समजूत काढण्याकरिता रेल्वेचे अधिकारी गेले असता प्रवाशांनी त्याना धारेवर धरत आक्रमक प्रश्न विचारले. यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.रुकडी येथे रेल्वेगाडी पंधरा मिनिटे रेल्वेस्थानकाबाहेर उभी राहताच स्टेशन मॅनेजरांचा गोंधळ उडाला. त्यानी रेल्वे प्रशासनाला या गोष्टीची माहिती देताच गाडी स्थानकाच्या आत घेण्याच्या सूचना मिळाल्या. रेल्वे ट्रॅकवर प्रवासी थांबलेल्या ठिकाणी डेप्युटी स्टेशन मॅनेजर पंकजकुमार चौधरी यांनी जाऊन प्रवाशांची समजूत काढली. त्यांनी दोन दिवसांत या गाडीला जादा डबे जोडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यानंतर ट्रॅकवरून प्रवासी बाजूला झाले. तत्पूर्वी सकाळी मिरजहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या रेल्वेत प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने व रेल्वेला फक्त सहाच डबे असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी जयसिंगपूर येथे थेट रेल्वे इंजिनसमोर उभा राहून निदर्शने सुरू केली. जवळपास पंधरा मिनिटे रेल्वे थांबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाकडे मागणी कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रेल्वे सोडण्यात आली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीrailwayरेल्वे